शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

भरपाईच्या प्रतीक्षेत पाच हजार कुटुंबीय

By admin | Updated: February 26, 2015 01:59 IST

रेल्वे प्रवासात एखाद्या प्रवाशाचा अपघात झाल्यास त्या प्रवाशाला किंवा त्याच्या कुटुंबीयांना रेल्वे न्यायालयाकडून नुकसान भरपाई दिली जाते. मा

मुंबई : रेल्वे प्रवासात एखाद्या प्रवाशाचा अपघात झाल्यास त्या प्रवाशाला किंवा त्याच्या कुटुंबीयांना रेल्वे न्यायालयाकडून नुकसान भरपाई दिली जाते. मात्र ही नुकसान भरपाई घेण्यासाठी अनेक कुटुंबीयांना प्रतीक्षा करावी लागते. गेल्या चार वर्षांत अशा तऱ्हेने नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत पाच हजार रेल्वे अपघातग्रस्तांचे कुटुंबीय असल्याचे समोर आले आहे.रेल्वे प्रवासात वर्षाला चार ते पाच हजार प्रवाशांचे अपघात होतात. यात अनेक प्रवासी ठार तर काही प्रवासी जखमीही होतात. अशा प्रवाशांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी रेल्वे न्यायालयात केलेल्या दाव्यानुसार नुकसान भरपाई दिली जाते. रेल्वे तिकीट किंवा पास असणारा प्रवासी गाडीत चढताना किंवा उतरताना पडला तसेच डब्यात दरवाजाजवळ उभा असणारा प्रवासी तोल जाऊन पडला तर अशा प्रवाशालाच किंवा त्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याचा नियम आहे. यामध्ये ठार झालेल्या प्रवाशाच्या नातेवाइकांना जास्तीत जास्त चार लाखांपर्यंत तर जखमी प्रवाशाला आखून दिलेल्या नियमानुसार एक लाखापासून ते चार लाखांपर्यंत नुकसान भरपाई दिली जाते. ही नुकसान भरपाई मिळविण्यासाठी प्रवासी किंवा त्यांच्या नातेवाइकाला रेल्वे न्यायालयाकडे मात्र खेटा माराव्या लागतात आणि यातच त्यांचे आयुष्य जाते. अशा तऱ्हेने २0११ पासून ते २0१४ पर्यंत नुकसान भरपाईच्या एकूण ५ हजार ८५ केसेस प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. २0११ साली १,२११ केसेस प्रलंबित होत्या. हीच संख्या २0१४ मध्ये वाढून १,२६८ एवढी झाली आहे. याबाबत रेल्वे अ‍ॅक्सिडेंट व्हिक्टिम असोसिएशनचे अध्यक्ष विजय चौगुले यांनी सांगितले की, या केसेस लवकरात लवकर मार्गी लागणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. नुकसान भरपाईसाठी त्या प्रवाशाला किंवा त्यांच्या कुटुंबीयांना तिकीट किंवा पास सादर करणे महत्त्वाचे असते आणि हाच पुरावा काही वेळेला प्रवाशाला किंवा त्याच्या कुटुंबीयांना सादर करताना डोकेदुखी ठरत असतो. महत्त्वाची बाब म्हणजे आता रेल्वेकडून नुकसान भरपाई देण्याच्या कायद्यात बदल करण्याचा विचार केला जात आहे. यामध्ये अपघात झाल्यास भरपाई न देण्याची तरतूद करण्याचा विचार केला जात आहे.