शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

... ही शिवसेना-काँग्रेसची नुरा कुस्ती; औरंगाबादच्या नामांतरावरून फडणवीसांचा टोला

By जयदीप दाभोळकर | Updated: January 1, 2021 14:25 IST

निवडणुका जवळ आल्या की शिवसेनेला या मुद्द्याची आठवण येते. निवडणुका संपल्या की त्यांना विसर पडेल असं म्हणत फडणवीसांची शिवसेनेवर टीका

ठळक मुद्देशिवसेनेकडून हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरताच, फडणवीसांचा आरोपयापूर्वी काँग्रेसकडून करण्यात आला होता नामांतराला विरोध

औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यावरून काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये नुरा कुस्ती सुरू आहे, असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला. निवडणुका जवळ आल्या की शिवसेनेला या मुद्द्याची आठवण येते आणि निवडणुका संपल्या की त्यांना या मुद्द्याचा विसर पडेल, असंही त्यांनी नमूद केलं. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी फडणवीस यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी याविषयावर भाष्य केलं.यावेळी फडणवीसांनी काँग्रेसच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. काँग्रेसनं औरंगाबादच्या संभाजीनगर या नामांतराला विरोध केला किंवा नाही केला काय, पण शिवसेनेकडून केवळ निवडणुकांपुरता हा मुद्दा वापरण्यात येतो. या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये नुरा कुस्ती सुरू असल्याचंही फडणवीस म्हणाले. काँग्रेसचा विरोधमहाविकास आघाडीत काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहे, पण नामांतराला आमचा विरोध राहिल, असे थोरात यांनी स्पष्टपणे सांगितलंय. महाविकास आघाडीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे, त्यामुळे जेव्हा नाव बदलासंदर्भात प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोध राहिल. पण अद्याप तसा कोणताही प्रस्ताव समोर नसल्याचंही थोरात यांनी स्पष्ट केलंय. आम्हाला सत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे, त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. महाविकास आघाडीही त्याच आधारावर तयार झालेली आहे. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतराला आमचा विरोध राहिल, असे बाळासाहेब ठाकरेंनी ठामपणे सांगितलं होतं.मनसेची मागणी शिवसेना हा पक्ष गेल्यावेळी केंद्रात आणि राज्यात सत्तेत होता. मात्र असे असतानासुद्धा औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करावं यासाठी त्यांनी कुठलाही आवाज उठवला नाही. तर संभाजीनगर करण्याच्या मागणीवरून शिवसनेनं फक्त राजकरण केले आहे. त्यामुळे आता लोकांना याबातीत शिवसेनेकडून अपेक्षाही राहिली नसल्याचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं होतं. तसंच आता आम्ही यासाठी पुढाकर घेणार असून राज्य सरकाराला औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यासाठी भाग पाडणार असल्याचेही पाटील यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाMNSमनसेRaju Patilराजू पाटील