शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

पहिल्याच पावसाने वाघांना दिलासा, विदर्भातील व्याघ्र प्रकल्पात पाणवठ्यांमध्ये पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 17:59 IST

विदर्भात मृग नक्षत्राचा पहिलाच पाऊस धडकला असून, व्याघ्र प्रकल्पात पाणवठ्यांमध्ये पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे.

- गणेश वासनिकअमरावती : यंदा फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत वाघांना तृष्णा भागविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. मात्र, दोन दिवसांपूर्वी विदर्भात मृग नक्षत्राचा पहिलाच पाऊस धडकला असून, व्याघ्र प्रकल्पात पाणवठ्यांमध्ये पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पहिल्या पावसाने वाघांना जणू दिलासा मिळाला, हे चित्र अनुभवास येत आहे.यावर्षी फेब्रुवारीपासूनच उन्हाची दाहकता जाणवायला लागली होती, तर मार्चमध्ये ती तीव्र झाली होती. त्यामुळे जंगलात वाघांसह वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. पहिल्यांदाच मार्चमध्ये नैसर्गिक पाणवठे आटू लागल्याने विदर्भातील वाघांची तृष्णा भागविणे वनविभागासाठी कसरत ठरली होती. ताडोबा-पेंच व्याघ्र प्रकल्पात एप्रिल, मे महिन्यात पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा लागला. यंदा तीव्र उन्हाळा तापल्याने याचा परिणाम वन्यजीवांवर झाला आहे. वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करताना पाणी समस्येवर मात करण्यासाठी व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांना विविध प्रश्नांच्या सामोरे जावे लागले. परंतु, विदर्भात ७ जूनपासून मान्सून दाखल झाला. मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जंगलासह व्याघ्र प्रकल्पात हिरवळ उगवली असून, नैसर्गिक पाणवठ्यावर पाण्याचे स्त्रोत वाढले आहे. मेळघाट, ताडोबा- अंधारी, पेंच, नवेगाव, नागझिरा या व्याघ्र प्रकल्पात पहिल्याच पावसाने वाघांना दिल्याचे वास्तव आहे.वणव्यापासून मुक्ततायावर्षी जंगलात आग लागण्याचा घटना मोठ्या प्रमाणात घडल्या. वन्यजीवांचे आगीपासून नाहक नुकसान झाले. लाखो हेक्टर जंगल जळून खाक झाले. मेळघाट, ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वणव्याची अधिक झळ जाणवली. मात्र, मान्सूनचा पहिला पाऊस पडताच वणव्याच्या घटनांपासून मुक्तता मिळाल्याचे वास्तव आहे. हल्ली सर्वत्र हिरवळ उगवली आहे. आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेता येत आहे. जंगलात हिरवळ उगवल्याने वणव्याच्या भीतीमुळे वनकर्मचाºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.वाघांच्या अधिवासांकडे लक्षमान्सूनचा पहिला पाऊस पडला. जंगलात हिरवळ उगवल्याने नैसर्गिक पाणवठ्यांकडे आता वाघांचा कल वाढणार आहे. त्यामुळे वाघांचे अधिवासदेखील बदलण्याची शक्यता व्याघ्र प्रकल्प अधिकाºयांनी व्यक्त केली. अशावेळी वाघांची शिकार होण्याचे संकेत असल्यामुळे वाघांच्या अधिवासांकडे लक्ष देण्याविषयी वरिष्ठांनी सूचना दिल्या आहेत.वाघांचे अधिवास व त्यांच्या ये-जा करणाºया मार्गाची दक्षता घेण्याविषयी सूचना दिल्या आहेत. वाघांच्या मार्गावरून ग्रामस्थ अथवा वाटसरू जाणार नाही, याबाबत काळजी घेण्यासंदर्भात अवगत केले आहे. मान्सूनचा पहिला पाऊस वाघांना नक्कीच दिलासा देणारा ठरला आहे.- सुनील लिमये,अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर

टॅग्स :Tigerवाघ