शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

माजी राज्यपाल विद्यासागर राव यांच्या प्रवासावर झाले ४५ लाख खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 20:46 IST

२१४ सरकारी दौऱ्यांत हैदराबाद व चेन्नईला प्राधान्य; आरटीआयतून माहिती उघड

मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल विद्यासागर राव हे पाच वर्षाच्या कार्यकाळात तब्बल २१४ वेळा प्रवास दौरे काढले. त्यासाठी एकुण ४५ लाख रुपये खर्च झाला असल्याचे माहिती अधिकार कायद्यान्वये मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. त्यांनी सर्वाधिक ८३ वेळा हैदराबादला तर २२ वेळा चेन्नईला दौरे काढले होते.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आरटीआयतर्गंत राजभवनाकडे विद्यासागर यांच्या पाच वर्षातील परदेश व देशातील विविध दौरे आणि तेथील निवासाच्या खर्चाबाबत विचारणा केली होती. त्याबाबत देण्यात आलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. विद्यासागर राव यांनी ५वर्षात परदेशात एकदाही प्रवास केलेला नाही. त्याचप्रमाणे राज्यपालांना राज्य व भारत दौºयासाठी राज्य अतिथीची सुविधा दिली जात असल्याने त्यांच्याकडे निवास खर्च घेतला जात नाही. त्यांच्या २ जानेवारी २०१५ ते ३ सप्टेंबर २०१९ या ५७ महिन्यांत हवाई, सागरी व रस्ते प्रवासावर एकूण ४५ लाख ३ हजार ६५१ रुपये खर्च झाले आहेत. त्यांचा बहुतांश प्रवास विमानाने झाला असून एकुण २१४ वेळा केला आहे. त्यापैकी ८३ वेळा प्रवास हा केवळ हैदराबाद येथील आहे. तसेच २२ वेळा चेन्नईला तर, विजयवाडा, अमरावती आणि तिरुपती याठिकाणी काही वेळा प्रवास केला आहे.

आरटीआयच्या माहितीनुसार, सुरुवातीस ३ वर्षे राव यांनी मोठ्या प्रमाणावर प्रवास केला. २०१५ मध्ये ५४ वेळा तर २०१६ मध्ये ५३ आणि २०१७ मध्ये ४९ वेळा प्रवास केला आहे. २०१८ व २०१९ मध्ये अनुक्रमे ३६ व २२ वेळा प्रवास केला आहे. या प्रत्येक कालावधीत राव हे ३ ते १५ दिवस ते राज्याबाहेर होते.

टॅग्स :Governmentसरकार