शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसाने वाघांना दिलासा, विदर्भातील व्याघ्र प्रकल्पात पाणवठ्यांमध्ये पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 17:59 IST

विदर्भात मृग नक्षत्राचा पहिलाच पाऊस धडकला असून, व्याघ्र प्रकल्पात पाणवठ्यांमध्ये पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे.

- गणेश वासनिकअमरावती : यंदा फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत वाघांना तृष्णा भागविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. मात्र, दोन दिवसांपूर्वी विदर्भात मृग नक्षत्राचा पहिलाच पाऊस धडकला असून, व्याघ्र प्रकल्पात पाणवठ्यांमध्ये पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पहिल्या पावसाने वाघांना जणू दिलासा मिळाला, हे चित्र अनुभवास येत आहे.यावर्षी फेब्रुवारीपासूनच उन्हाची दाहकता जाणवायला लागली होती, तर मार्चमध्ये ती तीव्र झाली होती. त्यामुळे जंगलात वाघांसह वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. पहिल्यांदाच मार्चमध्ये नैसर्गिक पाणवठे आटू लागल्याने विदर्भातील वाघांची तृष्णा भागविणे वनविभागासाठी कसरत ठरली होती. ताडोबा-पेंच व्याघ्र प्रकल्पात एप्रिल, मे महिन्यात पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा लागला. यंदा तीव्र उन्हाळा तापल्याने याचा परिणाम वन्यजीवांवर झाला आहे. वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करताना पाणी समस्येवर मात करण्यासाठी व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांना विविध प्रश्नांच्या सामोरे जावे लागले. परंतु, विदर्भात ७ जूनपासून मान्सून दाखल झाला. मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जंगलासह व्याघ्र प्रकल्पात हिरवळ उगवली असून, नैसर्गिक पाणवठ्यावर पाण्याचे स्त्रोत वाढले आहे. मेळघाट, ताडोबा- अंधारी, पेंच, नवेगाव, नागझिरा या व्याघ्र प्रकल्पात पहिल्याच पावसाने वाघांना दिल्याचे वास्तव आहे.वणव्यापासून मुक्ततायावर्षी जंगलात आग लागण्याचा घटना मोठ्या प्रमाणात घडल्या. वन्यजीवांचे आगीपासून नाहक नुकसान झाले. लाखो हेक्टर जंगल जळून खाक झाले. मेळघाट, ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वणव्याची अधिक झळ जाणवली. मात्र, मान्सूनचा पहिला पाऊस पडताच वणव्याच्या घटनांपासून मुक्तता मिळाल्याचे वास्तव आहे. हल्ली सर्वत्र हिरवळ उगवली आहे. आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेता येत आहे. जंगलात हिरवळ उगवल्याने वणव्याच्या भीतीमुळे वनकर्मचाºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.वाघांच्या अधिवासांकडे लक्षमान्सूनचा पहिला पाऊस पडला. जंगलात हिरवळ उगवल्याने नैसर्गिक पाणवठ्यांकडे आता वाघांचा कल वाढणार आहे. त्यामुळे वाघांचे अधिवासदेखील बदलण्याची शक्यता व्याघ्र प्रकल्प अधिकाºयांनी व्यक्त केली. अशावेळी वाघांची शिकार होण्याचे संकेत असल्यामुळे वाघांच्या अधिवासांकडे लक्ष देण्याविषयी वरिष्ठांनी सूचना दिल्या आहेत.वाघांचे अधिवास व त्यांच्या ये-जा करणाºया मार्गाची दक्षता घेण्याविषयी सूचना दिल्या आहेत. वाघांच्या मार्गावरून ग्रामस्थ अथवा वाटसरू जाणार नाही, याबाबत काळजी घेण्यासंदर्भात अवगत केले आहे. मान्सूनचा पहिला पाऊस वाघांना नक्कीच दिलासा देणारा ठरला आहे.- सुनील लिमये,अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर

टॅग्स :Tigerवाघ