शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

सरकारच्या कारभारावर लक्ष

By admin | Updated: September 24, 2015 02:15 IST

राज्यातील दुष्काळग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना नीट मिळतो की नाही

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना नीट मिळतो की नाही, यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांची फौज नजर ठेवणार आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यासाठीची एक योजना तयार केली आहे. दानवे यांनी आज ‘लोकमत’ला सांगितले की, या १४ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही, हे आमचे कार्यकर्ते बघतील़ कुठे उणिवा दिसल्या तर सरकारच्या लगेच नजरेस आणून देतील. प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल, तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर पक्षाच्या दुष्काळ समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. त्यांचा एकमेकांशी समन्वय असेल. प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये पक्षाकडून एक गाव निवडले जाईल आणि तेथे पक्षाच्या खर्चातून उपाययोजना करण्यात येणार आहेत. या गावांमध्ये किमान एक उल्लेखनीय अशी उपाययोजना पक्षाच्या वतीने केली जाईल. यासाठी चिंतन शिबिरे सुरू असून या ठिकाणी मिळालेली माहिती इतर कार्यकर्ते आणि सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम पक्ष पदाधिकारी/लोकप्रतिनिधी करतील, अशी माहिती दानवेंंनी दिली. पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री यांना या प्रक्रियेत सामावून घेण्यात येणार आहे. सरकार आणि पक्षात समन्वय आहेच. त्यासाठी स्थापन केलेल्या भाजपाच्या कोअर कमिटीची दर १५ दिवसांनी बैठक होते, पण खाली थेट गावापर्यंत हा समन्वय राहावा यासाठी नवीन यंत्रणा उपयोगी ठरेल, असे दानवे म्हणाले. सरकार आणि भाजपात समन्वयाचा अभाव असल्याची भावना असताना समन्वयाचा दानवे पॅटर्न येऊ घातला आहे. (विशेष प्रतिनिधी)