शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

अखेर सर्व निकाल जाहीर, पुनर्मूल्यांकनाचे आव्हान; ४ महिन्यांनंतर ४७७ निकाल लावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 06:56 IST

गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेला मुंबई विद्यापीठाचा प्रलंबित निकालाचा गोंधळ, अखेर संपुष्टात आला आहे. मंगळवारी विद्यापीठाने उर्वरित ५ निकाल जाहीर करीत, एकूण सर्व ४७७ परीक्षांचे निकाल जाहीर केले.

मुंबई : गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेला मुंबई विद्यापीठाचा प्रलंबित निकालाचा गोंधळ, अखेर संपुष्टात आला आहे. मंगळवारी विद्यापीठाने उर्वरित ५ निकाल जाहीर करीत, एकूण सर्व ४७७ परीक्षांचे निकाल जाहीर केले. मंगळवारी रात्री आयडॉलचे वाणिज्य शाखेचे २ निकाल जाहीर केल्यानंतर, प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला असून, विद्यार्थ्यांवरील तणाव काही प्रमाणात कमी झाला आहे.आता प्रामुख्याने पुनर्मूल्यांकनाचे काम त्वरित पूर्ण करण्याचे आव्हान विद्यापीठावर आहे. विद्यापीठाच्या नियमानुसार, परीक्षा झाल्यावर ४५ दिवसांच्या आत निकाल लावावे लागतात, पण आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे विद्यापीठाच्या निकालाला लेट मार्क लागला होता. अनेक ‘डेडलाइन’ उलटून गेल्या. या गलथानपणामुळे विद्यापीठाच्या बेअब्रूबरोबरच कुलगुरू डॉ. संजय देशमुख, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर सर्व स्तरांतून टीकेची झोड उठली होती.मंगळवार दुपारपर्यंत आयडॉलच्या टी.वाय.बीकॉम आणि एम. कॉमच्या चौथ्या सत्राचे निकाल बाकी होते. त्यामुळे सुमारे साडेतेरा हजार विद्यार्थ्यांचे निकाल लागलेले नव्हते, पण मंगळवारी रात्री उशिरा विद्यापीठाने संकेतस्थळावर हे दोन्ही निकाल जाहीर करून, सर्व ४७७ निकालांचा आकडा पूर्ण केला.मुंबई विद्यापीठातर्फे यंदा आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी करण्यात आली. लवकर निकाल लावण्यासाठी या पद्धतीचा वापर करण्यात आल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले होते, पण याचे उलट परिणाम दिसून आले. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे निकलांना लेटमार्क लागला, पण आता निकाल लागल्याने विद्यापीठाचे टेन्शन कमी झाले आहे.निकाल लागले असले, तरीही मुंबई विद्यापीठाची परीक्षा अजून संपलेली नाही. कारण निकालातील त्रुटींमुळे पुनर्मूल्यांकनाचा आकडा बराच वाढला आहे. या उत्तरपत्रिकांची योग्य प्रकारे तपासणी करून विद्यापीठाला लवकर निकाल जाहीर करावे लागणार आहेत.।प्रभारी खांद्यावर किती दिवस चालणार कारभार?मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उतरपत्रिका तपासणीच्या निर्णयामुळे, कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना राज्यपाल यांनी कारणे दाखवा नोटीस दिली होती आणि कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. तेव्हापासून कुलगुरू, प्र- कुलगुरू, कुलसचिव आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक ही सर्व पदे प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. या सर्व पदाची नियुक्ती निकाल लागेपर्यंत अथवा तीन महिने करण्यात आली होती.आता निकाल जाहीर झाले आहेत, तर दुसरीकडे कुलगुरूंनी राज्यपालांना ३ हजार शब्दांचे पत्रदेखील दिले आहे. त्यामुळे आता कुलगुरू डॉ. संजय देशमुख पुन्हा कार्यभार कधी स्वीकारणार की, विद्यार्थी संघटनांचा विरोध असल्यामुळे नक्की काय होणार, यावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.