शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

पाच देहांचा कोळसा करू कुणाच्या हवाली?

By admin | Updated: May 24, 2014 01:11 IST

सुन्न पडलेल्या निशांत प्रकाश सिरियाच्या आक्रोशातील हा भाव सार्‍यांचाच थरकाप उडविणारा आहे. गुरुवारी मध्यरात्री त्याने आई, पत्नी, मुलगा, बहीण आणि भाची असा अवघा परिवारच गमावला, तोही अत्यंत भयावहरीत्या!

आक्रोशातील भाव : सार्‍यांचाच थरकाप उडविणारा

नरेश डोंगरे - नागपूर

सुन्न पडलेल्या निशांत प्रकाश सिरियाच्या आक्रोशातील हा भाव सार्‍यांचाच थरकाप उडविणारा आहे. गुरुवारी मध्यरात्री त्याने आई, पत्नी, मुलगा, बहीण आणि भाची असा अवघा परिवारच गमावला, तोही अत्यंत भयावहरीत्या! गोकुळपेठेतील अजिंक्य प्लाझा या चार माळ्यांच्या इमारतीत राहणारा निशांत (वय ३१) संगणकाचे काम करतो. त्याची आई सलीला (वय ६०) भारतीय विद्या भवनमधून वर्षभरापूर्वी निवृत्त झाल्या होत्या. मनमिळावू आई, समंजस पत्नी रागिणी (वय ३१) घरात सर्वांचाच जीव की प्राण असलेला चिमुकला निरांश (वय अडीच वर्षे) असा मोजका आणि नजर लागण्यासारखा परिवार. बहीण श्रुती श्रीकांत माळी (वय २५) प्रतापनगरात राहायची. तिला दोन वर्षांची मुलगी (सहना) होती. श्रुतीचे पती श्रीकांत एमआर आहेत. पती दौर्‍यावर गेले की श्रुती चिमुकलीला घेऊन माहेरी यायची. आई, पत्नी, बहीण, गोड मुलगा अन् तेवढीच गोंडस भाची घरात असले की गोकुळच भरल्यासारखे वाटायचे. श्रीकांत बाहेर गेल्यामुळे श्रुती नेहमीप्रमाणे आपल्या चिमुकलीला घेऊन माहेरी आली होती. गुरुवारी रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर टीव्हीवरील सिरियल अन् निरांश तसेच सहनाचे लाडकोड करीत हे कुटुंब झोपले. ते बेसावध झाल्याची काळाला खात्री पटली असावी. म्हणूनच की काय त्याने आपला डाव फेकला. चौकीदार लेखराज रतिराम परते जोरजोरात ओरडू लागला. ‘निचे आग लगी... निचे आग लगी...’ मध्यरात्री सुमारे दीड वाजता ही आरडाओरड ऐकून निशांत, सलीला, रागिणी आणि श्रुती जागे झाले. अर्धवट झोपेतील या सर्वांना काय करावे त्याचेही भान नव्हते. खाली आग लागली हे कळल्यानंतर खाली कशाला जायचे, असा साधा प्रश्नही त्यांना पडला नाही. त्यात ते सर्व पहिल्याच माळ्यावर होते. मात्र, मृत्यूने जाळे टाकले होते. त्यात त्यांना अडकायचे होते. ते सर्व अलगद अडकलेच. वृध्द सलीला तसेच रागिणी आणि श्रुती आपापल्या चिमुकल्यांना खांद्यावर घेत सरळ लिफ्टमध्ये शिरल्या. लिफ्ट खाली आली. स्वयंचलित दार उघडले गेले अन् तिघींच्याही किंकाळ्यांनी ‘अजिंक्य प्लाझा’चा परिसर हादरला. येथे ओशाळला मृत्यू रागिणी आणि श्रुतीच्या खांद्यावर निद्रिस्त अवस्थेतील त्यांची चिमुकली होती. त्यांना काही कळायचा प्रश्नच नव्हता. आगीच्या वणव्यात सापडलेल्या सलीला, रागिणी आणि श्रुती जीवाच्या आकांताने ओरडत होत्या. निरागस निरांश आणि सहना ओरडले की नाही, ते काळालाच कळले असेल. तिकडे आग लागल्यामुळे आपल्यासोबत राहणार्‍यांना काही होऊ नये म्हणून निशांत प्रत्येकाचे दार ठोठावून त्यांना माहिती देऊ लागला. त्यांना काही होऊ नये, यासाठी त्याची ही धडपड होती. आई, पत्नी, बहीण, मुलगा, भाची सर्व खाली गेले, याचे भान येताच तो भरभर पायर्‍या उतरून खाली आला. काळाचे भयावह रूप, त्याने गिळंकृत केलेला त्याचा परिवार अन् ते एकूणच दृश्य हतबल निशांतला अंतर्बाह्य कोलमडून टाकणारे ठरले. तो काहीच करू शकत नव्हता. केवळ अन् केवळ ओरडत होता. तेव्हापासूनचे त्याचे आक्रंदन आताही सुरूच आहे. या घटनेची माहिती कळाल्यानंतर श्रीकांतची झालेली अवस्थाही याहून वेगळी नाही.