शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 09:25 IST

जलवाहतुकीने प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जलवाहतूक सुरू झाल्याने पर्यटनही बहरणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग: गणेशोत्सव सण सुरू होण्याआधी मांडवा ते गेटवे जलवाहतूक सुरू होते, मात्र यंदा पावसामुळे गणेशोत्सव सुरू झाला तरी जलवाहतुकीला सुरू झाली नव्हती. या वाहतुकीला अखेर १ सप्टेंबरला मुहूर्त मिळाला आहे. पीएनपी ही एकच जलवाहतूक सोमवारपासून सुरू झाली. त्यामुळे जलवाहतुकीने प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जलवाहतूक सुरू झाल्याने पर्यटनही बहरणार आहे. 

मांडवा ते गेटवे जलवाहतुकीने लाखो प्रवासी वाहतूक करीत असतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जून ते ऑगस्ट असे तीन महिने जलवाहतुकीला विश्रांती असते. त्यामुळे अलिबागमध्ये येणाऱ्या प्रवाशांना रस्ते मार्गे वाहतूक करावी लागते. जलवाहतुकीमुळे अलिबागचे पर्यटन बहरते, मात्र पावसाळ्यात तीन महिने पर्यटनाला ब्रेक मिळालेला असतो. दरवर्षी गणेशोत्सव सुरू होण्याआधी एक-दोन दिवस आधी जलवाहतूक सुरू होते. त्यामुळे गणेशभक्तांना खरेदीसाठी मुंबईला जलवाहतुकीने जाणे सोपे जाते. मात्र, यंदा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे आगमन झाल्याने जलवाहतूक सुरू झाली नव्हती. 

वातावरणानुसार वाढविणार फेऱ्यापावसाळी वातावरण निवळल्याने जलवाहतूक सुरू झाली आहे. सकाळी साडेअकरा वाजता पहिली पीएनपीची प्रवासी बोट मांडवा बंदरातून गेटवेकडे गेल्याचे बंदर निरीक्षक मानकर यांनी सांगितले. सध्या एकच पीएनपी कंपनीची बोट सुरू झालेली आहे. लवकरच मालदार आणि अजंठा जलवाहतूक ही सुरू होईल. वातावरणानुसार जलवाहतुकीच्या फेऱ्या वाढल्या जातील, असे मानकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र