शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

अखेर दहीहंडीवरील विघ्न टळले- अॅड. आशिष शेलार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 20:21 IST

मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीवरील निर्बंध उठवत गोविंदांचे वय 18 वरून 14 वर्ष केले आहे.

मुंबई, दि. 7 - मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीवरील निर्बंध उठवत गोविंदांचे वय 18 वरून 14 वर्ष केले आहे.  न्यायालयात भाजप सरकारने उत्सव मंडळांची बाजू सकारात्मकरीत्या मांडली होती. त्यामुळेच हा मोठा विजय झाला. उत्सवप्रेमींना न्याय मिळाला. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, अशा भावना मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केल्या. दहीहंडीबाबत मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. गेली दोन वर्षे यासाठी विविध स्तरावर आमदार अॅड. आशिष शेलार पाठपुरावा करत होते.  सुनावणीदरम्यान आमदार अॅड. आशिष शेलार न्यायालयात स्वतः हजर होते.  तसेच समन्वय समितीचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर पदाधिका-यांनी  आनंद व्यक्त केला. तसेच आमदार आशिष शेलार यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. आशिष शेलारांसोबत गीता झगडे, बाळा पडेलकर, भोईर, पांचाळ आदींचा समावेश होता.भाजपा सरकारने सुरक्षेचे नियम पाळून उत्सव झाले पाहिजेत, अशी भूमिका घेतली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अॅड. तुषार मेहता यांची नियुक्ती केली. तसेच दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यासोबतच नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करून उत्सवाबाबत सकारात्मक भूमिका घेतली. विशेष बाब म्हणजे न्यायालयात सरकारने गोविंदांच्या सुरक्षेबाबत काटेकोर काळजी कशी घेतली जाईल, याचे सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. तसेच 14 वर्षांची अट ही कामगार कायद्यातील बालकामगार प्रतिबंधक तरतुदीनुसार सरकारच्या वतीने अॅड. तुषार मेहता यांनी मांडून गोविंदाचे वयाची अट 18 ऐवजी 14 असायला हवी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. ती न्यायालयाने ग्राह्य धरली. या सर्व बाजू सरकारतर्फे अभ्यासपूर्ण न्यायालयात मांडल्या गेल्या म्हणूनच हा न्याय मिळाला, असेही आमदार अॅड. आशिष शेलार म्हणाले.