शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भिवंडीतील तानसा नदीला आला पूर, घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 20:37 IST

गेल्या दोन दिवसांपासून सतत पडणा-या पावसामुळे तानसा धरणाचे दरवाजे उघडल्या गेल्याने भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथील तानसा नदीला पूर आल्याने अकलोली गणेशपुरी अनेक घरांमध्ये पाणी जाऊन अकलोली येथील गरम पाण्याची कुंडेही पाण्याखाली गेली आहेत.

भिवंडी, दि.29 - गेल्या दोन दिवसांपासून सतत पडणा-या पावसामुळे तानसा धरणाचे दरवाजे उघडल्या गेल्याने भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथील तानसा नदीला पूर आल्याने अकलोली गणेशपुरी अनेक घरांमध्ये पाणी जाऊन अकलोली येथील गरम पाण्याची कुंडेही पाण्याखाली गेली आहेत. ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसांपासून सतत जोरदार पाऊस पडत असल्याने आणि तानसा धरण पूर्ण भरल्याने त्याचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे येथील तानसा नदीला पूर येऊन अकलोली, गणेशपुरी येथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वज्रेश्वरी अकलोली रस्ता व वज्रेश्वरी केलथन पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने सुमारे सहा गावांचा संपर्क तुटला. अकलोली येथील गरम पाण्याची सर्व कुंडे पाण्याखाली गेली आहेत. सुमारे १२ते१५ घरांमध्ये आणि कुंडांजवळच्या दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं काही प्रमाणात वित्तहानी झाली परंतु नागरिकांनी वेळीच खबरदारी घेतल्याने कोणतीही जीवितहानी किंवा अधिक नुकसान झालेले नाही.

त्याचप्रमाणे गणेशपुरी येथील कॉलनीमध्येही पाणी शिरल्याने तेथील नागरिकांचे नुकसान झाले आहे आणि शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. गणेशोत्सवाची सुट्टी असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक पर्यटक आले होते पण पुरामुळे त्यांचे हाल झाले आहेत. या सर्व परिस्थितीची भिवंडी तहसीलदार शिशिकांत गायकवाड यांनी स्वतः अकलोली वज्रेश्वरी येथे येऊन पूर परिस्थितीची पाहणी करून बाधितांना नुकसानभरपाई करण्यासाठीचे आदेश संबंधिताना दिलेत.