शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भरपाईच्या प्रतीक्षेत पाच हजार कुटुंबीय

By admin | Updated: February 26, 2015 01:59 IST

रेल्वे प्रवासात एखाद्या प्रवाशाचा अपघात झाल्यास त्या प्रवाशाला किंवा त्याच्या कुटुंबीयांना रेल्वे न्यायालयाकडून नुकसान भरपाई दिली जाते. मा

मुंबई : रेल्वे प्रवासात एखाद्या प्रवाशाचा अपघात झाल्यास त्या प्रवाशाला किंवा त्याच्या कुटुंबीयांना रेल्वे न्यायालयाकडून नुकसान भरपाई दिली जाते. मात्र ही नुकसान भरपाई घेण्यासाठी अनेक कुटुंबीयांना प्रतीक्षा करावी लागते. गेल्या चार वर्षांत अशा तऱ्हेने नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत पाच हजार रेल्वे अपघातग्रस्तांचे कुटुंबीय असल्याचे समोर आले आहे.रेल्वे प्रवासात वर्षाला चार ते पाच हजार प्रवाशांचे अपघात होतात. यात अनेक प्रवासी ठार तर काही प्रवासी जखमीही होतात. अशा प्रवाशांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी रेल्वे न्यायालयात केलेल्या दाव्यानुसार नुकसान भरपाई दिली जाते. रेल्वे तिकीट किंवा पास असणारा प्रवासी गाडीत चढताना किंवा उतरताना पडला तसेच डब्यात दरवाजाजवळ उभा असणारा प्रवासी तोल जाऊन पडला तर अशा प्रवाशालाच किंवा त्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याचा नियम आहे. यामध्ये ठार झालेल्या प्रवाशाच्या नातेवाइकांना जास्तीत जास्त चार लाखांपर्यंत तर जखमी प्रवाशाला आखून दिलेल्या नियमानुसार एक लाखापासून ते चार लाखांपर्यंत नुकसान भरपाई दिली जाते. ही नुकसान भरपाई मिळविण्यासाठी प्रवासी किंवा त्यांच्या नातेवाइकाला रेल्वे न्यायालयाकडे मात्र खेटा माराव्या लागतात आणि यातच त्यांचे आयुष्य जाते. अशा तऱ्हेने २0११ पासून ते २0१४ पर्यंत नुकसान भरपाईच्या एकूण ५ हजार ८५ केसेस प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. २0११ साली १,२११ केसेस प्रलंबित होत्या. हीच संख्या २0१४ मध्ये वाढून १,२६८ एवढी झाली आहे. याबाबत रेल्वे अ‍ॅक्सिडेंट व्हिक्टिम असोसिएशनचे अध्यक्ष विजय चौगुले यांनी सांगितले की, या केसेस लवकरात लवकर मार्गी लागणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. नुकसान भरपाईसाठी त्या प्रवाशाला किंवा त्यांच्या कुटुंबीयांना तिकीट किंवा पास सादर करणे महत्त्वाचे असते आणि हाच पुरावा काही वेळेला प्रवाशाला किंवा त्याच्या कुटुंबीयांना सादर करताना डोकेदुखी ठरत असतो. महत्त्वाची बाब म्हणजे आता रेल्वेकडून नुकसान भरपाई देण्याच्या कायद्यात बदल करण्याचा विचार केला जात आहे. यामध्ये अपघात झाल्यास भरपाई न देण्याची तरतूद करण्याचा विचार केला जात आहे.