शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

विधान परिषदेसाठी आतापासून फिल्डिंग; राष्ट्रवादीच्या जागा कमी होणार, तर भाजपाच्या वाढणार

By अतुल कुलकर्णी | Updated: February 23, 2018 06:13 IST

विधानसभेतून निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या ११ जागांची मुदत २७ जुलै रोजी संपत आहे.

मुंबई : विधानसभेतून निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या ११ जागांची मुदत २७ जुलै रोजी संपत आहे. त्यात चार जागा राष्टÑवादीच्या असून आहे ते संख्याबळ आणि काँग्रेसला दिलेला शब्द यासाठी त्यांना तीन जागांवर पाणी सोडावे लागणार आहे. यामुळे किमान दोन जागा कशा मिळवता येतील यासाठी राष्टÑवादीची धडपड सुरू झाली आहे. राष्टÑवादीचे अ‍ॅड. जयदेव गायकवाड, सुनील तटकरे, नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडीत, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त व शरद रणपिसे तसेच भाजपाचे भाई गिरकर आणि महादेव जानकर तर शिवसेनेचे अनिल परब व शेकापचे जयंत पाटील या ११ आमदारांची मुदत २७ जुलै रोजी संपत आहे.काँग्रेस आणि राष्टÑवादीचे विधानसभेतील संख्याबळ ८३आहे. त्यापैकी काँगे्रसचे कालिदास कोळंबकर आणि नितेश राणे हेकाँग्रेस उमेदवारांना मतदान करतील की नाही याविषयी काँग्रेस नेतृत्वाला शंका आहे. त्यामुळे आहे त्या८१ एवढ्या संख्याबळावर दोघांचे मिळून तीन आमदार कसेबसेनिवडून येऊ शकतात. राष्टÑवादीने रामराजे नाईक निंबाळकर आणि धनंजय मुंडे यांच्या मागील निवडणुकीच्यावेळी काँग्रेसचा पाठिंबा घेताना पुढच्या निवडणुकीतआम्ही तुम्हाला एक जागा सोडूअसे आश्वासन दिले होते. त्यामुळेती एक जागा आता राष्ट्रवादीने आम्हाला सोडावी असे काँग्रेसचे म्हणणे आहे. कारण यावेळी काँग्रेसच्या तीन आमदारांचीमुदत संपणार आहे. त्यात माणिकराव ठाकरे हे सध्या उपसभापती आहेत आणि पक्षाचे प्रभारी मोहनप्रकाश यांच्यांशी त्यांचे सख्य आहे. शरद रणपिसे व संजय दत्त यांच्यापैकी कोणाची निवड होणार हा प्रश्न कायम आहे.शिवसेनेचे विधानसभेत ६३ आमदार आहेत. ते दोन आमदार आरामात निवडून आणू शकतात. तरीही त्यांच्याकडे काही मते शिल्लक राहतील. त्यामुळे अनिल परब यांना पुन्हा संधी देताना सेना दुसरीजागा कोणाला देणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. त्यासाठी नुकतेच सचिव झालेले मिलींद नार्वेकर जोरदार प्रयत्न करत आहेत. काँग्रेस, राष्टÑवादीतील आपापसातील मारामारी पहाता शेकापचे जयंत पाटील यांना विधानसभेतून निवडून येणे अवघड आहे. ते उभे राहिले तर विरोधकांचीच अडचण होणारआहे. रायगड स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून आलेल्या अनिल तटकरे यांची मुदत ३१ मे रोजीसंपत आहे. त्यांची जागी जयंत पाटील यांना देऊन स्थानिक राजकारण सांभाळायचे व त्याचा फायदा लोकसभा, विधानसभेला घ्यायचाकी पुन्हा अनिल तटकरेंनाच संधी द्यायची याचा निर्णय राष्ट्रवादीला घ्यायचा आहे.या सगळ्यात भाजपाचा मात्र फायदा होणार आहे. त्यांचे दोन विद्यमान आमदार तर निवडून येतीलच शिवाय आणखी चौघांना त्यांना निवडून आणणे शक्य होणार आहे. राष्टÑवादीचे विद्यमान आ. व माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांना या राष्टÑवादीतून संधी मिळणार नाही हे लक्षात आले आहे. त्यामुळे ते भाजपाशी संधान साधून असल्याचे सांगितले जाते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावून त्यांनी नवी मुंबईत दोन मोठे कार्यक्रमही घेत भाजपात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यांच्यामुळे भाजपाकडे कामगार नेता येऊ शकतो. मात्र पुन्हा पक्षाबाहेरच्या लोकांनाच संधी देत भाजपाच्या निष्ठावंतांना आणखी कितीवेळा डावलणार असे सवाल पक्षात सुरु झाले आहेत.