शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

पंढरपुरात पूर लागला ओसरू; वाढू लागली दलदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 11:00 IST

रोगराई रोखण्याचे आव्हान : विस्थापितांना मोफत धान्यांचे वाटप

ठळक मुद्देउजनी व वीरभाटघर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीला महापूरपुराचे पाणी शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण, संत पेठ, कोळी गल्ली, कुंभार गल्ली आदी भागात शिरलेकाही अर्धी गावे पुराच्या पाण्यात असल्याने तेथील शेकडो कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले

पंढरपूर : उजनी व वीर भाटघर धरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीला आलेला पूर दोन दिवसांनंतर ओसरू लागला आहे. त्यामुळे पुरात बुडालेली अनेक घरे रिकामी होत आहेत. ज्या गावांचा संपर्क तुटला होता त्या गावांचा संपर्क होत आहे. मात्र पुरामुळे अनेक घरांमध्ये चिखलसदृश परिस्थिती, उग्र वास असल्याने रोगराई रोखण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे. पुरामुळे विस्थापित झालेल्यांना प्रशासनाकडून १० किलो गहू व १० किलो तांदळाचे वाटप करून दिलासा देण्यात येत  आहे.

उजनी व वीरभाटघर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीला महापूर आला होता. या पुराचे पाणी शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण, संत पेठ, कोळी गल्ली, कुंभार गल्ली आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरले होते़ तसेच तालुक्यातील आव्हे, तरटगाव, पटवर्धन कुरोली, देवडे, खेडभाळवणी, खेडभोसे, व्होळे, गुरसाळे,  चिंचोली भोसे, भटुंबरे, कौठाळी, शिरढोण, शेळवे, पिराची कुरोली, खळवे, वाखरी, पंढरपूर, गोपाळपूर, देगाव, अजनसोंड, सुस्ते, मुंढेवाडी, चळे, सरकोली या गावांना पुराचा तडाखा बसला होता. यामधील अनेक गावांना पुराने वेढा दिल्याने गावांचा संपर्क तुटला होता.

 काही अर्धी गावे पुराच्या पाण्यात असल्याने तेथील शेकडो कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले होते. या पुरामुळे शेकडो हेक्टर ऊस शेतीचे कोट्यवधी  रुपयांचे नुकसान झाले होते. तीन दिवसांनंतर आता पूर ओसरू लागला आहे. 

गावांचा संपर्क होऊ लागलापुराच्या पाण्याने वेढा दिल्याने पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली, देवडे, शेळवे, खेडभोसे, चिंचोली भोसे, शिरढोण, कौठाळी, भटुंबरे, सुस्ते, अजनसोंड आदी गावांचा संपर्क तुटला होता. गावाला जोडणाºया सर्व रस्त्यांवर पाणी असल्याने गावातील नागरिकांना बाहेर व बाहेरच्या नागरिकांना गावात जाता येत नव्हते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र आता तीन दिवसांनंतर पुराचे पाणी ओसरल्याने गावांना जोडणारे रस्तेही उघडे होत आहेत.

घरांमध्ये सर्वत्र चिखलच चिखल- भीमा नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील व तालुक्यातील अनेक गावातील आठ हजारांपेक्षा जास्त घरे पाण्यात गेली होती. आता पूर ओसरल्यानंतर ही घरे उघडी होत आहेत. घरात पुराचे पाणी शिरल्याने त्या ठिकाणी दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे चिखलसदृश परिस्थिती, उग्र वास, जलचर प्राण्यांचे दर्शन होत असल्याने रोगराई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. ही रोगराई रोखण्यासाठी आरोग्य विभागातर्फे खास पथके नेमून जंतुनाशक पावडरची फवारणी, लसीकरण व आपद्ग्रस्त नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहीम उघडावी, असे बोलले जात आहे़

टॅग्स :SolapurसोलापूरfloodपूरPandharpurपंढरपूरwater transportजलवाहतूकUjine Damउजनी धरण