शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील तानसा नदीला आला पूर, घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 20:37 IST

गेल्या दोन दिवसांपासून सतत पडणा-या पावसामुळे तानसा धरणाचे दरवाजे उघडल्या गेल्याने भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथील तानसा नदीला पूर आल्याने अकलोली गणेशपुरी अनेक घरांमध्ये पाणी जाऊन अकलोली येथील गरम पाण्याची कुंडेही पाण्याखाली गेली आहेत.

भिवंडी, दि.29 - गेल्या दोन दिवसांपासून सतत पडणा-या पावसामुळे तानसा धरणाचे दरवाजे उघडल्या गेल्याने भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथील तानसा नदीला पूर आल्याने अकलोली गणेशपुरी अनेक घरांमध्ये पाणी जाऊन अकलोली येथील गरम पाण्याची कुंडेही पाण्याखाली गेली आहेत. ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसांपासून सतत जोरदार पाऊस पडत असल्याने आणि तानसा धरण पूर्ण भरल्याने त्याचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे येथील तानसा नदीला पूर येऊन अकलोली, गणेशपुरी येथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वज्रेश्वरी अकलोली रस्ता व वज्रेश्वरी केलथन पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने सुमारे सहा गावांचा संपर्क तुटला. अकलोली येथील गरम पाण्याची सर्व कुंडे पाण्याखाली गेली आहेत. सुमारे १२ते१५ घरांमध्ये आणि कुंडांजवळच्या दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं काही प्रमाणात वित्तहानी झाली परंतु नागरिकांनी वेळीच खबरदारी घेतल्याने कोणतीही जीवितहानी किंवा अधिक नुकसान झालेले नाही.

त्याचप्रमाणे गणेशपुरी येथील कॉलनीमध्येही पाणी शिरल्याने तेथील नागरिकांचे नुकसान झाले आहे आणि शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. गणेशोत्सवाची सुट्टी असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक पर्यटक आले होते पण पुरामुळे त्यांचे हाल झाले आहेत. या सर्व परिस्थितीची भिवंडी तहसीलदार शिशिकांत गायकवाड यांनी स्वतः अकलोली वज्रेश्वरी येथे येऊन पूर परिस्थितीची पाहणी करून बाधितांना नुकसानभरपाई करण्यासाठीचे आदेश संबंधिताना दिलेत.