शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

आधी फिटनेसची तपासणी, मगच ‘भारत जोडो’त पदयात्री; केवळ १२० जणांची निवड, मराठवाड्यातून एकमेव श्रावण रॅपनवाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 07:49 IST

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून सुरू केलेल्या भारत जोडो पदयात्रेत त्यांच्यासोबत सहभागी होण्यासाठी अतिशय अवघड अशा तपासण्या करण्यात आल्या.

देगलूर (जि. नांदेड) :

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून सुरू केलेल्या भारत जोडो पदयात्रेत त्यांच्यासोबत सहभागी होण्यासाठी अतिशय अवघड अशा तपासण्या करण्यात आल्या. पाच महिने चालणाऱ्या या संपूर्ण पदयात्रेत सहभागी होण्यासाठी देशभरातून २ हजार जण दिल्लीत दाखल झाले होते. मात्र, शारीरिक तपासणी, चालण्याची सवय या बाबींबरोबरच इतर कोणत्याही व्याधी नसलेल्या केवळ १२० जणांची निवड करण्यात आली. त्यामध्ये मराठवाड्यातून नांदेडचे डाॅ. श्रावण रॅपनवाड हे एकमेव ठरले आहेत.  

ही निवड करताना कौटुंबिक पार्श्वभूमीसह फिटनेस, रक्तदाब, मधुमेह यासह इतर आजार या बाबींची दिल्लीत तपासणी करण्यात आली. त्यानंतर मुलाखत घेण्यात आली. जवळपास दोन हजार कार्यकर्त्यांच्या दिल्लीत मुलाखती घेण्यात आल्या. त्यात मराठवाड्यातून श्रावण रॅपनवाड हे एकमेव कार्यकर्ते निवडले आहेत.

पदयात्रेत सांगलीच्या डॉक्टरांची टीम पदयात्रेत सहभागी झालेल्या यात्रेकरूंच्या आरोग्याविषयी काही समस्या निर्माण झालीच तर त्याच ठिकाणी उपचार करता यावेत. याव्यतिरिक्त पदयात्रींचे आरोग्य सुदृढ राहावे, या उद्देशाने डॉक्टरांचे एक पथक आणि रुग्णवाहिकाही पदयात्रेत सज्ज आहेत. युवक काँग्रेसचे डॉ. विश्वजित कदम यांनी भारती विद्यापीठाकडून या विद्यापीठातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक या यात्रेत सज्ज ठेवले आहे. सांगली येथून १० डॉक्टरांची टीमही सहभागी झाली आहे. 

‘भारत जोडो’त राज्यातील नऊ जणांचा समावेशभारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील नऊ जणांचा समावेश आहे. त्यात मराठवाड्यातून एकमेव नांदेडचे श्रावण रॅपनवाड यांच्यासह रोहन लाल बिट्टू, मनिंदर सिंग वोरा, वैष्णवी भारद्वाज, नंदा म्हात्रे, आतिशा पैठणकर, सत्यम ठाकूर, मनोज कुमार उपाध्याय आणि पिंकी राजकुमार सिंग यांची भारत यात्री म्हणून निवड झाली आहे.

अशी आहे राहुल गांधी यांची दिनचर्या   खासदार राहुल गांधी आणि यात्रेतील सहभागी सर्वांची दिनचर्या ही पहाटे साडेचार वाजता सुरू होते. साडेपाच वाजता ध्वजवंदन झाल्यानंतर यात्रेला सुरुवात होते. सकाळच्या सत्रात चालल्यानंतर दुपारच्या सत्रात विश्रांती असते. यावेळी राहुल गांधी हे बुद्धिवादी लोकांशी संवाद साधतात. विश्रांतीनंतर पुन्हा ही यात्रा सुरू होते. रात्री मुक्कामाच्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्यासाठी ६ डॉक्टरांचे पथक आणि दोन रुग्णवाहिका सज्ज ठेवल्या आहेत.  

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी