शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

राज्यात मुसळधार, अनेक नद्यांना पूर

By admin | Updated: August 1, 2016 04:16 IST

पुष्य नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत मुंबई, ठाण्यासह कोकणात जोरदार हजेरी लावली.

औरंगाबाद/पुणे : गेल्या पंधरा दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसाने पुष्य नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत मुंबई, ठाण्यासह कोकणात जोरदार हजेरी लावली. मराठवाड्यात सर्वदूर पाऊस झाला. विशेषत: तहानलेल्या लातूर आणि उस्मानाबादमध्येही जोरदार सरी बरसल्याने शेतकरी सुखावला आहे. लातूरची मांजरा, तेरणा, घरणी, रेणा नद्या दोन वर्षांत प्रथमच दुथडी भरून वाहायला लागल्या आहेत. धरणांचा पाणीसाठा वाढल्याने शहराला नळाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. राज्यातील धरणांच्या साठ्यातही मोठी वाढ झाली आहे. नाशिक, कोल्हापूर, साताऱ्यात हलक्या सरी बरसल्या. विदर्भातही संततधार सुरू आहे. लातूर जिल्ह्यातील २५ महसूल मंडळांत ६५ मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने पिके पाण्याखाली गेली. हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांत प्रत्येकी एक असे दोघे पुरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात सरासरी १८़१० मिमी पाऊस झाला. जालना, परभणी जिल्ह्यांत काही ठिकाणी पाऊस झाला. मुंबई, ठाण्यात पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर हलक्या सरी झाल्या. सांगली जिल्ह्यात चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. गेल्या २४ तासांत विदर्भात चंद्रपूर, वर्धा, यवतमाळमध्ये चांगला पाऊस झाला. त्यामुळे ठिकठिकाणचे नदी, ओढे, नाले भरभरून वाहत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क) >मराठवाड्याला दिलासानाशिक जिल्ह्यात गंगापूर धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने जलसाठा ८० टक्क्यांपर्यंत वाढला. दिवसभरात दोन टप्प्यांत धरणातून दोन हजार ७४० क्यूसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला. धरणातून पाणी सोडल्याने मराठवाड्याला दिलासा मिळणार आहे.लातूरला नळाने पाणी देणारलातूरला तब्बल साडेसहा महिन्यांनंतर नळाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. मांजरा नदीवरील साई, नागझरी, पोहरेगाव, वांजरखेडा बॅरेजेसमध्ये पाणी साठल्याने महापालिकेकडून नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुसळधार पावसाचा इशारापुढील तीन-चार दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.