शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

अखेर सर्व निकाल जाहीर, पुनर्मूल्यांकनाचे आव्हान; ४ महिन्यांनंतर ४७७ निकाल लावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 06:56 IST

गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेला मुंबई विद्यापीठाचा प्रलंबित निकालाचा गोंधळ, अखेर संपुष्टात आला आहे. मंगळवारी विद्यापीठाने उर्वरित ५ निकाल जाहीर करीत, एकूण सर्व ४७७ परीक्षांचे निकाल जाहीर केले.

मुंबई : गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेला मुंबई विद्यापीठाचा प्रलंबित निकालाचा गोंधळ, अखेर संपुष्टात आला आहे. मंगळवारी विद्यापीठाने उर्वरित ५ निकाल जाहीर करीत, एकूण सर्व ४७७ परीक्षांचे निकाल जाहीर केले. मंगळवारी रात्री आयडॉलचे वाणिज्य शाखेचे २ निकाल जाहीर केल्यानंतर, प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला असून, विद्यार्थ्यांवरील तणाव काही प्रमाणात कमी झाला आहे.आता प्रामुख्याने पुनर्मूल्यांकनाचे काम त्वरित पूर्ण करण्याचे आव्हान विद्यापीठावर आहे. विद्यापीठाच्या नियमानुसार, परीक्षा झाल्यावर ४५ दिवसांच्या आत निकाल लावावे लागतात, पण आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे विद्यापीठाच्या निकालाला लेट मार्क लागला होता. अनेक ‘डेडलाइन’ उलटून गेल्या. या गलथानपणामुळे विद्यापीठाच्या बेअब्रूबरोबरच कुलगुरू डॉ. संजय देशमुख, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर सर्व स्तरांतून टीकेची झोड उठली होती.मंगळवार दुपारपर्यंत आयडॉलच्या टी.वाय.बीकॉम आणि एम. कॉमच्या चौथ्या सत्राचे निकाल बाकी होते. त्यामुळे सुमारे साडेतेरा हजार विद्यार्थ्यांचे निकाल लागलेले नव्हते, पण मंगळवारी रात्री उशिरा विद्यापीठाने संकेतस्थळावर हे दोन्ही निकाल जाहीर करून, सर्व ४७७ निकालांचा आकडा पूर्ण केला.मुंबई विद्यापीठातर्फे यंदा आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी करण्यात आली. लवकर निकाल लावण्यासाठी या पद्धतीचा वापर करण्यात आल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले होते, पण याचे उलट परिणाम दिसून आले. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे निकलांना लेटमार्क लागला, पण आता निकाल लागल्याने विद्यापीठाचे टेन्शन कमी झाले आहे.निकाल लागले असले, तरीही मुंबई विद्यापीठाची परीक्षा अजून संपलेली नाही. कारण निकालातील त्रुटींमुळे पुनर्मूल्यांकनाचा आकडा बराच वाढला आहे. या उत्तरपत्रिकांची योग्य प्रकारे तपासणी करून विद्यापीठाला लवकर निकाल जाहीर करावे लागणार आहेत.।प्रभारी खांद्यावर किती दिवस चालणार कारभार?मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उतरपत्रिका तपासणीच्या निर्णयामुळे, कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना राज्यपाल यांनी कारणे दाखवा नोटीस दिली होती आणि कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. तेव्हापासून कुलगुरू, प्र- कुलगुरू, कुलसचिव आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक ही सर्व पदे प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. या सर्व पदाची नियुक्ती निकाल लागेपर्यंत अथवा तीन महिने करण्यात आली होती.आता निकाल जाहीर झाले आहेत, तर दुसरीकडे कुलगुरूंनी राज्यपालांना ३ हजार शब्दांचे पत्रदेखील दिले आहे. त्यामुळे आता कुलगुरू डॉ. संजय देशमुख पुन्हा कार्यभार कधी स्वीकारणार की, विद्यार्थी संघटनांचा विरोध असल्यामुळे नक्की काय होणार, यावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.