शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

"मला चुकीनं झालं असं वाटत नाही, यातून पक्षात माझी काय किंमत आहे हे समजलं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 15:28 IST

हकालपट्टीच्या वृत्तावर आढळराव पाटील यांची रोखठोक प्रतिक्रिया

शिरूर लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचंही नमूद करण्यात आलं होतं. दरम्यान, त्यानंतर शिवसेनेकडून ते पक्षातच असल्याचं स्पष्टीकरणही देण्यात आलं आहे. या संपूर्ण घटनेनंतर आढळराव पाटील यांनीदेखील आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला.

“अनेकांनी मला सकाळपासून यासंदर्भात विचारणा करण्यासाठी फोन केले. मला क्षणभर काही कळेना. मला वाटलं कोणीतरी मजा करत आहे. मला विश्वास बसत नव्हता शिवसेनेनं माझी हकालपट्टी केली आहे. नंतर मी सामना पेपर वाचला. त्यात बातमी वाचल्यावर मला शॉक बसला. काही बोलावं, काय प्रतिक्रिया द्याव्या हे समजेनासं झालं,” असं आढळराव पाटील म्हणाले. 

“काल रात्रीच मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. त्यांना मतदारसंघातील काही कार्यकर्ते भेटायला येणार आहेत हे त्यांना सांगितलं. त्याप्रमाणे आज सकाळची त्यांची वेळही घेतली होती. परंतु आज जनता दरबार असल्यानं जमणार नसून दोन दिवसांनी भेट घेईन असंही सांगितलं. तुम्ही जी पोस्ट केली ती खुप व्हायरल झाली आणि त्याचं मला वाईट वाटलं असं त्यांनी मला सांगितलं. या पोस्टमध्ये मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं त्यात चूक केली असं काही वाटत नाही असं त्यांना सांगितलं. त्यांनीही जे झालं ते झालं असं म्हणत मंगळवारी भेटण्यास सांगितलं,” असंही त्यांनी नमूद केलं.

१८ वर्ष तुम्ही शिवसेनेत असताना अनेकदा तुम्ही पक्षातून जाताय अशा चर्चा सुरू होत्या. पण तुम्ही गेला नाहीत, याचा मला अभिमान असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. मागील चार पाच दिवसांपासून वातावरण तापल आहे. पण माझं काय चुकलं? मी काय कमी केलं पक्षासाठी? माझ्यावरच कारवाई का? कोणीतरी काहीतरी आरोप करायचा. अनेकांनी पोस्ट लिहिली, मग माझ्यावरच कारवाई का? १८ वर्ष या मतदार संघात कोणी नसताना मी राष्ट्रवादीची लढतोय. समर्थपणे त्यांना अंगावर घेतलं, त्याचीच फळं आज मी भोगतोय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

२००९ ला ऑफर होतीपवार यांनी मला २००९ ला ऑफर दिली होती. शिरूरमधून लढू नका, मला तिकडून लढायचं आहे. तुम्हाला दोन टर्म राज्यसभा देतो. ही मीटिंग २४/११ ला झाली होती. त्यावेळी मी बाळासाहेबांवर विश्वास आहे असं सांगितलं. पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. आज खासदार नसताना शिवसैनिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मी लढत असल्याचंही ते म्हणाले. मला हे खुप लागलंकाय पक्षविरोधी काम केलं मी? साडेतीन वर्षात पक्षासाठी काम करताना रूपयाचा निधी नाही, पाठिंबा नाही, तरी बाळासाहेबांचे विचार घेऊन मी फिरतो. रात्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतरही असं होणं, मला हे खूप लागलं आहे. आता कारवाई मागे घेतली पण मला वाईट वाटतं आहे. आज महाराष्ट्रभर जी किंमत केली ते केली. आज मला वाईट वाटलं ज्याप्रकारे कारवाई केली. इतकी वाईट परिस्थिती या पक्षानं माझ्यावर आणली. मला निर्णय मान्य आहे. आता पक्षानं शुद्धीपत्रक काढलं. त्यानंतर मला उद्धव ठाकरे, विनायक राऊत, अनिल देसाई यांचे फोन आले चुकीनं झालं असं सांगितलं. पण मला चुकीनं झालं असं वाटत नाही. यातून पक्षात माझी काय किंमत आहे हे समजलं. मी राष्ट्रवादीला अंगावर घेतलं ही चूक झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मी पक्षाच्या विरोधात नाही, शांत डोक्यानं नंतर विचार करू असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कार्यकर्त्यांनी शांत राहावं. पक्षाविरोधी काही करू नका. आपण बसू. चर्चा करू आणि निर्णय घेऊ अशी सर्वांना विनंती आहे. जनतेनं मला मोठं केलंय. जनता निर्णय घेईल, बघू पुढे काय करायचं ते असंही ते म्हणाले.

टॅग्स :Shivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्र