शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसाने वाघांना दिलासा, विदर्भातील व्याघ्र प्रकल्पात पाणवठ्यांमध्ये पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 17:59 IST

विदर्भात मृग नक्षत्राचा पहिलाच पाऊस धडकला असून, व्याघ्र प्रकल्पात पाणवठ्यांमध्ये पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे.

- गणेश वासनिकअमरावती : यंदा फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत वाघांना तृष्णा भागविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. मात्र, दोन दिवसांपूर्वी विदर्भात मृग नक्षत्राचा पहिलाच पाऊस धडकला असून, व्याघ्र प्रकल्पात पाणवठ्यांमध्ये पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पहिल्या पावसाने वाघांना जणू दिलासा मिळाला, हे चित्र अनुभवास येत आहे.यावर्षी फेब्रुवारीपासूनच उन्हाची दाहकता जाणवायला लागली होती, तर मार्चमध्ये ती तीव्र झाली होती. त्यामुळे जंगलात वाघांसह वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. पहिल्यांदाच मार्चमध्ये नैसर्गिक पाणवठे आटू लागल्याने विदर्भातील वाघांची तृष्णा भागविणे वनविभागासाठी कसरत ठरली होती. ताडोबा-पेंच व्याघ्र प्रकल्पात एप्रिल, मे महिन्यात पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा लागला. यंदा तीव्र उन्हाळा तापल्याने याचा परिणाम वन्यजीवांवर झाला आहे. वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करताना पाणी समस्येवर मात करण्यासाठी व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांना विविध प्रश्नांच्या सामोरे जावे लागले. परंतु, विदर्भात ७ जूनपासून मान्सून दाखल झाला. मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जंगलासह व्याघ्र प्रकल्पात हिरवळ उगवली असून, नैसर्गिक पाणवठ्यावर पाण्याचे स्त्रोत वाढले आहे. मेळघाट, ताडोबा- अंधारी, पेंच, नवेगाव, नागझिरा या व्याघ्र प्रकल्पात पहिल्याच पावसाने वाघांना दिल्याचे वास्तव आहे.वणव्यापासून मुक्ततायावर्षी जंगलात आग लागण्याचा घटना मोठ्या प्रमाणात घडल्या. वन्यजीवांचे आगीपासून नाहक नुकसान झाले. लाखो हेक्टर जंगल जळून खाक झाले. मेळघाट, ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वणव्याची अधिक झळ जाणवली. मात्र, मान्सूनचा पहिला पाऊस पडताच वणव्याच्या घटनांपासून मुक्तता मिळाल्याचे वास्तव आहे. हल्ली सर्वत्र हिरवळ उगवली आहे. आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेता येत आहे. जंगलात हिरवळ उगवल्याने वणव्याच्या भीतीमुळे वनकर्मचाºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.वाघांच्या अधिवासांकडे लक्षमान्सूनचा पहिला पाऊस पडला. जंगलात हिरवळ उगवल्याने नैसर्गिक पाणवठ्यांकडे आता वाघांचा कल वाढणार आहे. त्यामुळे वाघांचे अधिवासदेखील बदलण्याची शक्यता व्याघ्र प्रकल्प अधिकाºयांनी व्यक्त केली. अशावेळी वाघांची शिकार होण्याचे संकेत असल्यामुळे वाघांच्या अधिवासांकडे लक्ष देण्याविषयी वरिष्ठांनी सूचना दिल्या आहेत.वाघांचे अधिवास व त्यांच्या ये-जा करणाºया मार्गाची दक्षता घेण्याविषयी सूचना दिल्या आहेत. वाघांच्या मार्गावरून ग्रामस्थ अथवा वाटसरू जाणार नाही, याबाबत काळजी घेण्यासंदर्भात अवगत केले आहे. मान्सूनचा पहिला पाऊस वाघांना नक्कीच दिलासा देणारा ठरला आहे.- सुनील लिमये,अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर

टॅग्स :Tigerवाघ