शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

भरपाईच्या प्रतीक्षेत पाच हजार कुटुंबीय

By admin | Updated: February 26, 2015 01:59 IST

रेल्वे प्रवासात एखाद्या प्रवाशाचा अपघात झाल्यास त्या प्रवाशाला किंवा त्याच्या कुटुंबीयांना रेल्वे न्यायालयाकडून नुकसान भरपाई दिली जाते. मा

मुंबई : रेल्वे प्रवासात एखाद्या प्रवाशाचा अपघात झाल्यास त्या प्रवाशाला किंवा त्याच्या कुटुंबीयांना रेल्वे न्यायालयाकडून नुकसान भरपाई दिली जाते. मात्र ही नुकसान भरपाई घेण्यासाठी अनेक कुटुंबीयांना प्रतीक्षा करावी लागते. गेल्या चार वर्षांत अशा तऱ्हेने नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत पाच हजार रेल्वे अपघातग्रस्तांचे कुटुंबीय असल्याचे समोर आले आहे.रेल्वे प्रवासात वर्षाला चार ते पाच हजार प्रवाशांचे अपघात होतात. यात अनेक प्रवासी ठार तर काही प्रवासी जखमीही होतात. अशा प्रवाशांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी रेल्वे न्यायालयात केलेल्या दाव्यानुसार नुकसान भरपाई दिली जाते. रेल्वे तिकीट किंवा पास असणारा प्रवासी गाडीत चढताना किंवा उतरताना पडला तसेच डब्यात दरवाजाजवळ उभा असणारा प्रवासी तोल जाऊन पडला तर अशा प्रवाशालाच किंवा त्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याचा नियम आहे. यामध्ये ठार झालेल्या प्रवाशाच्या नातेवाइकांना जास्तीत जास्त चार लाखांपर्यंत तर जखमी प्रवाशाला आखून दिलेल्या नियमानुसार एक लाखापासून ते चार लाखांपर्यंत नुकसान भरपाई दिली जाते. ही नुकसान भरपाई मिळविण्यासाठी प्रवासी किंवा त्यांच्या नातेवाइकाला रेल्वे न्यायालयाकडे मात्र खेटा माराव्या लागतात आणि यातच त्यांचे आयुष्य जाते. अशा तऱ्हेने २0११ पासून ते २0१४ पर्यंत नुकसान भरपाईच्या एकूण ५ हजार ८५ केसेस प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. २0११ साली १,२११ केसेस प्रलंबित होत्या. हीच संख्या २0१४ मध्ये वाढून १,२६८ एवढी झाली आहे. याबाबत रेल्वे अ‍ॅक्सिडेंट व्हिक्टिम असोसिएशनचे अध्यक्ष विजय चौगुले यांनी सांगितले की, या केसेस लवकरात लवकर मार्गी लागणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. नुकसान भरपाईसाठी त्या प्रवाशाला किंवा त्यांच्या कुटुंबीयांना तिकीट किंवा पास सादर करणे महत्त्वाचे असते आणि हाच पुरावा काही वेळेला प्रवाशाला किंवा त्याच्या कुटुंबीयांना सादर करताना डोकेदुखी ठरत असतो. महत्त्वाची बाब म्हणजे आता रेल्वेकडून नुकसान भरपाई देण्याच्या कायद्यात बदल करण्याचा विचार केला जात आहे. यामध्ये अपघात झाल्यास भरपाई न देण्याची तरतूद करण्याचा विचार केला जात आहे.