शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जन्मदात्या बापाने केली तीन लहान मुलांची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:09 IST

या घटनेतील तिन्ही मुले अल्पवयीन असल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अकोला: बोरगाव येथील धोतर्डी परिसरात बुधवारी वडिलांनी आपल्या तीन लहान मुलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर वडिलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न अपयशी ठरला. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. आज संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेतील तिन्ही मुले अल्पवयीन असल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. अजय विष्णू इंगळे (17),  मनोज विष्णू इंगळे (16), शिवानी विष्णू इंगळे (15), अशी या लहा मुलांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णू इंगळे यांनी आधी विष पाजून मुलांना ठार मारण्याचा प्रयत्न केला असावा. मात्र, त्याचा फारसा परिणाम न झाल्याने विष्णू  इंगळे यांनी दोन मुलांना शॉक देऊन ठार केले. तर एकाच्या डोक्यात घरातील वरवंटा घालून त्याला ठार मारले. त्यानंतर विष्णू इंगळे यांनी शॉक आणि गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. इतके करूनही जीव जात नसल्याने विष्णू इंगळे यांनी शरीरावर धारदार शस्त्राने वार करून घेतले. परंतु, त्यांचे हे सर्व प्रयत्न फसले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, नागरिकांनी रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्यामुळे मुलांचे प्राण गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. विष्णू इंगळे यांनी हे कृत्य का केले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. 

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा