शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
3
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
4
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
5
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
6
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
7
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
8
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
9
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
10
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
11
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
12
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
13
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
14
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
15
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
16
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
17
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
18
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
19
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर मानवी हक्क आयोगाला मिळाला १४ महिन्यांनंतर विशेष महानिरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 05:19 IST

वायरलेसमध्ये कार्यरत अब्दुर रेहमान यांची बढतीवर नियुक्ती

मुंबई : शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी कार्यरत असलेल्या राज्य मानवी हक्क आयोगामध्ये, अखेर १४ महिन्यांनंतर विशेष महानिरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिनतारी संदेश यंत्रणेचे उपमहानिरीक्षक अब्दुर रेहमान यांची बढतीवर या पदावर सोमवारी नियुक्ती करण्यात आली.

राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाखल होणाºया तक्रारींचा तपास विभागाचे प्रमुखपद हे महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे आहे. गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला तत्कालीन अधिकारी केशव पाटील निवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त होते. वास्तविक, पोलीस वर्तुळात या पदाला साइडची पोस्ट समजली जाते. अब्दुर रेहमान हे १९९७च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. गेली बरीच वर्षे पुणे वायरलेसमध्ये ते कार्यरत होते.

बदली झालेल्या अन्य अधिकाºयांची नावे अशी (कंसात कोठून-कोठे) :उपायुक्त/अधीक्षक (भापोसे) : पंकज देशमुख (सातारा-पुणे शहर), हरिश बैजल (गोंदिया - एसआरपीएफ गट क्रमांक ६, धुळे), विनिता साहू (भंडारा - गोंदिया), दत्ता शिंदे (जळगाव - महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मुंबई), अरविंद साळवे (महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी - भंडारा),जयंत मीना (अमरावती ग्रामीण - बारामती), तेजस्वी सातपुते (पुणे शहर - सातारा), ईश सिंधू (महाराष्ट्र सदन, दिल्ली-अहमदनगर) तसेच रंजनकुमार शर्मा (अहमदनगर - सीआयडी नागपूर).

अप्पर अधीक्षक (मपोसे) : सुनील कडासने (गुप्तवार्ता विभाग, नाशिक - एसीबी, नाशिक), संदीप पखाले (बारामती - बीड), वैभव कलबुर्मे (बीड -चंद्रपूर), हेमराज राजपूत (चंद्रपूर - खामगाव), श्याम घुगे (खामगाव - अमरावती ग्रामीण), सचिन गोरे (एसआरपीएफ, धुळे - चाळीसगाव), प्रशांत बच्छाव (चाळीसगाव - प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे).

उपअधीक्षक : प्रशांत अमृतकर (कोल्हापूर शहर - करवीर उपविभाग), प्रेरणा कट्टे (करवीर - कोल्हापूर शहर), उत्तम कडलग (नाशिक ग्रामीण - चाळीसगाव), रिना यादवरावजी (नागपूर ग्रामीण - भंडारा), विशाल नेहुल (अष्टी बीड, बदली आदेशाधीन - औरंगाबाद ग्रामीण), सुदर्शन मुंडे (कर्जत, अहमदनगर - सिल्लोड, औरंगाबाद).‘ते’ अधिकारी साइडलानिवडणूक आयोगाने बदल्यांसाठी कार्यकाळाबरोबर गुन्हे दाखल असलेल्या, खातेनिहाय चौकशी असणाºया अधिकाºयांना कार्यकारी पदावरून साइड पोस्टिंग देण्याची सूचना केली. त्यानुसार, सोमवारी बदल्या केलेल्या काही अधीक्षकांची खात्यांतर्गत, प्राथमिक चौकशी सुरू असल्याने त्यांच्या कार्यकाळ पूर्ण झाला नसतानाही त्यांना हटविण्यात आले.