शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

किल्ले अर्नाळा

By admin | Updated: May 14, 2017 04:41 IST

अर्नाळा किल्ला विरारजवळ आहे. येथे रेल्वेने जायचे असल्यास विरार स्टेशन गाठावे व पश्चिमेस बाहेर पडावे

- गौरव भांदिर्गेअर्नाळा किल्ला विरारजवळ आहे. येथे रेल्वेने जायचे असल्यास विरार स्टेशन गाठावे व पश्चिमेस बाहेर पडावे. बाहेर पडल्यावर अर्नाळा गावात जाण्यासाठी भरपूर बस उपलब्ध आहेत. तेथून अर्नाळा गाव साधारण १५ कि.मी. वर आहे. गावातून किनाऱ्यावर जायला १० मि. लागतात. किनाऱ्यावरून समोरच संपूर्ण अर्नाळा बेट नजरेत भरते. अर्नाळा किल्ल्याच्या बेटावर जाण्यासाठी फेरीबोटीची सोय असून, सकाळी ६.३० ते दुपारी १२.३० व सायंकाळी ४ ते ७ या वेळेतच त्या सुरू असतात. फेरीबोटीत चढण्यासाठी गुडघाभर पाण्यातून जावे लागते. त्यामुळे शूज वगैरे घालणे टाळावे. पुढे बेटावर जाण्यासाठी साधारण १० मि. लागतात व उतरतानासुद्धा गुडघाभर पाण्यात उतरावे लागते. भरतीच्या वेळी किंवा पावसाळ्यात वादळी वाऱ्याच्या वेळेस किल्यावर जाणे टाळावे.गडदर्शनबोटीच्या प्रवासानंतर गुडघाभर पाण्यातून अर्नाळा बेटाच्या भूभागावर पोहोचावे. तेथून समुद्र उजव्या बाजूला ठेवत, कालिका मातेचे मंदिर गाठावे. भरतीच्या वेळी मंदिरात जाता येत नाही. दर्शन घेऊन मागच्या बाजूने बेटावरील कोळी वस्तीमधून १० मिनिटांत अर्नाळा किल्ल्याच्या समोर येतो. डोळ्याचे पारणे फेडणारे हे दृश्य बघून शनिवारवाड्याची आठवण येते. २३ मे १७३७ साली हा किल्ला पेशव्यांनी बांधून पूर्ण केला. गडाच्या बुरुजात बांधलेल्या दर्शनी महादरवाज्याच्या दोन्ही बाजूस द्विपंखधारी केवल शरभ व त्याच्या थोडेसे खाली सोंड उंचावून त्यात पुष्पमाला धरलेल्या हत्तीचे द्वारशिल्प आहेत. दोन्ही द्वारशिल्प एकमेकांच्या दर्पणप्रतिमा आहेत. महाद्वाराच्या कमानीवरील फुलांची वेलबुट्टी व दोन्ही बाजूस कोरलेली कमळे बघण्यासारखी आहेत. या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या व भव्य घुमट पाहायला मिळतो. येथून परत डाव्या बाजूस दुसरा दरवाजा लागतो, तो पार करून उजव्या बाजूस वळून थेट तटबंदीवर जाणाऱ्या पायऱ्यांनी तटबंदीवर जावे व गडफेरी करावी. संपूर्ण गडफेरीस २ ते ३ तास लागतात.हा किल्ला आयताकृती असून, ३५ ते ४० फूट उंच तटबंदी आहे व चार कोपऱ्यात चार आणि उत्तरेकडील तटबंदीत महाद्वाराच्या दुतर्फा दोन, पश्चिमेकडील तटबंदीत दोन व दक्षिणेकडील तटबंदीत एक असे एकूण नऊ बुरूज आहेत. या बुरुजांना यशवंत बुरूज, भवानी बुरूज, गणेश बुरूज आणि सुटा बुरूज अशी नावे आहेत. तटफेरी मारताना तटबंदीत बांधलेले शौचकूप व प्रत्येक बुरुजात बांधलेली एक खोली दिसते. गणेश बुरूज हा या किल्ल्यातील महत्त्वाचा बुरूज आहे. गणेश बुरुजातून चिंचोळ्या वाटेने खाली उतरल्यावर, पहारेकऱ्यांच्या भव्य देवड्या पाहायला मिळतात व तेथे दरवाजा असून, त्याच्या दोन्ही बाजूस शरभाची शिल्पे कोरलेली आहेत व सुंदर नक्षीकाम केलेले आहे.तटफेरी पूर्ण करून मधील सपाटीच्या भूभागावर यावे, तेथे त्र्यंबकेश्वराचे मंदिर व दुसऱ्या बाजूस दर्गा आणि राजवाड्याचे अवशेष आहेत. मंदिराच्या बाहेरच अष्टकोनी विहीर असून, तेथे काठावर उत्खननात सापडलेली गणेशमूर्ती आहे व समोरच बुरुजामधील चौकोनी खोलीत नित्यानंद स्वामी काही काळासाठी वास्तव्यास होते, म्हणून त्यांच्या शिष्यांनी त्या खोलीचे रूपांतर मंदिरात केले आहे. शेजारीच भवानीमातेचे मंदिर व दक्षिणेकडील चोर दरवाजा व विहीर आहे. हा किल्ला घेण्यासाठी इग्रजांनी किल्ल्याच्या तटबंदीवर तोफगोळ्यांचा मारा केला होता. त्यातील एक तोफगोळा तटबंदीत अडकला होता. गडाच्या दक्षिण बाजूस १ कि.मी. अंतरावर ३६ फूट उंचीचा गोल टेहळणी बुरूज आहे व मोरटेल नावाच्या इंग्रजांच्या संकल्पनेतून हा बुरूज बांधला म्हणून याला ‘मोरटेलो टॉवर’ म्हणतात. गावात याला ‘हनुमंत बुरूज’ म्हणतात.>इतिहास चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला अर्नाळा हा जलदुर्ग इ.स. १५१६ मध्ये गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने बांधला. पोर्तुगीजांनी १५३० साली हा किल्ला जिंकला व नंतर यावर अनेक नवीन बांधकामे केली. सुमारे २०० वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला १७३७ मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. पोर्तुगीजांप्रमाणेच पहिल्या बाजीरावानेही या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. शेवटी १८१७ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणेच हा किल्लादेखील इंग्रजांच्या ताब्यात गेला.