शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राज्यात अकरावी प्रवेशासाठी आजपासून एफसीएफएस फेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 07:01 IST

सात टप्प्यांत विभागणी : विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आणखी एक संधी

ठळक मुद्देसात टप्प्यांत विभागणी : विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आणखी एक संधी

मुंबई : राज्यातील पाच विभागांत ऑनलाइन अकरावी प्रवेशासाठी प्रवेशाच्या तीन नियमित व एक विशेष फेरी होऊनही अद्याप दोन लाखांहून अधिक जागा रिक्त आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी अद्यापही अनेक कारणांनी प्रवेश घेतलेले नाहीत, तर अनेकजण प्रवेशाच्या यादीत नाव न आल्याने प्रवेशापासून वंचित आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) फेरीला मान्यता देण्यात आली असून, मंगळवारपासून ही फेरी राबविण्यात येणार आहे. या फेरीची सात टप्प्यांत विभागणी करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे. 

अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेमुळे दहावीचा सगळ्यात जास्त निकाल यंदा लागला. मात्र अपेक्षेपेक्षा कमी प्रवेशाची निश्चिती झाल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. अनेकांना महाविद्यालयांच्या नव्वदीपार कट ऑफमुळे यादीत जागाच मिळाली नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एफसीएफएसचे आयोजन केले आहे. मंगळवारपासून (दि. २८) या फेरीला सुरुवात होत असून, १३ ऑक्टोबरपर्यंत ही फेरी सुरू राहणार आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये रिक्त जागा आहेत, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अर्ज करून हे प्रवेश घेता येणार आहेत. पहिल्या फेरीसाठी दि. २८ व २९ सप्टेंबर या दोन दिवसांत नोंदणी करून संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करता येणार आहेत, तर शेवटचा टप्पा एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसाठी १३ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. यानंतरही रिक्त राहिलेल्या जागांची माहिती शिक्षण विभागाकडून जाहीर केली जाणार असल्याचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.

विशेष फेरीच्या अखेर अमरावती विभागात ८,९५७, मुंबई विभागात १,८४,७०१, नागपूर विभागात २८,९३४, नाशिक विभागात १६,५४५, तर पुणे विभागात ६०,८७८ प्रवेश झाले आहेत. राज्यभरातील या पाच विभागात विशेष फेरीच्या अखेर तीन लाख १५ प्रवेश झाले आहेत. अद्यापही दोन लाख ३४ हजार जागा रिक्त असून, एफसीएफएस फेरीत या जागांवर प्रवेश होणार आहेत. 

एफसीएफएस प्रवेशाचे टप्पे 

पहिला टप्पा २८ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर९० टक्क्यांवरील विद्यार्थीदुसरा टप्पा३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर,८० टक्क्यांवरील विद्यार्थी तिसरा टप्पा२ ते ४ ऑक्टोबर७० टक्क्यांवरील विद्यार्थी चौथा टप्पा५ ते ६ ऑक्टोबर६० टक्क्यांवरील विद्यार्थी पाचवा टप्पा ७ ते ९ ऑक्टोबर५० टक्क्यांवरील विद्यार्थी सहावा टप्पा१० ते १२ ऑक्टोबरदहावी पास होऊन प्रवेशास पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सातवा टप्पा१३ ते १४ ऑक्टोबरएटीकेटी उत्तीर्ण आणि दहावी उत्तीर्ण असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी.

टॅग्स :collegeमहाविद्यालयMaharashtraमहाराष्ट्र