शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

अखेर रखडलेल्या कामांना सुरुवात; घोडबंदर भागातील आदिवासी पाड्यांत सहा महिन्यांत पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 06:19 IST

तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांच्या कार्यकाळात ८८ लाखांचा खर्च करण्याची निविदा मंजूर करण्यात आली होती. मात्र, दोन वर्षे त्या कामाचे कार्यादेश दिले नव्हते.

अजित मांडके 

ठाणे : घोडबंदर भागातील पानखंडा, देवाचा पाडा, बमनाली पाड्यासह येथील आदिवासी पाड्यांत दोन वर्षांपूर्वी येथे जलवाहिनी टाकण्याचे, पाण्याच्या टाक्या उभारण्याचे नियोजन आखण्यात आले होते. ‘लोकमत’मध्ये याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच ठाणे पालिकेने उशिराने का होईना या कामाचे कार्यादेश दिले.  त्यानुसार या कामाला सुरुवातही झाली आहे. पुढील सहा महिन्यांत पाड्यांमधील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार आहे.

घोडबंदर भागातील पानखंडा आणि त्याच्या आजूबाजूच्या आदिवासी पाड्यांतील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन अगदी डोंगरमाथ्यावर जाऊन अरुंद वाटा तुडवत पाणी आणावे लागत असल्याचे विदारक चित्र ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच, पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याची दखल घेतली. त्यानुसार आता येथील आदिवासींची तहान भागविण्यासाठी त्यांनी पावले उचलली आहेत. त्यातही तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांच्या कार्यकाळात ८८ लाखांचा खर्च करण्याची निविदा मंजूर करण्यात आली होती. मात्र, दोन वर्षे त्या कामाचे कार्यादेश दिले नव्हते, परंतु आता रखडलेल्या कामाचे कार्यादेश दिले असून, त्याचे कामही सुरू केल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे.

ही कामे होणार१० ठिकाणी सिंटेकच्या ५ हजार लीटरच्या टाक्या बसविल्या जाणार आहेत. त्यात कशेळी पाडा, पानखंडा, बमनाली पाडा, टाकरडा पाडा आदींसह इतर आदिवासी पाड्यांचा समावेश आहे. तसेच, येथील सर्व पाड्यांना पाणी मिळावे या उद्देशाने ३ ते ४ ठिकाणी पंप बसविले जाणार आहेत. ३ ते ४ इंचाची जलवाहिनीसुद्धा टाकली जाणार आहे. त्यानुसार पुढील सहा महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे. 

अधिकाऱ्यांकडून पाहणीपाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी  येथील पानखंडा व इतर आदिवासी पाड्यांची बुधवारी पाहणी केली. यावेळी सिंटेकच्या टाक्या काही ठिकाणी तुटलेल्या आढळून आल्या. बोअरवेलला गढूळ पाणी येत असल्याचेही त्यांच्या निर्दशनास आले. तुटलेल्या टाक्या बदलल्या जाणार असून, इतर समस्या सोडविण्याची ग्वाही दिली. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई