शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार ‘यशवंत एकनाथ’ यांचे निधन

By admin | Updated: May 18, 2017 00:09 IST

आज कोडोलीत अंत्यसंस्कार, रांगडा नेता हरपला

लोकमत न्यूज नेटवर्क  --कोल्हापूर / कोडोली : कोल्हापूर जिल्ह्यातील रांगडे व्यक्तिमत्त्व व पन्हाळा, गगनबावडा, वैभववाडीचे माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील (वय ८७) यांचे बुधवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास वार्धक्याने कोडोली (ता. पन्हाळा) येथे राहत्या घरी निधन झाले. ‘सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत रोख-ठोक बोलणारा लोकनेता’ अशी त्यांची पश्चिम महाराष्ट्रात ओळख होती. कोडोली (ता. पन्हाळा) या त्यांच्या मूळ गावी आज, गुरुवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेले चार महिने पाटील यांना कमालीचा अशक्तपणा होता. संध्याकाळी त्यांचे बोलणे एकदम बंद झाले. त्यानंतर वडगांव येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांचे पार्थिव कोडोली येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात ठेवण्यात आले. पाटील यांच्या निधनाची बातमी पंचक्रोशीत समजली आणि अनेक गावच्या ग्रामस्थांनी कोडोलीकडे धाव घेतली. आपल्या करारी बाण्याच्या नेत्याचे दर्शन घेताना अनेकांना अश्रू आवरत नव्हते. त्यांच्या कारकिर्दीतील आठवणींना उजाळा देत अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण नरके, आमदार चंद्रदीप नरके, अजित नरके यांनी रात्री त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. दि. ४ मार्च १९३० रोजी त्यांचा जन्म पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे येथे झाला. माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी कोडोलीच्या सार्वजनिक कामामध्ये भाग घेण्यास सुरूवात केली. सन १९५७ मध्ये ते कोडोली ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले. सन १९६७ पर्यंत ते सदस्य होते. त्यानंतर सेवा संस्थेची स्थापना त्यांनी केली. सन १९६७ मध्ये ते जिल्हा परिषदेवर पहिल्यांदा निवडून गेले. सन १९७२ मध्ये ते दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून गेले व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषवले. सन १९६८ मध्ये ते जिल्हा काँग्रेसचे प्रतिनिधी झाले. सन १९८२ मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून त्यांनी कोडोली येथे यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. आयुर्वेदिक महाविद्यालयापासून अनेक प्रकारचे शिक्षण या संस्थेमध्ये उपलब्ध आहे. ‘वसंतरावदादा पाटील यांचे एकनिष्ठ’ म्हणून ‘यशवंत एकनाथ’ यांचे नाव अग्रहक्काने घेतले जाते. सन १९७८ ते १९९९ या प्रदीर्घ काळात त्यांनी पन्हाळा, गगनबावडा व सिंधुदुर्ग जिल्"ातील वैभववाडी तालुका अशा मतदारसंघाचे विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. या कालावधीत त्यांनी अतिशय आक्रमकपणे काम करत या तिन्ही तालुक्यांमध्ये अनेक पाणी प्रकल्प मंंजूर करून आणले. हे तिन्ही तालुके दुर्गम असल्याने शेती, वीज, पाणी, रस्ते या मुलभूत गरजांसाठी सातत्याने आमदार म्हणून यशवंत एकनाथ पाटील कार्यरत राहिले. स्पष्ट आणि रोखठोक भाषेत प्रश्नांची मांडणी करून ते सोडविण्यासाठी कमालीचा आग्रह धरणारा नेता, अशीच त्यांची प्रतिमा होती. विधानसभेतील त्यांची भाषणे गाजली. जिल्हा परिषदेतही अधिकाऱ्यांवर वचक ठेवून काम करून घेण्याची त्यांची पद्धत आजही सांगितली जाते. मनमोकळा स्वभाव, परखड बोलणे, आवाजातील जरब, स्पष्टवक्तेपणा आणि कमालीचा आत्मविश्वास या गुणांच्या जोरावर पाटील यांनी ‘यशवंत एकनाथ’या दोन शब्दांमध्ये आपले व्यक्तिमत्त्व उभे केले. कुरळप (ता. वाळवा, जि. सांगली) येथील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पी. आर. पाटील यांच्या भगिनी वासंती यांच्याशी त्यांचा सन १९५१ मध्ये विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती अमरसिंह पाटील व सुवर्णा पाटील, छाया पाटील, सुजाता चव्हाण पाटील, स्वरूपा पाटील या चार विवाहित मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण नरके यांचे ते मामा होत.आज सकाळी १० वाजता अंत्यसंस्कारसकाळी सात वाजता पाटील यांचे पार्थिव आमदार वाड्यात नेले जाणार आहे. त्यानंतर आठ वाजता गावातून अंत्ययात्रा काढण्यात येईल. सकाळी १० वाजता दत्त मंदिरासमोरील मैदानावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. .......................कोरे, पाटील यांच्यातील संघर्षवारणा खोऱ्यातील तात्यासाहेब कोरे आणि यशवंत एकनाथ यांच्यातील राजकीय संघर्ष उभ्या कोल्हापूर जिल्"ाने अनेकदा अनुभवला; परंतु या परिसरातील जनतेने कोरे यांना नेहमीच सहकारामध्ये साथ दिली आणि विधानसभेला ‘यशवंत एकनाथ’ यांची साथ सोडली नाही. पाचवेळा आमदार झाल्यानंतर विनय कोरे यांनी त्यांचा १९९९ साली पराभव केला. जिल्ह्यातील आदरणीय व्यक्तिमत्त्व‘यशवंत एकनाथ’ यांना जिल्"ातील सर्वच तालुक्यांमध्ये एक आदराचे स्थान होते. कुठल्याही कार्यक्रमामध्ये ते आल्यानंतर त्याच आदराने त्यांचे सर्वत्र स्वागत होत असे. आपल्या रांगड्या कार्यशैलीमुळे त्यांनी सर्वसामान्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील हे अस्सल रांगडे व्यक्तिमत्त्व होते. काँग्रेसशी अत्यंत निष्ठावान असलेल्या पाटील यांनी आयुष्यभर जनतेची सेवा केली. ते माझे अत्यंत जवळचे मित्र आणि मार्गदर्शक होते. त्यांच्या निधनाने माझा वैयक्तिक मित्र हरपला आहे.- आ. डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री‘आमदार वाडा’ सुन्न‘जयश’ नावाने असणाऱ्या त्यांच्या निवासस्थानाची ‘आमदार वाडा’ अशीही ओळख आहे. गेली अनेक वर्षे पाटील यांच्या वास्तव्याने सळसळणारा हा वाडा पाटील यांच्या निधनानंतर सुन्न झाला होता.