शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

गड-किल्ल्यांवर वनसंपत्ती उभारणार

By admin | Updated: July 9, 2017 02:34 IST

सह्याद्री प्रतिष्ठानने पुरातत्त्व विभाग आणि वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने, राज्यातील ८ गडकिल्ल्यांवर वृक्षारोपणाचा निर्णय घेतला आहे. ९ व १६ जुलै रोजी हा

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सह्याद्री प्रतिष्ठानने पुरातत्त्व विभाग आणि वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने, राज्यातील ८ गडकिल्ल्यांवर वृक्षारोपणाचा निर्णय घेतला आहे. ९ व १६ जुलै रोजी हा उपक्रम राबवला जाणार आहे. भकास पडलेल्या गड-किल्ल्यांशेजारी वनसंपत्ती निर्माण केल्यास, पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल, असा विश्वास सह्याद्री प्रतिष्ठानने व्यक्त केला आहे.प्रतिष्ठानचे दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी सांगितले की, ‘९ जुलै रोजी कोरीगड या ठिकाणी वृक्षारोपण मोहीम हाती घेतली जाईल, तर १६ जुलैला कल्याण येथील ताहुली किल्ला, कर्जतमधील पेब (विकटगड) किल्ला आणि भिवगड, पाली येथील सुधागड व सरसगड, भिवंडीमधील फिरंग गड आणि चंद्रपूरमधील माणिकगड या ठिकाणी वृक्षारोपण केले जाईल. यामधील कोरीगड हा राज्य पुरातत्त्व विभागाच्या कक्षेत येतो. त्या ठिकाणी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांच्यासोबत शेकडो दुर्गप्रेमी वृक्षारोपण करतील.केवळ वृक्षारोपणापुरते मर्यादित न राहता, प्रतिष्ठानकडून या वृक्षांचे संवर्धनही केले जाणार आहे. एका किल्ल्याच्या परिसरात २०० झाडे लावण्याचा मानस आहे. झाडे जगविण्यास स्थानिकांची मदत घेतली जाणार आहे. त्यातून त्यांना रोजगारही निर्माण होईल. शोभेच्या झाडांना बगल देत, देशी झाडे लावण्याचा निर्णय प्रतिष्ठानने घेतला आहे. त्यात आंबा, करंज, कांचन, खैर, आपटा, आवळा, जांभूळ या झाडांचा समावेश आहे, असे रघुवीर यांनी सांगितले. दुर्गप्रेमींनो, झाडे लावताना ही काळजी घ्या!प्रतिष्ठानसोबत या मोहिमेत सामील होणाऱ्या दुर्गप्रेमींनी किल्ल्यांच्या परिसरात तट, बुरूज, दरवाजा, पाण्याच्या टाक्या आणि लेणी/गुहा अशा ठिकाणापासून सुमारे ५० ते १०० मीटर लांब झाडे लावावी. वृक्षलागवडीचे ठिकाण चुकले, तर झाडांची वाढ झाल्यावर, त्यांची मुळे ही काही काळाने तट, बुरूज, दरवाजे, टाके व इतर दगडी वास्तूला विळखा घालून वास्तूचे नुकसान करू शकतात, असेही प्रतिष्ठानने स्पष्ट केले.येथे लावा झाडे : गिरी-दुर्गावर मुख्य डोगर सोंड, उतरता किंवा घसारा असेल, अशा ठिकाणी झाडे लावण्याचे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे. उन्हाळ्यात भ्रमंती करत असताना, या झाडांचा फार उपयोग होतो. किल्ल्याच्या दगडी वास्तूपासून दूर वृक्षलागवड करावी. झाडाची वाढ, त्याची मुळे किती लांब जाणार? याची काळजी घेऊनच, वृक्षलागवड करण्याचे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.