शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

"मला चुकीनं झालं असं वाटत नाही, यातून पक्षात माझी काय किंमत आहे हे समजलं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 15:28 IST

हकालपट्टीच्या वृत्तावर आढळराव पाटील यांची रोखठोक प्रतिक्रिया

शिरूर लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचंही नमूद करण्यात आलं होतं. दरम्यान, त्यानंतर शिवसेनेकडून ते पक्षातच असल्याचं स्पष्टीकरणही देण्यात आलं आहे. या संपूर्ण घटनेनंतर आढळराव पाटील यांनीदेखील आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला.

“अनेकांनी मला सकाळपासून यासंदर्भात विचारणा करण्यासाठी फोन केले. मला क्षणभर काही कळेना. मला वाटलं कोणीतरी मजा करत आहे. मला विश्वास बसत नव्हता शिवसेनेनं माझी हकालपट्टी केली आहे. नंतर मी सामना पेपर वाचला. त्यात बातमी वाचल्यावर मला शॉक बसला. काही बोलावं, काय प्रतिक्रिया द्याव्या हे समजेनासं झालं,” असं आढळराव पाटील म्हणाले. 

“काल रात्रीच मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. त्यांना मतदारसंघातील काही कार्यकर्ते भेटायला येणार आहेत हे त्यांना सांगितलं. त्याप्रमाणे आज सकाळची त्यांची वेळही घेतली होती. परंतु आज जनता दरबार असल्यानं जमणार नसून दोन दिवसांनी भेट घेईन असंही सांगितलं. तुम्ही जी पोस्ट केली ती खुप व्हायरल झाली आणि त्याचं मला वाईट वाटलं असं त्यांनी मला सांगितलं. या पोस्टमध्ये मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं त्यात चूक केली असं काही वाटत नाही असं त्यांना सांगितलं. त्यांनीही जे झालं ते झालं असं म्हणत मंगळवारी भेटण्यास सांगितलं,” असंही त्यांनी नमूद केलं.

१८ वर्ष तुम्ही शिवसेनेत असताना अनेकदा तुम्ही पक्षातून जाताय अशा चर्चा सुरू होत्या. पण तुम्ही गेला नाहीत, याचा मला अभिमान असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. मागील चार पाच दिवसांपासून वातावरण तापल आहे. पण माझं काय चुकलं? मी काय कमी केलं पक्षासाठी? माझ्यावरच कारवाई का? कोणीतरी काहीतरी आरोप करायचा. अनेकांनी पोस्ट लिहिली, मग माझ्यावरच कारवाई का? १८ वर्ष या मतदार संघात कोणी नसताना मी राष्ट्रवादीची लढतोय. समर्थपणे त्यांना अंगावर घेतलं, त्याचीच फळं आज मी भोगतोय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

२००९ ला ऑफर होतीपवार यांनी मला २००९ ला ऑफर दिली होती. शिरूरमधून लढू नका, मला तिकडून लढायचं आहे. तुम्हाला दोन टर्म राज्यसभा देतो. ही मीटिंग २४/११ ला झाली होती. त्यावेळी मी बाळासाहेबांवर विश्वास आहे असं सांगितलं. पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. आज खासदार नसताना शिवसैनिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मी लढत असल्याचंही ते म्हणाले. मला हे खुप लागलंकाय पक्षविरोधी काम केलं मी? साडेतीन वर्षात पक्षासाठी काम करताना रूपयाचा निधी नाही, पाठिंबा नाही, तरी बाळासाहेबांचे विचार घेऊन मी फिरतो. रात्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतरही असं होणं, मला हे खूप लागलं आहे. आता कारवाई मागे घेतली पण मला वाईट वाटतं आहे. आज महाराष्ट्रभर जी किंमत केली ते केली. आज मला वाईट वाटलं ज्याप्रकारे कारवाई केली. इतकी वाईट परिस्थिती या पक्षानं माझ्यावर आणली. मला निर्णय मान्य आहे. आता पक्षानं शुद्धीपत्रक काढलं. त्यानंतर मला उद्धव ठाकरे, विनायक राऊत, अनिल देसाई यांचे फोन आले चुकीनं झालं असं सांगितलं. पण मला चुकीनं झालं असं वाटत नाही. यातून पक्षात माझी काय किंमत आहे हे समजलं. मी राष्ट्रवादीला अंगावर घेतलं ही चूक झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मी पक्षाच्या विरोधात नाही, शांत डोक्यानं नंतर विचार करू असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कार्यकर्त्यांनी शांत राहावं. पक्षाविरोधी काही करू नका. आपण बसू. चर्चा करू आणि निर्णय घेऊ अशी सर्वांना विनंती आहे. जनतेनं मला मोठं केलंय. जनता निर्णय घेईल, बघू पुढे काय करायचं ते असंही ते म्हणाले.

टॅग्स :Shivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्र