शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले अर्नाळा

By admin | Updated: May 14, 2017 04:41 IST

अर्नाळा किल्ला विरारजवळ आहे. येथे रेल्वेने जायचे असल्यास विरार स्टेशन गाठावे व पश्चिमेस बाहेर पडावे

- गौरव भांदिर्गेअर्नाळा किल्ला विरारजवळ आहे. येथे रेल्वेने जायचे असल्यास विरार स्टेशन गाठावे व पश्चिमेस बाहेर पडावे. बाहेर पडल्यावर अर्नाळा गावात जाण्यासाठी भरपूर बस उपलब्ध आहेत. तेथून अर्नाळा गाव साधारण १५ कि.मी. वर आहे. गावातून किनाऱ्यावर जायला १० मि. लागतात. किनाऱ्यावरून समोरच संपूर्ण अर्नाळा बेट नजरेत भरते. अर्नाळा किल्ल्याच्या बेटावर जाण्यासाठी फेरीबोटीची सोय असून, सकाळी ६.३० ते दुपारी १२.३० व सायंकाळी ४ ते ७ या वेळेतच त्या सुरू असतात. फेरीबोटीत चढण्यासाठी गुडघाभर पाण्यातून जावे लागते. त्यामुळे शूज वगैरे घालणे टाळावे. पुढे बेटावर जाण्यासाठी साधारण १० मि. लागतात व उतरतानासुद्धा गुडघाभर पाण्यात उतरावे लागते. भरतीच्या वेळी किंवा पावसाळ्यात वादळी वाऱ्याच्या वेळेस किल्यावर जाणे टाळावे.गडदर्शनबोटीच्या प्रवासानंतर गुडघाभर पाण्यातून अर्नाळा बेटाच्या भूभागावर पोहोचावे. तेथून समुद्र उजव्या बाजूला ठेवत, कालिका मातेचे मंदिर गाठावे. भरतीच्या वेळी मंदिरात जाता येत नाही. दर्शन घेऊन मागच्या बाजूने बेटावरील कोळी वस्तीमधून १० मिनिटांत अर्नाळा किल्ल्याच्या समोर येतो. डोळ्याचे पारणे फेडणारे हे दृश्य बघून शनिवारवाड्याची आठवण येते. २३ मे १७३७ साली हा किल्ला पेशव्यांनी बांधून पूर्ण केला. गडाच्या बुरुजात बांधलेल्या दर्शनी महादरवाज्याच्या दोन्ही बाजूस द्विपंखधारी केवल शरभ व त्याच्या थोडेसे खाली सोंड उंचावून त्यात पुष्पमाला धरलेल्या हत्तीचे द्वारशिल्प आहेत. दोन्ही द्वारशिल्प एकमेकांच्या दर्पणप्रतिमा आहेत. महाद्वाराच्या कमानीवरील फुलांची वेलबुट्टी व दोन्ही बाजूस कोरलेली कमळे बघण्यासारखी आहेत. या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या व भव्य घुमट पाहायला मिळतो. येथून परत डाव्या बाजूस दुसरा दरवाजा लागतो, तो पार करून उजव्या बाजूस वळून थेट तटबंदीवर जाणाऱ्या पायऱ्यांनी तटबंदीवर जावे व गडफेरी करावी. संपूर्ण गडफेरीस २ ते ३ तास लागतात.हा किल्ला आयताकृती असून, ३५ ते ४० फूट उंच तटबंदी आहे व चार कोपऱ्यात चार आणि उत्तरेकडील तटबंदीत महाद्वाराच्या दुतर्फा दोन, पश्चिमेकडील तटबंदीत दोन व दक्षिणेकडील तटबंदीत एक असे एकूण नऊ बुरूज आहेत. या बुरुजांना यशवंत बुरूज, भवानी बुरूज, गणेश बुरूज आणि सुटा बुरूज अशी नावे आहेत. तटफेरी मारताना तटबंदीत बांधलेले शौचकूप व प्रत्येक बुरुजात बांधलेली एक खोली दिसते. गणेश बुरूज हा या किल्ल्यातील महत्त्वाचा बुरूज आहे. गणेश बुरुजातून चिंचोळ्या वाटेने खाली उतरल्यावर, पहारेकऱ्यांच्या भव्य देवड्या पाहायला मिळतात व तेथे दरवाजा असून, त्याच्या दोन्ही बाजूस शरभाची शिल्पे कोरलेली आहेत व सुंदर नक्षीकाम केलेले आहे.तटफेरी पूर्ण करून मधील सपाटीच्या भूभागावर यावे, तेथे त्र्यंबकेश्वराचे मंदिर व दुसऱ्या बाजूस दर्गा आणि राजवाड्याचे अवशेष आहेत. मंदिराच्या बाहेरच अष्टकोनी विहीर असून, तेथे काठावर उत्खननात सापडलेली गणेशमूर्ती आहे व समोरच बुरुजामधील चौकोनी खोलीत नित्यानंद स्वामी काही काळासाठी वास्तव्यास होते, म्हणून त्यांच्या शिष्यांनी त्या खोलीचे रूपांतर मंदिरात केले आहे. शेजारीच भवानीमातेचे मंदिर व दक्षिणेकडील चोर दरवाजा व विहीर आहे. हा किल्ला घेण्यासाठी इग्रजांनी किल्ल्याच्या तटबंदीवर तोफगोळ्यांचा मारा केला होता. त्यातील एक तोफगोळा तटबंदीत अडकला होता. गडाच्या दक्षिण बाजूस १ कि.मी. अंतरावर ३६ फूट उंचीचा गोल टेहळणी बुरूज आहे व मोरटेल नावाच्या इंग्रजांच्या संकल्पनेतून हा बुरूज बांधला म्हणून याला ‘मोरटेलो टॉवर’ म्हणतात. गावात याला ‘हनुमंत बुरूज’ म्हणतात.>इतिहास चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला अर्नाळा हा जलदुर्ग इ.स. १५१६ मध्ये गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने बांधला. पोर्तुगीजांनी १५३० साली हा किल्ला जिंकला व नंतर यावर अनेक नवीन बांधकामे केली. सुमारे २०० वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला १७३७ मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. पोर्तुगीजांप्रमाणेच पहिल्या बाजीरावानेही या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. शेवटी १८१७ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणेच हा किल्लादेखील इंग्रजांच्या ताब्यात गेला.