शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

पुण्यात भरणार शिक्षकांची पहिली 'राष्ट्रीय काँग्रेस'

By admin | Updated: July 5, 2016 20:43 IST

शैक्षणिक प्रश्नांवर उहापोह करण्यासाठी देशात पहिल्यांदाच नॅशनल टीचर्स काँग्रेस २३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे.

मुंबई : शैक्षणिक प्रश्नांवर उहापोह करण्यासाठी देशात पहिल्यांदाच नॅशनल टीचर्स काँग्रेस २३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे.पुण्यातील कोथरूड येथील माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट (मिटसॉग)महाविद्यालयाच्या प्रांगणात ही परिषद पार पडेल, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट प्रिन्सिपल फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. नंदकुमार निकम यांनी दिली. या परिषदेला देशातील विविध विभागांत शिकवणारे सुमारे ८ हजार शिक्षक येण्याची शक्यता निकम यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. निकम म्हणाले की, या परिषदेचे आयोजन महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), मनुष्यबळ विकास मंत्रालय, भारत सरकार, असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययु), भारतीय छात्र संसदफाऊंडेशन, महाराष्ट्र स्टेट प्रिन्सिपल फेडरेशन व विश्वशांती केंद्र (आळंदी), पुणेचे युनेस्को अध्यासन, हॉर्वर्ड बिझनेस स्कूल क्लब आॅफ इंडिया या संस्थांच्या सहकार्यातून केले आहे. देशातील पदवी आणि पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमांचे ८ हजार शिक्षक यामध्ये सामील होणार आहेत.शिक्षणाचा दर्जा वाढवणे, शिक्षकांना अद्ययावत प्रशिक्षण देणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अधिकाधिक आर्थिक तरतूद करणे, शिवाय तरतूदीप्रमाणे आर्थिक खर्च करणे अशा विविध विषयांवर सखोल चर्चा परिषदेत होईल. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे राष्ट्रीय परिषदेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी आहेत. तर डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भाटकर अशी तज्ज्ञ मंडळी अनुक्रमे चेअरमन आणि कार्याध्यक्षपदी विराजमान आहेत. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन शिक्षकांना मिळेल. तीन दिवसीय परिषदेत सात सत्रे पार पडणार आहेत. त्यामध्ये शैक्षणिक, अध्यात्मिक, राजकीय, सामाजिक, कला, पत्रकारिता या क्षेत्रांतील व्यक्ती मार्गदर्शन करतील.

देशात उत्तम संशोधक, संवेदनशील, समाजाभिमुख, प्रगतीशील, दिशादर्शक, प्रेरणादायी आणितत्त्वनिष्ठ शिक्षकांची फळी निर्माण करण्याचे परिषदेचे उद्दीष्ट आहे..............................टीचर टू टीचर कनेक्टपरिषदेत ६०शिक्षकांचा गट तयार करून ह्यटीचर टू टीचर कनेक्ट हा उपक्रम राबविला जाईल. ज्यामध्ये एकाच विषयावर सर्व शिक्षक आपापली मते मांडतील. त्यानंतर संबंधित विषयाचे सार काढून उपस्थित प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी ५० वर्षांहून कमी वयोगटातील शिक्षकांनी या परिषदेत सामील होण्याची आवाहन आयोजकांनी केले आहे.या विषयांवर होणार चर्चा- भारतीय शिक्षण पद्धतीचा इतिहास, सद्यस्थिती आणि भवितव्य- सध्याच्या शिक्षण पद्धतीत भारतीय मूल्यांचा समावेश आहे का?- कॉर्पोरेट सीएसआर तसे शिक्षणासाठी टीएसआर- आपण शिकवितो; ते शिकतात का?- शिक्षणस्तर सुधारण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडतेय का?- शिक्षक : मार्गदर्शक, प्रेरक, प्रोत्साहक आपण अवलोकन करतो का?- शिक्षणावरील खर्च अल्प नाही का?.....................दिग्गज वक्त्यांची उपस्थितीयाशिवाय कार्यक्रमात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, केंद्रीय मंत्रीस्मृती इराणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे,अभिनेता आमिर खान, सुपर ३०चे जनक आनंद कुमार असे दिग्गज वक्ते मार्गदर्शनकरणार आहेत.