शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
2
“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी
3
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
4
Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
5
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
6
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
7
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
8
शाळांच्या सहलीसाठी मिळणार 'एसटी'च्या नव्या बसेस; विद्यार्थ्यांना घेता येणार संस्मरणीय अनुभव
9
भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू
10
Farming: ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार ५० हजार
11
आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम
12
IND vs SA : द.आफ्रिकेचा कर्णधार बावुमाचं नाबाद अर्धशतक! टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट
13
Bigg Boss 19: शिव ठाकरेचा 'महाराष्ट्रीयन भाऊ'ला फूल सपोर्ट! प्रणित मोरेसाठी केली पोस्ट, म्हणाला- "भाऊ..."
14
बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
15
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
16
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
17
“काँग्रेस कधीच संपत नसते, जनतेचा विश्वास, पक्ष पुन्हा ताकदीने उभी राहतो”: रमेश चेन्नीथला
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
19
धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू
20
Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

झेंडा फिरला; पण सौदा नाही! व्यापाऱ्यांचा बहिष्कार, बाजार समितीतील व्यवहार ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 19:19 IST

हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी केल्यास व्यापा-यांवर खटले दाखल केले जातील, असे निर्देश राज्य मंत्रिमंडळाने दिल्याने व्यापा-यांनी शेतमाल खरेदी करण्यास बहिष्कार टाकला आहे.

लातूर : हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी केल्यास व्यापा-यांवर खटले दाखल केले जातील, असे निर्देश राज्य मंत्रिमंडळाने दिल्याने व्यापा-यांनी शेतमाल खरेदी करण्यास बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे मंगळवारी मार्केट यार्डात झेंडा फिरला; परंतु सौदा झाला नाही. परिणामी, जिल्ह्यातील अकराही बाजार समित्यांतील व्यवहार दुस-या दिवशीही ठप्प होते.हमीभावाने शेतमाल खरेदी करावा, असे निर्देश शासनाने बाजार समित्यांना दिले आहेत. मात्र व्यापारी हमीभावाप्रमाणे शेतमाल खरेदी करण्यास नकार देत चक्क खरेदी करणे बंद केले आहे. व्यापा-यांच्या या भूमिकेमुळे सध्या बाजार समित्या बंद आहेत. सध्या मुगाला ६ हजार ९५० रुपये प्रति क्विंटल हमीभाव आहे. परंतु, बाजारात ४ हजार १०० रुपयांप्रमाणे मूग खरेदी केला जात आहे. एखाद्या शेतक-याने हमीभावाप्रमाणे मूग खरेदी झाला नाही, अशी तक्रार केली तर संबंधित व्यापा-यांवर खटले दाखल होऊन दंड व एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. या धास्तीमुळे व्यापा-यांनी खरेदी करणेच बंद केले आहे. जिल्ह्यातील लातूर, मुरुड, जळकोट, देवणी, अहमदपूर, औसा, शिरूर अनंतपाळ, चाकूर, निलंगा, रेणापूर, उदगीर या अकराही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारपेठेत शेतमाल खरेदी होऊ शकला नाही. सध्या बाजारपेठेत मुगाची आवक सुरू झाली आहे. शेतकरी मूग विक्री करून देणे-घेण्याची सारवासारव करीत असतो. शिवाय, श्रावण महिना चालू असून, पोळ्याचा सणही तोंडावर आहे. या सणाच्या खर्चासाठी शेतकरी मुगाची विक्री करीत असतो. परंतु, सध्या शासनाने व्यापारी आणि शेतक-यांमध्ये तेढ निर्माण करून कोंडीत पकडले आहे. वास्तविक पाहता हमीभाव जाहीर करणे आणि ती देण्याची जबाबदारी शासनाची असते. मात्र ती जबाबदारी व्यापा-यांवर ढकलून शासनाने व्यापा-यांत आणि शेतक-यांत भांडण लावण्याचा प्रकार केला असल्याचे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते म्हणत आहेत. 

बाजारभाव अन् हमीभावात तफावत... मुगाचा हमीभाव ६ हजार ९५० रुपये आहे. बाजारात ४ हजार १०० रुपयाला तो खरेदी केला जात आहे. हमीभाव आणि बाजारभावात अडीच हजारांची तफावत आहे. बहुतेक धान्याचा हमीभाव आणि प्रत्यक्ष बाजारात मिळणारा हमीभाव यातही तफावत आहे. मग अशावेळी खटले दाखल झाले तर ती मोठी यादी होईल. यापूर्वी हमीभावाने धान्य खरेदी न केल्यास व्यापा-यांना नोटिसा देणे, काही दिवसांसाठी त्यांचा परवाना रद्द करणे या अटी होत्या. पण आता मंत्रिमंडळाने नवीन अध्यादेश काढून व्यापा-यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे व्यापा-यांनी खरेदीवर बहिष्कार घातला आहे. 

बाजार सुरू ठेऊन लढा द्यावा... हमीभाव देण्याची जबाबदारी शासनाचीच आहे. ती व्यापा-यांवर ढकलता येणार नाही. त्यामुळे व्यापा-यांनी बाजार बंद ठेवून शेतक-यांना अडचणीत आणू नये. बाजार चालू ठेवून आपला लढा चालू ठेवावा. शेतकरी संघटना तुमच्या सोबत राहील. बाजारपेठ बंद न करता न्याय मार्गाने लढा लढावा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी केले आहे.

टॅग्स :laturलातूरMaharashtraमहाराष्ट्र