शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीमधून पाच टॉपर; बॉटमवर नागपूरची हॅट्ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 01:57 IST

आजवरच्या १६ निवडणुकांमध्ये प्राप्त मतदानाच्या टक्केवारीत सर्वाधिक ९ टॉपर काँग्रेसचे, ३ टॉपर राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि भाजपा, शिनसेना, शेकाप व पीएसपी या पक्षांचा प्रत्येकी एक विजयी उमेदवार टॉपर ठरला.

- प्रेमदास राठोडआजवरच्या लोकसभेच्या या सार्वत्रिक निवडणुकीत राज्यातून कोणता विजेता होणार मतदानाच्या टक्केवारीत टॉपर आणि कोण गाठणार तळ ? आजवरच्या १६ निवडणुकांमध्ये प्राप्त मतदानाच्या टक्केवारीत सर्वाधिक ९ टॉपर काँग्रेसचे, ३ टॉपर राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि भाजपा, शिनसेना, शेकाप व पीएसपी या पक्षांचा प्रत्येकी एक विजयी उमेदवार टॉपर ठरला. बारामतीने आजवर ५ टॉपर दिले. कराडने निवडलेले चार उमेदवार टॉपर ठरले तर साताऱ्याने दोन टॉपर दिले. इतर पाच मतदारसंघांनी एक-एकदा टॉपर दिले. १९९८ ते २००९ अशा लागोपाठ चार निवडणुकांमध्ये सतत टॉपर देण्याची बारामतीची घोडदौड २०१४ मध्ये भाजपाचे गोपाळ शेट्टी (मुंबई उत्तर) यांनी रोखली होती. शेट्टी यांना त्यावेळी राज्यातून सर्वाधिक ७०.१५ टक्के मते मिळाली तर रायगडमधून बाजी मारलेले शिवसेनेचे अनंत गीते यांना सर्वांत कमी ४०.११ टक्के मते पडली होती. विशेष म्हणजे हेच गीते १९९६ च्या निवडणुकीत ५८.५४ मतांसह राज्यात टॉपर होते.बारामतीने लागोपाठ चार निवडणुकांमध्ये टॉपर दिले. २००९ मध्ये बारामतीमधून विजयी झालेल्या सुप्रिया सुळे यांना सर्वाधिक ६६.४६ टक्के पडली होती. त्यापूर्वीच्या तीन निवडणुकांमध्ये शरद पवार टॉपर होते. १९९८ मध्ये पवार यांना सर्वाधिक ६५.८१ टक्के, १९९९ मध्ये सर्वाधिक ५७.७८ टक्के तर २००४ मध्ये शानदार ७१.०३ टक्के मते मिळाली होती. त्यापूर्वी १९९६ मध्ये अनंत गीते यांनी ब्रेक लावला नसता तर लागोपाठ सहावेळा टॉपर देण्याचा विक्रम बारामतीने नोंदवला असता. कारण १९९१ च्या निवडणुकीत बारामतीत ७५.०४ टक्के मतांसह बाजी मारलेले अजित पवार टॉपर ठरले होते. अजित पवार यांचा ७५ टक्के मतांचा विक्रम गेल्या ६ सार्वत्रिक निवडणुकांत कोणालाही मोडता आलेला नाही. सर्वाधिक तीन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राज्यातून मतांच्या सर्वांत कमी टक्केवारीसह उमेदवारांना विजयी करण्याचा विक्रम नागपूरच्या नावावर आहे. १९६२ मध्ये अपक्ष बापूजी अणे (४०.५३ टक्के), १९७१ मध्ये फॉरवर्ड ब्लॉकचे जांबुवंतराव धोटे (३७.०९ टक्के) आणि १९७७ मध्ये विजयी झालेले काँग्रेसचे गेव्ह आवारी (४४.५५ टक्के) हे तिघे मतदानाच्या टक्केवारीत राज्यात सर्वांत मागे होते. प्राप्त मतांच्या टक्केवारीत त्या-त्या निवडणुकीत राज्यातून टॉपर ठरलेले इतर विजयी उमेदवार : प्रतापराव भोसले (१९८९ सातारा ८१.९४ टक्के), प्रेमलाबाई चव्हाण (१९८४ कराड, ८३.०९ टक्के), उषाताई चौधरी (१९८० अमरावती, ७१.६८ टक्के), यशवंतराव चव्हाण (१९७७ सातारा, ७६.३८ टक्के), साताऱ्यातून लागोपाठ तीनदा दाजीसाहेब चव्हाण (१९७१ मध्ये ८६.२६ टक्के, १९६७ मध्ये ७४.६९ टक्के व १९६२ मध्ये ७१.४९ टक्के), नाथ पै (१९५७ राजापूर ८०.६५ टक्के) आणि नारायणराव वाघमारे (१९५१ परभणी, ६६.०१ टक्के).

टॅग्स :ElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक