शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पंढरपुरात पूर लागला ओसरू; वाढू लागली दलदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 11:00 IST

रोगराई रोखण्याचे आव्हान : विस्थापितांना मोफत धान्यांचे वाटप

ठळक मुद्देउजनी व वीरभाटघर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीला महापूरपुराचे पाणी शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण, संत पेठ, कोळी गल्ली, कुंभार गल्ली आदी भागात शिरलेकाही अर्धी गावे पुराच्या पाण्यात असल्याने तेथील शेकडो कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले

पंढरपूर : उजनी व वीर भाटघर धरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीला आलेला पूर दोन दिवसांनंतर ओसरू लागला आहे. त्यामुळे पुरात बुडालेली अनेक घरे रिकामी होत आहेत. ज्या गावांचा संपर्क तुटला होता त्या गावांचा संपर्क होत आहे. मात्र पुरामुळे अनेक घरांमध्ये चिखलसदृश परिस्थिती, उग्र वास असल्याने रोगराई रोखण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे. पुरामुळे विस्थापित झालेल्यांना प्रशासनाकडून १० किलो गहू व १० किलो तांदळाचे वाटप करून दिलासा देण्यात येत  आहे.

उजनी व वीरभाटघर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीला महापूर आला होता. या पुराचे पाणी शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण, संत पेठ, कोळी गल्ली, कुंभार गल्ली आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरले होते़ तसेच तालुक्यातील आव्हे, तरटगाव, पटवर्धन कुरोली, देवडे, खेडभाळवणी, खेडभोसे, व्होळे, गुरसाळे,  चिंचोली भोसे, भटुंबरे, कौठाळी, शिरढोण, शेळवे, पिराची कुरोली, खळवे, वाखरी, पंढरपूर, गोपाळपूर, देगाव, अजनसोंड, सुस्ते, मुंढेवाडी, चळे, सरकोली या गावांना पुराचा तडाखा बसला होता. यामधील अनेक गावांना पुराने वेढा दिल्याने गावांचा संपर्क तुटला होता.

 काही अर्धी गावे पुराच्या पाण्यात असल्याने तेथील शेकडो कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले होते. या पुरामुळे शेकडो हेक्टर ऊस शेतीचे कोट्यवधी  रुपयांचे नुकसान झाले होते. तीन दिवसांनंतर आता पूर ओसरू लागला आहे. 

गावांचा संपर्क होऊ लागलापुराच्या पाण्याने वेढा दिल्याने पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली, देवडे, शेळवे, खेडभोसे, चिंचोली भोसे, शिरढोण, कौठाळी, भटुंबरे, सुस्ते, अजनसोंड आदी गावांचा संपर्क तुटला होता. गावाला जोडणाºया सर्व रस्त्यांवर पाणी असल्याने गावातील नागरिकांना बाहेर व बाहेरच्या नागरिकांना गावात जाता येत नव्हते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र आता तीन दिवसांनंतर पुराचे पाणी ओसरल्याने गावांना जोडणारे रस्तेही उघडे होत आहेत.

घरांमध्ये सर्वत्र चिखलच चिखल- भीमा नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील व तालुक्यातील अनेक गावातील आठ हजारांपेक्षा जास्त घरे पाण्यात गेली होती. आता पूर ओसरल्यानंतर ही घरे उघडी होत आहेत. घरात पुराचे पाणी शिरल्याने त्या ठिकाणी दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे चिखलसदृश परिस्थिती, उग्र वास, जलचर प्राण्यांचे दर्शन होत असल्याने रोगराई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. ही रोगराई रोखण्यासाठी आरोग्य विभागातर्फे खास पथके नेमून जंतुनाशक पावडरची फवारणी, लसीकरण व आपद्ग्रस्त नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहीम उघडावी, असे बोलले जात आहे़

टॅग्स :SolapurसोलापूरfloodपूरPandharpurपंढरपूरwater transportजलवाहतूकUjine Damउजनी धरण