शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या हक्काचे पाच पन्नास लोक विधानसभेत शंभर टक्के पाठविणार: मनोज जरांगे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 05:52 IST

मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्याने अंतरवाली सराटीतच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, वडीगोद्री (जि. जालना) : विधानभवनात आवाज उठवायला हवा. त्यामुळे आमच्या हक्काचे पाच पन्नास लोक शंभर टक्के आम्ही पाठवणार. तरीही समाजाचा विचार घेऊन २९ ऑगस्टला यासंबंधी सर्व काही ठरवणार, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

विधान परिषदेला ज्या आमदारक्या मिळतात, त्या मराठा समाजात फूट पाडण्यासाठीच मिळत आहेत. त्यांना शांततेने सुरू असलेल्या आंदोलनात काहीतरी घडवून आणायचे आहे. ७ ऑगस्टच्या रॅलीत काही अनुचित प्रकार घडवून आणण्याची शक्यता असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. 

मंगळवारी मराठा ठोक मोर्चाच्या काही आंदोलकांनी उद्धवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यासंदर्भात जरांगे म्हणाले की, सर्वच पक्षांना जाब विचारला पाहिजे. वैयक्तिक कोणाच्या दारात तुम्ही आंदोलन करू शकता. पण मराठ्यांचे सध्या कुठेही  आंदोलन सुरू नसताना तुम्ही आंदोलन करता, म्हणजे हा काहीतरी डाव आहे.  

प्रकृती खालावली  

जरांगे यांची तब्येत खालावल्याने अंतरवाली सराटीतच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. मंगळवारी दुपारी त्यांना अशक्तपणा जाणवू लागला. तसेच रक्तदाब कमी झाल्याने त्यांना घरीच सलाइन लावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण