शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

माजी आमदार ‘यशवंत एकनाथ’ यांचे निधन

By admin | Updated: May 18, 2017 00:09 IST

आज कोडोलीत अंत्यसंस्कार, रांगडा नेता हरपला

लोकमत न्यूज नेटवर्क  --कोल्हापूर / कोडोली : कोल्हापूर जिल्ह्यातील रांगडे व्यक्तिमत्त्व व पन्हाळा, गगनबावडा, वैभववाडीचे माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील (वय ८७) यांचे बुधवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास वार्धक्याने कोडोली (ता. पन्हाळा) येथे राहत्या घरी निधन झाले. ‘सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत रोख-ठोक बोलणारा लोकनेता’ अशी त्यांची पश्चिम महाराष्ट्रात ओळख होती. कोडोली (ता. पन्हाळा) या त्यांच्या मूळ गावी आज, गुरुवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेले चार महिने पाटील यांना कमालीचा अशक्तपणा होता. संध्याकाळी त्यांचे बोलणे एकदम बंद झाले. त्यानंतर वडगांव येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांचे पार्थिव कोडोली येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात ठेवण्यात आले. पाटील यांच्या निधनाची बातमी पंचक्रोशीत समजली आणि अनेक गावच्या ग्रामस्थांनी कोडोलीकडे धाव घेतली. आपल्या करारी बाण्याच्या नेत्याचे दर्शन घेताना अनेकांना अश्रू आवरत नव्हते. त्यांच्या कारकिर्दीतील आठवणींना उजाळा देत अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण नरके, आमदार चंद्रदीप नरके, अजित नरके यांनी रात्री त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. दि. ४ मार्च १९३० रोजी त्यांचा जन्म पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे येथे झाला. माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी कोडोलीच्या सार्वजनिक कामामध्ये भाग घेण्यास सुरूवात केली. सन १९५७ मध्ये ते कोडोली ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले. सन १९६७ पर्यंत ते सदस्य होते. त्यानंतर सेवा संस्थेची स्थापना त्यांनी केली. सन १९६७ मध्ये ते जिल्हा परिषदेवर पहिल्यांदा निवडून गेले. सन १९७२ मध्ये ते दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून गेले व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषवले. सन १९६८ मध्ये ते जिल्हा काँग्रेसचे प्रतिनिधी झाले. सन १९८२ मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून त्यांनी कोडोली येथे यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. आयुर्वेदिक महाविद्यालयापासून अनेक प्रकारचे शिक्षण या संस्थेमध्ये उपलब्ध आहे. ‘वसंतरावदादा पाटील यांचे एकनिष्ठ’ म्हणून ‘यशवंत एकनाथ’ यांचे नाव अग्रहक्काने घेतले जाते. सन १९७८ ते १९९९ या प्रदीर्घ काळात त्यांनी पन्हाळा, गगनबावडा व सिंधुदुर्ग जिल्"ातील वैभववाडी तालुका अशा मतदारसंघाचे विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. या कालावधीत त्यांनी अतिशय आक्रमकपणे काम करत या तिन्ही तालुक्यांमध्ये अनेक पाणी प्रकल्प मंंजूर करून आणले. हे तिन्ही तालुके दुर्गम असल्याने शेती, वीज, पाणी, रस्ते या मुलभूत गरजांसाठी सातत्याने आमदार म्हणून यशवंत एकनाथ पाटील कार्यरत राहिले. स्पष्ट आणि रोखठोक भाषेत प्रश्नांची मांडणी करून ते सोडविण्यासाठी कमालीचा आग्रह धरणारा नेता, अशीच त्यांची प्रतिमा होती. विधानसभेतील त्यांची भाषणे गाजली. जिल्हा परिषदेतही अधिकाऱ्यांवर वचक ठेवून काम करून घेण्याची त्यांची पद्धत आजही सांगितली जाते. मनमोकळा स्वभाव, परखड बोलणे, आवाजातील जरब, स्पष्टवक्तेपणा आणि कमालीचा आत्मविश्वास या गुणांच्या जोरावर पाटील यांनी ‘यशवंत एकनाथ’या दोन शब्दांमध्ये आपले व्यक्तिमत्त्व उभे केले. कुरळप (ता. वाळवा, जि. सांगली) येथील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पी. आर. पाटील यांच्या भगिनी वासंती यांच्याशी त्यांचा सन १९५१ मध्ये विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती अमरसिंह पाटील व सुवर्णा पाटील, छाया पाटील, सुजाता चव्हाण पाटील, स्वरूपा पाटील या चार विवाहित मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण नरके यांचे ते मामा होत.आज सकाळी १० वाजता अंत्यसंस्कारसकाळी सात वाजता पाटील यांचे पार्थिव आमदार वाड्यात नेले जाणार आहे. त्यानंतर आठ वाजता गावातून अंत्ययात्रा काढण्यात येईल. सकाळी १० वाजता दत्त मंदिरासमोरील मैदानावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. .......................कोरे, पाटील यांच्यातील संघर्षवारणा खोऱ्यातील तात्यासाहेब कोरे आणि यशवंत एकनाथ यांच्यातील राजकीय संघर्ष उभ्या कोल्हापूर जिल्"ाने अनेकदा अनुभवला; परंतु या परिसरातील जनतेने कोरे यांना नेहमीच सहकारामध्ये साथ दिली आणि विधानसभेला ‘यशवंत एकनाथ’ यांची साथ सोडली नाही. पाचवेळा आमदार झाल्यानंतर विनय कोरे यांनी त्यांचा १९९९ साली पराभव केला. जिल्ह्यातील आदरणीय व्यक्तिमत्त्व‘यशवंत एकनाथ’ यांना जिल्"ातील सर्वच तालुक्यांमध्ये एक आदराचे स्थान होते. कुठल्याही कार्यक्रमामध्ये ते आल्यानंतर त्याच आदराने त्यांचे सर्वत्र स्वागत होत असे. आपल्या रांगड्या कार्यशैलीमुळे त्यांनी सर्वसामान्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील हे अस्सल रांगडे व्यक्तिमत्त्व होते. काँग्रेसशी अत्यंत निष्ठावान असलेल्या पाटील यांनी आयुष्यभर जनतेची सेवा केली. ते माझे अत्यंत जवळचे मित्र आणि मार्गदर्शक होते. त्यांच्या निधनाने माझा वैयक्तिक मित्र हरपला आहे.- आ. डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री‘आमदार वाडा’ सुन्न‘जयश’ नावाने असणाऱ्या त्यांच्या निवासस्थानाची ‘आमदार वाडा’ अशीही ओळख आहे. गेली अनेक वर्षे पाटील यांच्या वास्तव्याने सळसळणारा हा वाडा पाटील यांच्या निधनानंतर सुन्न झाला होता.