शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 20:00 IST

सहा दिवसांच्या प्रयत्नांनंतर शुक्रवारी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या कोर्लई समुद्रात रायगड पोलिसांना ‘बोया’ सापडला. तो तटरक्षक दलाकडे देण्यात येणार आहे.

निखिल म्हात्रेअलिबाग : कोर्लई समुद्रात ‘बोया’चा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये ९२४ मच्छीमार बोटी बेकायदा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे सागरी सुरक्षेवर अधिक नजर राहणार असल्याचे संकेत जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी शुक्रवारी दिले. 

भारतीय तटरक्षक दलाला रायगड जिल्ह्यातील कोर्लई किल्ल्याजवळ एक संशयित बोट आढळल्याची माहिती ६ जुलैच्या मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. त्यावेळी सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी ३ हजार ५०० मच्छीमार बोटी तपासल्या असता ९२४ बेकायदेशीर बोटी असल्याचे समोर आले. यामध्ये ६३७ बोटी नोंदणीकृत असून, त्यांच्या मालकांशी संपर्क झाला नाही. तर २८७ बोटी मत्स विभागाकडे नोंदणीकृत नसल्याचे समोर आले. या बोटींची माहिती मत्स्य व्यवसाय आयुक्त आणि सहआयुक्तांना कारवाई करण्यासाठी देण्यात आल्याचे दलाल यांनी सांगितले.

सहा दिवसांच्या प्रयत्नांनंतर ‘बोया’ सापडला; पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडलासहा दिवसांच्या प्रयत्नांनंतर शुक्रवारी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या कोर्लई समुद्रात रायगड पोलिसांना ‘बोया’ सापडला. तो तटरक्षक दलाकडे देण्यात येणार आहे. या घडामोडीनंतर पोलिसांनी शोधमोहीम थांबविली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी दिली. कोर्लई समुद्र किनारी मासेमारी बोटींना दिशादर्शक ठरणारा ‘बोया’ असल्याची माहिती मिळाली होती.   

त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली होती.  सहा दिवसांपासून रायगडच्या रेवदंडा, अलिबाग, मुरूड, कोर्लई, मांडवा समुद्र किनाऱ्यावर पोलिस आणि इतर सागरी सुरक्षा यंत्रणा त्याचा शोध सुरू केला होता.  दलाल यांनी या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यानंतर पोलिसांनी ‘बॉम्ब डिटेक्टर’च्या सहाय्याने हा ‘बोया’ शोधण्याचे काम सुरू केले होते.  कोर्लई समुद्र किनाऱ्यावर अखेर तो सापडला. तो सौर ऊर्जेवर सुरू होता. तो सतत जागा बदलत असल्याने शोधमोहिमेला वेळ लागला. 

नोंदणी आवश्यकसागरी सुरक्षा आणि मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी बोटींची नोंदणी अतिशय आवश्यक आहे. मच्छीमारांच्या बाबतीत अप्रिय घटना घडल्यास त्या बोटींचा शोध घेता आला पाहिजे तसेच त्यांना मदत मिळवून देण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे, याकडेही दलाल यांनी लक्ष वेधले.

जिल्ह्यात २८०० मच्छीमार बोटी नोंदणीकृत आहेत. तर ९२४ बोटींचे मालक जोपर्यंत समोर येत नाहीत तोपर्यंत त्या बेकायदा ठरविण्यात येणार आहेत. याबाबत कोणतेही दुमत नाही - आँचल दलाल, जिल्हा पोलिस अधीक्षक