शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

स्मार्ट रस्त्यांमध्ये राज्यातील पाच शहरांची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 08:45 IST

केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सहभागी झालेल्या शहरांना विविध उपक्रम आयोजित करण्यास सांगितले. ‘स्ट्रीट्स फॉर पिपल’ हा उपक्रमदेखील त्याचाच एक भाग आहे.

मुजीब देवणीकरलोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केंद्र शासनाने स्मार्ट शहरांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी आयोजित केलेल्या ‘स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंज’ या स्पर्धेत राज्यातील पाच शहरांनी बाजी मारली आहे. औरंगाबादसह नागपूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड आणि पुणे या शहरांचा यात समावेश आहे. देशभरातील ११३ शहरांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. पहिल्या ३० प्रमुख शहरांची घोषणा मंगळवारी केंद्र शासनाने केली.

महापालिकेचे प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या नेतृत्त्वाखाली औरंगाबाद शहराने या उपक्रमात सहभाग घेतला. क्रांती चौकातील झाशी राणी पुतळ्यासमोरील रस्त्यावर या उपक्रमाचे आयोजन केले.यात स्टेज एकमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पहिल्या ३० शहरांची यादी जाहीर केली. यात औरंगाबादचा समावेश आहे. पहिल्या ३० शहरांच्या यादीत औरंगाबादसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक व नागपूरचा समावेश आहे. इतर राज्यांतील अमृतसर, बंगळुरू, भोपाळ, चंदीगड, गंगटोक, गुरुग्राम, हुबळी धारवाड, इंफाळ, इंदूर, जबलपूर, झाशी, यासह इतर शहरांचा समावेश आहे.

केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सहभागी झालेल्या शहरांना विविध उपक्रम आयोजित करण्यास सांगितले. ‘स्ट्रीट्स फॉर पिपल’ हा उपक्रमदेखील त्याचाच एक भाग आहे. यात शहरातील प्रमुख रस्त्यांवर सर्वसामान्यांना पायी फिरता यावे, बाजारपेठेत कोणत्याही वाहनाविना मुक्तपणे खरेदी करता यावे, तो परिसर प्रदूषणमुक्त ठेवणे, वयोवृद्ध नागरिकांसाठी ई-वाहनांची सोय, रस्त्याच्या कडेला आरामशीर बसता यावे, अशा सुविधा निर्माण करणे अपेक्षित आहे.

चार रस्तेक्रांती चौक ते गोपाल कल्चरल हॉल, गुलमंडी ते पैठणगेट, कॅनॉट प्लेस, एमजीएम प्रियदर्शनी उद्यान रोड स्ट्रीट्स फॉर पिपल उपक्रमासाठी निवडण्यात आले आहेत. क्रांती चौक येथे तसा रस्ताही तयार केला आहे. कॅनॉट प्लेसमध्ये काम सुरू करण्यात आले.