शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

गड-किल्ल्यांवर वनसंपत्ती उभारणार

By admin | Updated: July 9, 2017 02:34 IST

सह्याद्री प्रतिष्ठानने पुरातत्त्व विभाग आणि वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने, राज्यातील ८ गडकिल्ल्यांवर वृक्षारोपणाचा निर्णय घेतला आहे. ९ व १६ जुलै रोजी हा

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सह्याद्री प्रतिष्ठानने पुरातत्त्व विभाग आणि वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने, राज्यातील ८ गडकिल्ल्यांवर वृक्षारोपणाचा निर्णय घेतला आहे. ९ व १६ जुलै रोजी हा उपक्रम राबवला जाणार आहे. भकास पडलेल्या गड-किल्ल्यांशेजारी वनसंपत्ती निर्माण केल्यास, पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल, असा विश्वास सह्याद्री प्रतिष्ठानने व्यक्त केला आहे.प्रतिष्ठानचे दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी सांगितले की, ‘९ जुलै रोजी कोरीगड या ठिकाणी वृक्षारोपण मोहीम हाती घेतली जाईल, तर १६ जुलैला कल्याण येथील ताहुली किल्ला, कर्जतमधील पेब (विकटगड) किल्ला आणि भिवगड, पाली येथील सुधागड व सरसगड, भिवंडीमधील फिरंग गड आणि चंद्रपूरमधील माणिकगड या ठिकाणी वृक्षारोपण केले जाईल. यामधील कोरीगड हा राज्य पुरातत्त्व विभागाच्या कक्षेत येतो. त्या ठिकाणी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांच्यासोबत शेकडो दुर्गप्रेमी वृक्षारोपण करतील.केवळ वृक्षारोपणापुरते मर्यादित न राहता, प्रतिष्ठानकडून या वृक्षांचे संवर्धनही केले जाणार आहे. एका किल्ल्याच्या परिसरात २०० झाडे लावण्याचा मानस आहे. झाडे जगविण्यास स्थानिकांची मदत घेतली जाणार आहे. त्यातून त्यांना रोजगारही निर्माण होईल. शोभेच्या झाडांना बगल देत, देशी झाडे लावण्याचा निर्णय प्रतिष्ठानने घेतला आहे. त्यात आंबा, करंज, कांचन, खैर, आपटा, आवळा, जांभूळ या झाडांचा समावेश आहे, असे रघुवीर यांनी सांगितले. दुर्गप्रेमींनो, झाडे लावताना ही काळजी घ्या!प्रतिष्ठानसोबत या मोहिमेत सामील होणाऱ्या दुर्गप्रेमींनी किल्ल्यांच्या परिसरात तट, बुरूज, दरवाजा, पाण्याच्या टाक्या आणि लेणी/गुहा अशा ठिकाणापासून सुमारे ५० ते १०० मीटर लांब झाडे लावावी. वृक्षलागवडीचे ठिकाण चुकले, तर झाडांची वाढ झाल्यावर, त्यांची मुळे ही काही काळाने तट, बुरूज, दरवाजे, टाके व इतर दगडी वास्तूला विळखा घालून वास्तूचे नुकसान करू शकतात, असेही प्रतिष्ठानने स्पष्ट केले.येथे लावा झाडे : गिरी-दुर्गावर मुख्य डोगर सोंड, उतरता किंवा घसारा असेल, अशा ठिकाणी झाडे लावण्याचे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे. उन्हाळ्यात भ्रमंती करत असताना, या झाडांचा फार उपयोग होतो. किल्ल्याच्या दगडी वास्तूपासून दूर वृक्षलागवड करावी. झाडाची वाढ, त्याची मुळे किती लांब जाणार? याची काळजी घेऊनच, वृक्षलागवड करण्याचे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.