शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

वनविभाग १५ हजार गावे दत्तक घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:46 IST

शाश्वत वन विकासासह वाघांच्या संवर्धनात स्थानिकांना सामावून घेण्यासाठी वनक्षेत्राजवळच्या गावांना वनविभाग मुख्य प्रवाहात आणणार आहे.

- गणेश वासनिकअमरावती : शाश्वत वन विकासासह वाघांच्या संवर्धनात स्थानिकांना सामावून घेण्यासाठी वनक्षेत्राजवळच्या गावांना वनविभाग मुख्य प्रवाहात आणणार आहे. वनाधिकारी आपल्या क्षेत्रातील गावे दत्तक घेणार आहे. या उपक्रमात जवळपास १५ हजार गावांचा समावेश होणार आहे.ब्रिटिशकाळात राज्यात सुमारे ४५ गावे वनग्राम म्हणून मान्य केली होती. महसूल खाते निर्माण झाल्यानंतर वनग्राम मान्यता संपुष्टात येऊन गावांना महसुली दर्जा दिला. त्यातच जाचक अटींमुळे वीज, रस्ते व पाणी यासारख्या मुलभूत गरजांची पूर्तता झाली नाही. त्याचा विपरित परिणाम वन्यप्राणी व जंगलावर होत आहे. वनविभागाने लोकांचा विश्वास संपादन करण्यास संयुक्त वन व्यवस्थापन जैविविधता आणि इको टुरिझम समिती तयार केली आहे. १६,७०० गावांत या समित्या कार्यरत आहेत. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी वन धन योजनेंतर्गंत वनग्राम समित्यांना गावांच्या विकासासाठी निधी देण्याचे वन विभागाचे धोरण आहे.अशी अंमलबजावणीगावाची मुलभूत गरज लक्षात घेऊन सूक्ष्म आराखडा तयार केला जाईल. यामध्ये जलमृदसंधारण, वनसंरक्षण, शिक्षण, रस्ते, सार्वजनिक व्यवस्था, आदींवर काम सुरू होईल. महसूल, कृषी विभागाच्या मदतीने या योजनांची अंमलबजावणी होईल.जंगल, वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी गाव दत्तक योजना आहे. ग्रामस्थांना त्यात सामावून घेत पर्यटन वाढीसह रोजगाराला प्राधान्य दिले जाणार आहे. - हेमंत मीणा, उपवनसंरक्षक, अमरावती

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र