शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

...अखेर मानवी हक्क आयोगाला मिळाला १४ महिन्यांनंतर विशेष महानिरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 05:19 IST

वायरलेसमध्ये कार्यरत अब्दुर रेहमान यांची बढतीवर नियुक्ती

मुंबई : शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी कार्यरत असलेल्या राज्य मानवी हक्क आयोगामध्ये, अखेर १४ महिन्यांनंतर विशेष महानिरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिनतारी संदेश यंत्रणेचे उपमहानिरीक्षक अब्दुर रेहमान यांची बढतीवर या पदावर सोमवारी नियुक्ती करण्यात आली.

राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाखल होणाºया तक्रारींचा तपास विभागाचे प्रमुखपद हे महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे आहे. गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला तत्कालीन अधिकारी केशव पाटील निवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त होते. वास्तविक, पोलीस वर्तुळात या पदाला साइडची पोस्ट समजली जाते. अब्दुर रेहमान हे १९९७च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. गेली बरीच वर्षे पुणे वायरलेसमध्ये ते कार्यरत होते.

बदली झालेल्या अन्य अधिकाºयांची नावे अशी (कंसात कोठून-कोठे) :उपायुक्त/अधीक्षक (भापोसे) : पंकज देशमुख (सातारा-पुणे शहर), हरिश बैजल (गोंदिया - एसआरपीएफ गट क्रमांक ६, धुळे), विनिता साहू (भंडारा - गोंदिया), दत्ता शिंदे (जळगाव - महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मुंबई), अरविंद साळवे (महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी - भंडारा),जयंत मीना (अमरावती ग्रामीण - बारामती), तेजस्वी सातपुते (पुणे शहर - सातारा), ईश सिंधू (महाराष्ट्र सदन, दिल्ली-अहमदनगर) तसेच रंजनकुमार शर्मा (अहमदनगर - सीआयडी नागपूर).

अप्पर अधीक्षक (मपोसे) : सुनील कडासने (गुप्तवार्ता विभाग, नाशिक - एसीबी, नाशिक), संदीप पखाले (बारामती - बीड), वैभव कलबुर्मे (बीड -चंद्रपूर), हेमराज राजपूत (चंद्रपूर - खामगाव), श्याम घुगे (खामगाव - अमरावती ग्रामीण), सचिन गोरे (एसआरपीएफ, धुळे - चाळीसगाव), प्रशांत बच्छाव (चाळीसगाव - प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे).

उपअधीक्षक : प्रशांत अमृतकर (कोल्हापूर शहर - करवीर उपविभाग), प्रेरणा कट्टे (करवीर - कोल्हापूर शहर), उत्तम कडलग (नाशिक ग्रामीण - चाळीसगाव), रिना यादवरावजी (नागपूर ग्रामीण - भंडारा), विशाल नेहुल (अष्टी बीड, बदली आदेशाधीन - औरंगाबाद ग्रामीण), सुदर्शन मुंडे (कर्जत, अहमदनगर - सिल्लोड, औरंगाबाद).‘ते’ अधिकारी साइडलानिवडणूक आयोगाने बदल्यांसाठी कार्यकाळाबरोबर गुन्हे दाखल असलेल्या, खातेनिहाय चौकशी असणाºया अधिकाºयांना कार्यकारी पदावरून साइड पोस्टिंग देण्याची सूचना केली. त्यानुसार, सोमवारी बदल्या केलेल्या काही अधीक्षकांची खात्यांतर्गत, प्राथमिक चौकशी सुरू असल्याने त्यांच्या कार्यकाळ पूर्ण झाला नसतानाही त्यांना हटविण्यात आले.