शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

आमच्या हक्काचे पाच पन्नास लोक विधानसभेत शंभर टक्के पाठविणार: मनोज जरांगे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 05:52 IST

मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्याने अंतरवाली सराटीतच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, वडीगोद्री (जि. जालना) : विधानभवनात आवाज उठवायला हवा. त्यामुळे आमच्या हक्काचे पाच पन्नास लोक शंभर टक्के आम्ही पाठवणार. तरीही समाजाचा विचार घेऊन २९ ऑगस्टला यासंबंधी सर्व काही ठरवणार, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

विधान परिषदेला ज्या आमदारक्या मिळतात, त्या मराठा समाजात फूट पाडण्यासाठीच मिळत आहेत. त्यांना शांततेने सुरू असलेल्या आंदोलनात काहीतरी घडवून आणायचे आहे. ७ ऑगस्टच्या रॅलीत काही अनुचित प्रकार घडवून आणण्याची शक्यता असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. 

मंगळवारी मराठा ठोक मोर्चाच्या काही आंदोलकांनी उद्धवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यासंदर्भात जरांगे म्हणाले की, सर्वच पक्षांना जाब विचारला पाहिजे. वैयक्तिक कोणाच्या दारात तुम्ही आंदोलन करू शकता. पण मराठ्यांचे सध्या कुठेही  आंदोलन सुरू नसताना तुम्ही आंदोलन करता, म्हणजे हा काहीतरी डाव आहे.  

प्रकृती खालावली  

जरांगे यांची तब्येत खालावल्याने अंतरवाली सराटीतच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. मंगळवारी दुपारी त्यांना अशक्तपणा जाणवू लागला. तसेच रक्तदाब कमी झाल्याने त्यांना घरीच सलाइन लावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण