शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

पालिकेतील ध्वजसेवेचा ‘त्यांचा’ अखेरचा स्वातंत्र्य दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2016 03:22 IST

मुंबई महानगरपालिकेच्या बोरीबंदर येथील मुख्यालयातही प्रथेप्रमाणे मुंबईचे प्रथम नागरिक म्हणून महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण होईल

प्रवीण दाभोळकर,

मुंबई- सत्तरावा स्वातंत्र्य दिन भारतभरात साजरा होत असताना, मुंबई महानगरपालिकेच्या बोरीबंदर येथील मुख्यालयातही प्रथेप्रमाणे मुंबईचे प्रथम नागरिक म्हणून महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. या वेळी परिरक्षक अरविंद विचारे हे या ध्वजाची दोरी महापौरांकडे देतील. या मुख्यालयातील तिरंगा ध्वजाची दिवसरात्र काळजी घेणाऱ्या विचारे कुटुंबीयांसाठी हा स्वातंत्र्य दिन भावनिक असणार आहे. गेली २८ वर्षे ध्वजसेवा करणारे परिरक्षक अरविंद विचारे यंदा निवृत्त होणार असल्याने, तब्बल ४५ वर्षांनंतर तिरंग्याची दोरी आता विचारे कुटुंबीयांकडे नसेल. १२५ फूट उंचीवर असलेल्या ध्वजस्तंभावर पालिकेचा राष्ट्रध्वज सूर्योदयाला सन्मानाने चढविण्याची आणि सूर्यास्ताला उतरविण्याची जबाबदारी महापालिकेच्या परिरक्षण विभागात काम करणाऱ्या परिरक्षक म्हणून अरविंद विचारे यांच्याकडे आहे. ऊन, वारा, पाऊस किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती असली, तरीही पालिकेच्या मुख्यालयावर हा तिरंगा डौलाने फडकत असतो. राष्ट्रीय दिनी या मुख्यालयावर चार राष्ट्रीय ध्वज लावले जातात. गेली ४५ वर्षांतील कोणत्याही स्वातंत्र्य दिनी व प्रजासत्ताक दिनी विचारे कधीही गैरहजर नव्हते. हे दोन दिवस अरविंद विचारे यांच्यासाठीच नव्हे, तर या कुटुंबीयांसाठी एक सोहळाच असतो. महापालिकेच्या परिरक्षण विभागांतर्गत काम करणारे शांताराम विचारे यांनी १९७१ पासून ही जबाबदारी संभाळली, ते १९८६ साली सेवानिवृत्त झाले. त्यानंतर, त्यांचे पुत्र अरविंद विचारे यांनी आजतागायत ही जबाबदारी पार पाडत, आपल्या वडिलांचा वारसा सांभाळत आहेत. यातील १७ वर्षे शांताराम विचारे हे या तिरंग्याची काळजी घेत होते. ते सेवानिवृत्त झाल्यावर त्यांचा मुलगा अरविंद विचारे पुढील २८ वर्षे ही जबाबदारी पार पाडत आहेत. ज्या दिवशी सूर्यास्ताला राष्ट्रध्वज उतरवून शांताराम विचारे हे सेवानिवृत्त झाले, त्याच्याच दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला या राष्ट्रध्वजाची दोरी अरविंद विचारे यांच्या हातात आली ती आजतागायत. ध्वजाचा कायदा, सन्मान, निगा राखण्यात तसूभरही फरक पडणार नाही, याची काळजी विचारे पिता-पुत्रांनी घेतली.राष्ट्रीय ध्वजापर्यंत पोहोचण्यासाठी महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावरुन गोलाकार असलेल्या ५७ पायऱ्या चढून सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या काही काळ अगोदर ध्वजस्तंभापाशी जावे लागत. पंचागाच्या वेळेप्रमाणे सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळा विचारेंना पाळावी लागते. अरविंद विचारेंचे बालपणही याच इमारतीच्या आवारात गेल्याने पालिकेच्या इमारतीच्या कानाकोपऱ्याची त्यांना अचूक माहिती आहे. यामुळे महापालिकेवर आलेल्या आपत्तींच्या वेळी त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. पालिकेच्या परिरक्षण खात्यातीलच जयराम खंडमळे आणि राजेंद्र भताणे यांची सहायक म्हणून त्यांना मदत होत असते. बऱ्याचदा दोघांची सुट्टी असली किंवा गैरहजर असले, तरी अरविंद विचारे यांना कोणतीही सबब देता येत नाही. त्यामुळे सणसूद, नातेवाईक यांच्यासाठी त्यांना वेळ देता येत नाही. नियमाप्रमाणे ३१ डिसेंबर २०१६ रोजी अरविंद विचारे सेवानिवृत्त होतील. त्यानंतर, ४५ वर्षांनंतर प्रथमच परिरक्षकाची आणि राष्ट्रीय ध्वजाची जबाबदारी विचारे कुटुंबीयांकडे नसेल.ध्वजारोहणाची जबाबदारी पार पाडताना, इतर महत्त्वाच्या इमारतींशी समन्वय ठेवावा लागतो. मुंबई महापालिकेच्या इमारतीजवळ आणखी चार इमारतींवर झेंडे फडकताना दिसतात. त्यात रेल्वे मुख्यालय, जी.पी.ओ कार्यालय, दक्षिणेकडील उच्च न्यायालय तसेच इंदिरा डॉक या चारही ठिकाणी राष्ट्रध्वज समन्वयाने एकाच वेळी चढविले जातात आणि उतरविले जातात.>वर्षातील ३६५ दिवस ध्वजारोहण करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याची संधी या निमित्ताने गेली ४५ वर्षे आमच्या कुटुंबाकडे आहे. ही माझ्यासाठी अभिमान आणि भाग्याची गोष्ट आहे. वयाची ५८ वर्षे पूर्ण झाल्याने निवृत्तीमुळे पुढच्या स्वातंत्र्य दिनी मी इथे नसेन, पण इथल्या आठवणी कायम तशाच राहतील.- अरविंद विचारे, परिरक्षक, मुंबई महानगरपालिका