शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

... ही शिवसेना-काँग्रेसची नुरा कुस्ती; औरंगाबादच्या नामांतरावरून फडणवीसांचा टोला

By जयदीप दाभोळकर | Updated: January 1, 2021 14:25 IST

निवडणुका जवळ आल्या की शिवसेनेला या मुद्द्याची आठवण येते. निवडणुका संपल्या की त्यांना विसर पडेल असं म्हणत फडणवीसांची शिवसेनेवर टीका

ठळक मुद्देशिवसेनेकडून हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरताच, फडणवीसांचा आरोपयापूर्वी काँग्रेसकडून करण्यात आला होता नामांतराला विरोध

औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यावरून काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये नुरा कुस्ती सुरू आहे, असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला. निवडणुका जवळ आल्या की शिवसेनेला या मुद्द्याची आठवण येते आणि निवडणुका संपल्या की त्यांना या मुद्द्याचा विसर पडेल, असंही त्यांनी नमूद केलं. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी फडणवीस यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी याविषयावर भाष्य केलं.यावेळी फडणवीसांनी काँग्रेसच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. काँग्रेसनं औरंगाबादच्या संभाजीनगर या नामांतराला विरोध केला किंवा नाही केला काय, पण शिवसेनेकडून केवळ निवडणुकांपुरता हा मुद्दा वापरण्यात येतो. या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये नुरा कुस्ती सुरू असल्याचंही फडणवीस म्हणाले. काँग्रेसचा विरोधमहाविकास आघाडीत काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहे, पण नामांतराला आमचा विरोध राहिल, असे थोरात यांनी स्पष्टपणे सांगितलंय. महाविकास आघाडीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे, त्यामुळे जेव्हा नाव बदलासंदर्भात प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोध राहिल. पण अद्याप तसा कोणताही प्रस्ताव समोर नसल्याचंही थोरात यांनी स्पष्ट केलंय. आम्हाला सत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे, त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. महाविकास आघाडीही त्याच आधारावर तयार झालेली आहे. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतराला आमचा विरोध राहिल, असे बाळासाहेब ठाकरेंनी ठामपणे सांगितलं होतं.मनसेची मागणी शिवसेना हा पक्ष गेल्यावेळी केंद्रात आणि राज्यात सत्तेत होता. मात्र असे असतानासुद्धा औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करावं यासाठी त्यांनी कुठलाही आवाज उठवला नाही. तर संभाजीनगर करण्याच्या मागणीवरून शिवसनेनं फक्त राजकरण केले आहे. त्यामुळे आता लोकांना याबातीत शिवसेनेकडून अपेक्षाही राहिली नसल्याचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं होतं. तसंच आता आम्ही यासाठी पुढाकर घेणार असून राज्य सरकाराला औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यासाठी भाग पाडणार असल्याचेही पाटील यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाMNSमनसेRaju Patilराजू पाटील