शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

७०८ गावांना पुराचा वेढा; राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 06:23 IST

२.४७ लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले; जीवनावश्यक वस्तू, दूध, भाजीपाला यांचा तुटवडा

कोल्हापूर/सांगली/मुंबई : मुसळधार पाऊस आणि धरणांतील विसर्गामुळे प्रमुख नद्यांनी धोक्याची लक्ष्मणरेषा ओलांडल्याने कोल्हापूर आणि सांगलीत पूरपरिस्थिती गंभीर बनली असून अजूनही हजारो लोक पुरात अडकून पडले आहेत. चार दिवसांनंतरही मदत न पोहोचल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील तब्बल ७०८ गावांना गेल्या काही दिवसांतील पुराचा फटका बसला असून तब्बल २ लाख ४७ हजार जणांना विविध यंत्रणांद्वारे सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. राज्यात राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो गावांना पुराचा वेढा पडल्यामुळे रस्ते वाहतूक बंद आहे. कोल्हापुरातील गोकुळसह इतर दूध संघाचे संकलन बंद आहे. दूध, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा होऊ शकला नाही. पाऊस थांबल्याने पूर ओसरू लागला असला तरी आता रोगराई पसरण्याची भीती आहे.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर परिसरातील पूरस्थितीची हवाई पाहाणी केली. सांगली आणि कोल्हापूरमधील पुरस्थिती अतिशय गंभीर असून पंजाब, गोवा, गुजरातमधून मागवण्यात आलेल्या अतिरिक्त पथकांच्या माध्यमातून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. एनडीआरएफ, लष्कर, हवाई दलाच्या मदतीने पूरग्रस्तांना एअरलिफ्टने बाहेर काढण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. राष्ट्रीय आपत्तीच्या धर्तीवरच युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात येत असून योग्यवेळी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पूरग्रस्त १० जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफची २४ पथके कार्यरत असून त्यातील सहा कोल्हापूर जिल्ह्यात तर ११ सांगली जिल्ह्यात आहेत. तटरक्षक व इतर कार्यरत दलांची संख्या २० आहे. ३२२ तात्पुरते निवारे तयार करण्यात आले आहेत.बोट उलटून १२ जणांना जलसमाधी; सांगलीतील दुर्घटना, २० जणांना वाचविण्यात यशसांगली/पलूस : ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी नेत असतानाच बोट पलटी होऊन १२ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी नऊ जणांचे मृतदेह सापडले असून उरलेले बेपत्ता आहेत. बोटीतील इतर २० जणांना वाचविण्यात यश आले. मृतांत २ बालकांसह ७ महिलांचा समावेश आहे.ब्रह्मनाळ येथे कृष्णा व येरळा नदीचा संगम होतो. कृष्णा नदीला महापूर आला असून संपूर्ण ब्रह्मनाळ गावाला महापुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. ग्रामपंचायतीच्या दोन बोटींतून गावात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास २ दिवसापांसून बचावकार्य सुरू होते. गुरुवारी सकाळी याच बोटीतून नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात येत होते. मात्र बोटीत क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे ३५ ते ३७ जण बसले होते. त्यातच बोटीचा पंखा पाण्यातील झाडाझुडुपांत व पाण्याखालील तारेत अडकला. त्यामुळे बोट उलटली. पाण्याला प्रचंड वेग असल्याने काहीही करता आले नाही. थोड्या अंतरावर खटावचे तरुण ब्रम्हनाळच्या नागरिकांना पाण्याबाहेर काढत होते. आरडाओरडा ऐकून त्यांनी तातडीने पाण्यात उड्या घेतल्या. काही तरुणांनी दोन काहिलींच्या मदतीने बोटीकडे धाव घेतली. त्यांना बुडालेल्या काहींना वाचवण्यात यश आले. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना ५ लाख रुपये मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूर