शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

विधान परिषदेसाठी आतापासून फिल्डिंग; राष्ट्रवादीच्या जागा कमी होणार, तर भाजपाच्या वाढणार

By अतुल कुलकर्णी | Updated: February 23, 2018 06:13 IST

विधानसभेतून निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या ११ जागांची मुदत २७ जुलै रोजी संपत आहे.

मुंबई : विधानसभेतून निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या ११ जागांची मुदत २७ जुलै रोजी संपत आहे. त्यात चार जागा राष्टÑवादीच्या असून आहे ते संख्याबळ आणि काँग्रेसला दिलेला शब्द यासाठी त्यांना तीन जागांवर पाणी सोडावे लागणार आहे. यामुळे किमान दोन जागा कशा मिळवता येतील यासाठी राष्टÑवादीची धडपड सुरू झाली आहे. राष्टÑवादीचे अ‍ॅड. जयदेव गायकवाड, सुनील तटकरे, नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडीत, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त व शरद रणपिसे तसेच भाजपाचे भाई गिरकर आणि महादेव जानकर तर शिवसेनेचे अनिल परब व शेकापचे जयंत पाटील या ११ आमदारांची मुदत २७ जुलै रोजी संपत आहे.काँग्रेस आणि राष्टÑवादीचे विधानसभेतील संख्याबळ ८३आहे. त्यापैकी काँगे्रसचे कालिदास कोळंबकर आणि नितेश राणे हेकाँग्रेस उमेदवारांना मतदान करतील की नाही याविषयी काँग्रेस नेतृत्वाला शंका आहे. त्यामुळे आहे त्या८१ एवढ्या संख्याबळावर दोघांचे मिळून तीन आमदार कसेबसेनिवडून येऊ शकतात. राष्टÑवादीने रामराजे नाईक निंबाळकर आणि धनंजय मुंडे यांच्या मागील निवडणुकीच्यावेळी काँग्रेसचा पाठिंबा घेताना पुढच्या निवडणुकीतआम्ही तुम्हाला एक जागा सोडूअसे आश्वासन दिले होते. त्यामुळेती एक जागा आता राष्ट्रवादीने आम्हाला सोडावी असे काँग्रेसचे म्हणणे आहे. कारण यावेळी काँग्रेसच्या तीन आमदारांचीमुदत संपणार आहे. त्यात माणिकराव ठाकरे हे सध्या उपसभापती आहेत आणि पक्षाचे प्रभारी मोहनप्रकाश यांच्यांशी त्यांचे सख्य आहे. शरद रणपिसे व संजय दत्त यांच्यापैकी कोणाची निवड होणार हा प्रश्न कायम आहे.शिवसेनेचे विधानसभेत ६३ आमदार आहेत. ते दोन आमदार आरामात निवडून आणू शकतात. तरीही त्यांच्याकडे काही मते शिल्लक राहतील. त्यामुळे अनिल परब यांना पुन्हा संधी देताना सेना दुसरीजागा कोणाला देणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. त्यासाठी नुकतेच सचिव झालेले मिलींद नार्वेकर जोरदार प्रयत्न करत आहेत. काँग्रेस, राष्टÑवादीतील आपापसातील मारामारी पहाता शेकापचे जयंत पाटील यांना विधानसभेतून निवडून येणे अवघड आहे. ते उभे राहिले तर विरोधकांचीच अडचण होणारआहे. रायगड स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून आलेल्या अनिल तटकरे यांची मुदत ३१ मे रोजीसंपत आहे. त्यांची जागी जयंत पाटील यांना देऊन स्थानिक राजकारण सांभाळायचे व त्याचा फायदा लोकसभा, विधानसभेला घ्यायचाकी पुन्हा अनिल तटकरेंनाच संधी द्यायची याचा निर्णय राष्ट्रवादीला घ्यायचा आहे.या सगळ्यात भाजपाचा मात्र फायदा होणार आहे. त्यांचे दोन विद्यमान आमदार तर निवडून येतीलच शिवाय आणखी चौघांना त्यांना निवडून आणणे शक्य होणार आहे. राष्टÑवादीचे विद्यमान आ. व माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांना या राष्टÑवादीतून संधी मिळणार नाही हे लक्षात आले आहे. त्यामुळे ते भाजपाशी संधान साधून असल्याचे सांगितले जाते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावून त्यांनी नवी मुंबईत दोन मोठे कार्यक्रमही घेत भाजपात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यांच्यामुळे भाजपाकडे कामगार नेता येऊ शकतो. मात्र पुन्हा पक्षाबाहेरच्या लोकांनाच संधी देत भाजपाच्या निष्ठावंतांना आणखी कितीवेळा डावलणार असे सवाल पक्षात सुरु झाले आहेत.