शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भाजप आमदाराकडून गोळीबार; अजित पवारांचा संताप, गृहमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 11:16 IST

अजित पवार यांनीही या घटनेबद्दल नाराजी व्यक्त करत याबाबत आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे. 

MLA Ganpat Gaikwad Firing ( Marathi News ) : उल्हासनगरमध्ये सत्ताधारी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. पोलीस ठाण्यातच हा गोळीबार करण्यात आल्याने राज्यभरात खळबळ उडाली असून कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात असताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या घटनेबद्दल नाराजी व्यक्त करत याबाबत आपण भाजप नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे. 

आमदार गणपत गायकवाड यांनी केलेला गोळीबार चुकीचा असल्याचं सांगत अजित पवार म्हणाले की, "उल्हासनगरमधील घटना सर्वांनी पाहिली असून  आमदार गायकवाड हे वैतागलेल्या माणसासारखे बोलत होते. मात्र संविधानाने दिलेल्या अधिकारांचा दुरुपयोग होणार नाही याची खबरदारी लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे," असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.

गणपत गायकवाड यांनी गोळीबारानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार यांनी याबाबतही भाष्य केलं. "गायकवाड यांच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या. रात्री उशिरा त्याबाबत आपल्याला माहिती मिळाली. वास्तविक कुणीही अशा पद्धतीने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. सगळ्यांना नियम आणि कायदे हे सारखेच असतात. संबंधित घटनेबद्दल मी माहिती घेणार असून याबाबत आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार आहे," असं अजित पवार म्हणाले.

गणपत गायकवाड यांचे शिंदे पिता-पुत्रावर गंभीर आरोप

आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेत्यावर केलेल्या गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र व कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. "एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत माझे खूप पैसे बुडवले आहेत. तसंच मी आमदार निधीतून केलेल्या अनेक कामांचं श्रेय घेण्यासाठी मी काम केलेल्या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे जबरदस्तीने आपल्या नावाचा बोर्ड लावतात. एकनाथ शिंदे यांनी गुन्हेगारी पोसली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे," अशी मागणी आमदार गायकवाड यांनी केली आहे.

टॅग्स :महेश गायकवाडमहेश गायकवाडGanpat Gaikwadगणपत गायकवाडMahesh Gaikwadमहेश गायकवाडulhasnagarउल्हासनगर