शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

मुंबईत ‘फुल्ल आॅन’ पाऊस

By admin | Published: September 21, 2016 2:27 AM

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईकरांच्या साथीने हजेरी लावलेल्या पावसाने अजूनही मुंबईत ठाण मांडलेले आहे.

मुंबई : लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईकरांच्या साथीने हजेरी लावलेल्या पावसाने अजूनही मुंबईत ठाण मांडलेले आहे. सध्या तर पावसाचा मुंबईत चांगलाच धुमाकूळ सुरू आहे. यंदा मुंबईत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे काही मुंबईकर त्रासले होते. मात्र अनेक ठिकाणी पावसाचा आनंदही मुंबईकरांनी घेतला. उपनगरात सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे उपनगरीय रेल्वे सेवेवर परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आॅफिसला जाताना आणि घरी परतताना मुंबईकरांचे हाल झाले. जोरदार पावसामुळे रेल्वे विलंबाने धावत होत्या. खड्डे आणि पाणी साठल्यामुळे रस्त्यांवरही वाहतूककोंडी झाली होती. दुसरीकडे पूर्व उपनगरांमध्येही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड या प्रमुख उपनगरांमध्ये अनेक भाग जलमय झाले होते. प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने पायी चालणाऱ्या तसेच वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात त्रेधातिरपीट उडाली. दुपारनंतर सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे शहर परिसरातही वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली होती. माझगाव परिसरात नेसबीट रोडवर दुपारी पाणी साचल्यामुळे वाहतूककोंडी झाली. दुपारी तीनच्या सुमारास बुरहानी महाविद्यालयाबाहेर रस्त्यावर पाणी तुंबल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. तसेच डॉकयार्ड रेल्वे स्थानकानजीक दिलिमा स्ट्रीटजवळही पावसामुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीची कोंडी होऊन बराच काळ खोळंबा झाला होता. (प्रतिनिधी)>खड्ड्यांमुळे पावसाचा त्रास अधिक पश्चिम उपनगरात गेल्या सहा दिवसांत पावसाने उसंत घेतलेली नाही. त्यामुळे खड्डेमय रस्त्यांचा त्रास अधिकच वाढला असल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. दिंडोशीतील रस्ते खड्डेमय झाले आहेत. ओबेरॉय जंक्शन येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हद्दीतील खड्डे आणि महापालिकेच्या हद्दीतील ओबेरॉय मॉल ते रत्नागिरी हॉटेल जंक्शन येथील खड्डे यांना पार करताना नागरिकांची त्रेधातिरपीट झाली होती. बेस्टच्या बस आणि येथील आयटी पार्क ते रेल्वे स्थानक या मार्गावरील रिक्षांनादेखील वाहतूककोंडीचा मोठा फटका बसला. सोमवारी रात्री गोरेगाव रेल्वे स्थानक येथील शेअर रिक्षाची रांग चक्क गोरेगाव (पूर्व) येथील रेल्वे स्थानकातील तिकीटघरापर्यंत गेली होती. परिणामी गोरेगाव रेल्वे स्थानक ते नागरी निवारा येथील प्रवासाला चक्क एक ते सव्वा तास लागत असल्यामुळे येथील नागरिकांनी आणि विशेषत: नोकरदार महिलांनी संताप व्यक्त केला.>वाहनांचा प्रवास लांबलामुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूकसेवांना चांगलाच फटका बसला. काही ठिकाणी पाणी तुंबल्याने वाहतूककोंडीचा सामना करतानाच वाहनांचा वेग मंदावल्याचे दिसून आले. वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून जाताना वाहनांना तासन्तास प्रवासासाठी मोजावे लागत होते. पावसामुळे बोरीवली ते वांद्रे प्रवास बराच लांबत होता. तर सायनकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक धिमी असल्याने वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. एलबीएसवरील गांधीनगर, ईस्टर्न एक्स्प्रेसवरील छेडानगर, अंधेरीतील चकाला, कलानगर जंक्शन, सीप्झ फ्लायओव्हर, खार ते आॅपेरा हाऊस, दादर स्टेशन ते एलफिन्स्टन स्टेशन, वरळी किल्ल्याजवळ वाहनांचा वेग मंदावला होता. ठिकठिकाणी वाहतूक पोलीस वाहतूककोंडी सोडवण्याचे प्रयत्न करताना दिसत होते. सकाळपासून सुरू असलेली वाहतूककोंडी संध्याकाळपर्यंत होती. हवामान योग्य नसल्याने अनेक विमाने उशिराने उड्डाण करत असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली. >द्रुतगती नव्हे कूर्मगती मार्गमुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतुकीची बराच वेळ कोंडी झाली होती. तसेच एस.व्ही. रोड आणि एलबीएस मार्गावरही अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यात खड्ड्यांची भर पडलेली असल्याने वाहतूक धिमी झाली होती. कालिना परिसरातही वाहतूककोंडी दिसून आली. कुर्ला कमानी परिसरात बऱ्याच भागात पाणी साचले होते.