शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पुण्यात भरणार शिक्षकांची पहिली 'राष्ट्रीय काँग्रेस'

By admin | Updated: July 5, 2016 20:43 IST

शैक्षणिक प्रश्नांवर उहापोह करण्यासाठी देशात पहिल्यांदाच नॅशनल टीचर्स काँग्रेस २३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे.

मुंबई : शैक्षणिक प्रश्नांवर उहापोह करण्यासाठी देशात पहिल्यांदाच नॅशनल टीचर्स काँग्रेस २३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे.पुण्यातील कोथरूड येथील माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट (मिटसॉग)महाविद्यालयाच्या प्रांगणात ही परिषद पार पडेल, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट प्रिन्सिपल फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. नंदकुमार निकम यांनी दिली. या परिषदेला देशातील विविध विभागांत शिकवणारे सुमारे ८ हजार शिक्षक येण्याची शक्यता निकम यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. निकम म्हणाले की, या परिषदेचे आयोजन महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), मनुष्यबळ विकास मंत्रालय, भारत सरकार, असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययु), भारतीय छात्र संसदफाऊंडेशन, महाराष्ट्र स्टेट प्रिन्सिपल फेडरेशन व विश्वशांती केंद्र (आळंदी), पुणेचे युनेस्को अध्यासन, हॉर्वर्ड बिझनेस स्कूल क्लब आॅफ इंडिया या संस्थांच्या सहकार्यातून केले आहे. देशातील पदवी आणि पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमांचे ८ हजार शिक्षक यामध्ये सामील होणार आहेत.शिक्षणाचा दर्जा वाढवणे, शिक्षकांना अद्ययावत प्रशिक्षण देणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अधिकाधिक आर्थिक तरतूद करणे, शिवाय तरतूदीप्रमाणे आर्थिक खर्च करणे अशा विविध विषयांवर सखोल चर्चा परिषदेत होईल. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे राष्ट्रीय परिषदेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी आहेत. तर डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भाटकर अशी तज्ज्ञ मंडळी अनुक्रमे चेअरमन आणि कार्याध्यक्षपदी विराजमान आहेत. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन शिक्षकांना मिळेल. तीन दिवसीय परिषदेत सात सत्रे पार पडणार आहेत. त्यामध्ये शैक्षणिक, अध्यात्मिक, राजकीय, सामाजिक, कला, पत्रकारिता या क्षेत्रांतील व्यक्ती मार्गदर्शन करतील.

देशात उत्तम संशोधक, संवेदनशील, समाजाभिमुख, प्रगतीशील, दिशादर्शक, प्रेरणादायी आणितत्त्वनिष्ठ शिक्षकांची फळी निर्माण करण्याचे परिषदेचे उद्दीष्ट आहे..............................टीचर टू टीचर कनेक्टपरिषदेत ६०शिक्षकांचा गट तयार करून ह्यटीचर टू टीचर कनेक्ट हा उपक्रम राबविला जाईल. ज्यामध्ये एकाच विषयावर सर्व शिक्षक आपापली मते मांडतील. त्यानंतर संबंधित विषयाचे सार काढून उपस्थित प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी ५० वर्षांहून कमी वयोगटातील शिक्षकांनी या परिषदेत सामील होण्याची आवाहन आयोजकांनी केले आहे.या विषयांवर होणार चर्चा- भारतीय शिक्षण पद्धतीचा इतिहास, सद्यस्थिती आणि भवितव्य- सध्याच्या शिक्षण पद्धतीत भारतीय मूल्यांचा समावेश आहे का?- कॉर्पोरेट सीएसआर तसे शिक्षणासाठी टीएसआर- आपण शिकवितो; ते शिकतात का?- शिक्षणस्तर सुधारण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडतेय का?- शिक्षक : मार्गदर्शक, प्रेरक, प्रोत्साहक आपण अवलोकन करतो का?- शिक्षणावरील खर्च अल्प नाही का?.....................दिग्गज वक्त्यांची उपस्थितीयाशिवाय कार्यक्रमात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, केंद्रीय मंत्रीस्मृती इराणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे,अभिनेता आमिर खान, सुपर ३०चे जनक आनंद कुमार असे दिग्गज वक्ते मार्गदर्शनकरणार आहेत.