शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 20:00 IST

सहा दिवसांच्या प्रयत्नांनंतर शुक्रवारी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या कोर्लई समुद्रात रायगड पोलिसांना ‘बोया’ सापडला. तो तटरक्षक दलाकडे देण्यात येणार आहे.

निखिल म्हात्रेअलिबाग : कोर्लई समुद्रात ‘बोया’चा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये ९२४ मच्छीमार बोटी बेकायदा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे सागरी सुरक्षेवर अधिक नजर राहणार असल्याचे संकेत जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी शुक्रवारी दिले. 

भारतीय तटरक्षक दलाला रायगड जिल्ह्यातील कोर्लई किल्ल्याजवळ एक संशयित बोट आढळल्याची माहिती ६ जुलैच्या मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. त्यावेळी सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी ३ हजार ५०० मच्छीमार बोटी तपासल्या असता ९२४ बेकायदेशीर बोटी असल्याचे समोर आले. यामध्ये ६३७ बोटी नोंदणीकृत असून, त्यांच्या मालकांशी संपर्क झाला नाही. तर २८७ बोटी मत्स विभागाकडे नोंदणीकृत नसल्याचे समोर आले. या बोटींची माहिती मत्स्य व्यवसाय आयुक्त आणि सहआयुक्तांना कारवाई करण्यासाठी देण्यात आल्याचे दलाल यांनी सांगितले.

सहा दिवसांच्या प्रयत्नांनंतर ‘बोया’ सापडला; पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडलासहा दिवसांच्या प्रयत्नांनंतर शुक्रवारी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या कोर्लई समुद्रात रायगड पोलिसांना ‘बोया’ सापडला. तो तटरक्षक दलाकडे देण्यात येणार आहे. या घडामोडीनंतर पोलिसांनी शोधमोहीम थांबविली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी दिली. कोर्लई समुद्र किनारी मासेमारी बोटींना दिशादर्शक ठरणारा ‘बोया’ असल्याची माहिती मिळाली होती.   

त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली होती.  सहा दिवसांपासून रायगडच्या रेवदंडा, अलिबाग, मुरूड, कोर्लई, मांडवा समुद्र किनाऱ्यावर पोलिस आणि इतर सागरी सुरक्षा यंत्रणा त्याचा शोध सुरू केला होता.  दलाल यांनी या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यानंतर पोलिसांनी ‘बॉम्ब डिटेक्टर’च्या सहाय्याने हा ‘बोया’ शोधण्याचे काम सुरू केले होते.  कोर्लई समुद्र किनाऱ्यावर अखेर तो सापडला. तो सौर ऊर्जेवर सुरू होता. तो सतत जागा बदलत असल्याने शोधमोहिमेला वेळ लागला. 

नोंदणी आवश्यकसागरी सुरक्षा आणि मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी बोटींची नोंदणी अतिशय आवश्यक आहे. मच्छीमारांच्या बाबतीत अप्रिय घटना घडल्यास त्या बोटींचा शोध घेता आला पाहिजे तसेच त्यांना मदत मिळवून देण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे, याकडेही दलाल यांनी लक्ष वेधले.

जिल्ह्यात २८०० मच्छीमार बोटी नोंदणीकृत आहेत. तर ९२४ बोटींचे मालक जोपर्यंत समोर येत नाहीत तोपर्यंत त्या बेकायदा ठरविण्यात येणार आहेत. याबाबत कोणतेही दुमत नाही - आँचल दलाल, जिल्हा पोलिस अधीक्षक