शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांमुळे गमावला मुलाने जीव, खड्डे बुजवून वडिलांची अनोखी श्रद्धांजली

By admin | Updated: February 1, 2016 13:40 IST

रस्त्यावरील खड्ड्यामुळे मुलाने जीव गमावल्यानंतर त्याचे वडील रस्त्यांवरील खड्डे स्वत: बुजवून मुलाला श्रद्धांजली वाहत आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - रस्त्यावरील उघड्या पॉटहोलला धडकून बाईकच्या झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे दु:ख विसरता यावे आणि अशी परिस्थिती इतर कोणावरही येऊ नये यासाठी दादाराव बिल्होरे गेल्या महिन्याभरापासून रस्त्यावरील उघडे खड्डे माती-विटांनी भरत आहेत. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, मरोळचे रहिवासी असलेले बिल्होरे यांनी गेल्या महिन्याभरात एक डझन वा त्याहून अधिक खड्डे बुजवत आपल्या मुलाला श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न केला आहे.
मरोळमधील विजयनगर येथे भाजी विकण्याचा व्यवसाय करणारे बिल्होरे यांनी रात्रंदिवस मेहनत करून आपल्या मुलांना शिकवलं. १६ वर्षीय प्रकाश हा इंग्रजी मीडियममध्ये शिकणारा त्यांच्या कुटुंबातील पहिला सदस्य होता. मात्र गेल्या वर्षी २८ जुलै रोजी तो त्याचा चुलतभाऊ रामसह भांडूपच्या नवजीवन एज्युकेशन सोसायटीच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन परत येत होता. तेव्हा मुसळधार पावसामुळे जोगेश्वरी-विक्रोली लिंक रोडवर पाणी साचल्याने उघडा असलेला पॉटहोल न दिसल्याने त्यांच्या बाईकचा अपघात झाला आणि प्रकाशला जीव गमवावा लागला तर त्याचा भाऊ रामलाही डोक्याला गंभीर जखम झाली. 
मात्र या घटनेनंतर दादाराव यांचे अवघे आयुष्यच बदलले. प्रकाशला न्याय मिळावा आणि निष्काळजीपणे रस्ता खोदून, पॉटहोल्स उघडी टाकणा-यांना कठोर शिक्षा मिळावी यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून ते लढा देत आहेत. मात्र कायदेशीर लढा सुरू असतानाच इतर कोणत्याही निष्पाप नागरिकांना असा त्रास वा कोणाचाही वियोग सहन करावा लागू नये यासाठी ज्या रस्त्यावर उघडे पॉटहोल्स दिसतात, त्यावर दादाराव स्वत:च्या हातांनी दगड-विटा टाकून ते बुजवात. ' माझ्या मुलाबाबतीत जे झाले ते इतर कोणाबाबतीत व्हावे असे मला वाटत नाही, माझ्या मुलालाही तसं वाटलं नसतं. तो अतिशय हुशार, भरभूरन जगणारा आणि मनमिळावू मुलगा होता. त्याच्या मृत्यूला जबाबदार असणा-यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी तर मी लढा देईनच. पण जे मला आणि माझ्या कुटुंबाला सहन करावं लागलं, तशी वेळ इतरांवर येऊ नये असं मला वाटतं' असा भरल्या डोळ्यांनी दादाराव सांगतात.
स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून इतरांच्या भल्यासाठी हे काम करणा-या दादाराव यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या परिसरातील इतर नागरिकांनाही त्यांना मदत करण्यास सुरूवात केली आहे.