शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

राज्यात मान्सूनपूर्व पावसाने घेतले पाच बळी; नगर, नाशिक, लातूरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 06:12 IST

पुढील पाच दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

मुंबई : राज्यभरात शनिवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. नगर, नाशिक आणि लातूर जिल्ह्यांत वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाले तर विद्युतखांब व ताराही तुटल्या. पुढील पाच दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.पुणे, सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. रत्नागिरीतील खेड परिसरात मुसळधार पाऊस बरसला. रायगडमधील पाेलादपूर, माणगाव, महाड, म्हसळा या तालुक्यांतील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली.नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात उसाच्या शेतात खत टाकत असताना वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथे वीज अंगावर पडून महिलेसह चार शेळ्या ठार झाल्या. नगर जिल्ह्यात पारनेर, श्रीगोंदा, जामखेडमध्ये पाऊस झाला.मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. लातूरमध्ये झाडाखाली थांबलेल्या आजी व नातीचा वीज पडून मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे ५० पेक्षा जास्त घरावरील पत्रे उडाले. विद्युतखांब व ताराही तुटल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील निलंगासह परिसरात दीड तास जोरदार पाऊस झाला.विदर्भाला झोडपलेविदर्भातील वाशिम, बुलडाणा, नागपूर, वर्धा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. वाशिममध्ये वाऱ्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडण्यासह झाडे उन्मळून पडली. बुलडाणा जिल्ह्यात चिखली, बुलडाणा तालुक्याच्या काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला.