शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

राज्यात अकरावी प्रवेशासाठी आजपासून एफसीएफएस फेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 07:01 IST

सात टप्प्यांत विभागणी : विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आणखी एक संधी

ठळक मुद्देसात टप्प्यांत विभागणी : विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आणखी एक संधी

मुंबई : राज्यातील पाच विभागांत ऑनलाइन अकरावी प्रवेशासाठी प्रवेशाच्या तीन नियमित व एक विशेष फेरी होऊनही अद्याप दोन लाखांहून अधिक जागा रिक्त आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी अद्यापही अनेक कारणांनी प्रवेश घेतलेले नाहीत, तर अनेकजण प्रवेशाच्या यादीत नाव न आल्याने प्रवेशापासून वंचित आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) फेरीला मान्यता देण्यात आली असून, मंगळवारपासून ही फेरी राबविण्यात येणार आहे. या फेरीची सात टप्प्यांत विभागणी करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे. 

अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेमुळे दहावीचा सगळ्यात जास्त निकाल यंदा लागला. मात्र अपेक्षेपेक्षा कमी प्रवेशाची निश्चिती झाल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. अनेकांना महाविद्यालयांच्या नव्वदीपार कट ऑफमुळे यादीत जागाच मिळाली नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एफसीएफएसचे आयोजन केले आहे. मंगळवारपासून (दि. २८) या फेरीला सुरुवात होत असून, १३ ऑक्टोबरपर्यंत ही फेरी सुरू राहणार आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये रिक्त जागा आहेत, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अर्ज करून हे प्रवेश घेता येणार आहेत. पहिल्या फेरीसाठी दि. २८ व २९ सप्टेंबर या दोन दिवसांत नोंदणी करून संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करता येणार आहेत, तर शेवटचा टप्पा एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसाठी १३ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. यानंतरही रिक्त राहिलेल्या जागांची माहिती शिक्षण विभागाकडून जाहीर केली जाणार असल्याचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.

विशेष फेरीच्या अखेर अमरावती विभागात ८,९५७, मुंबई विभागात १,८४,७०१, नागपूर विभागात २८,९३४, नाशिक विभागात १६,५४५, तर पुणे विभागात ६०,८७८ प्रवेश झाले आहेत. राज्यभरातील या पाच विभागात विशेष फेरीच्या अखेर तीन लाख १५ प्रवेश झाले आहेत. अद्यापही दोन लाख ३४ हजार जागा रिक्त असून, एफसीएफएस फेरीत या जागांवर प्रवेश होणार आहेत. 

एफसीएफएस प्रवेशाचे टप्पे 

पहिला टप्पा २८ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर९० टक्क्यांवरील विद्यार्थीदुसरा टप्पा३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर,८० टक्क्यांवरील विद्यार्थी तिसरा टप्पा२ ते ४ ऑक्टोबर७० टक्क्यांवरील विद्यार्थी चौथा टप्पा५ ते ६ ऑक्टोबर६० टक्क्यांवरील विद्यार्थी पाचवा टप्पा ७ ते ९ ऑक्टोबर५० टक्क्यांवरील विद्यार्थी सहावा टप्पा१० ते १२ ऑक्टोबरदहावी पास होऊन प्रवेशास पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सातवा टप्पा१३ ते १४ ऑक्टोबरएटीकेटी उत्तीर्ण आणि दहावी उत्तीर्ण असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी.

टॅग्स :collegeमहाविद्यालयMaharashtraमहाराष्ट्र