शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

फत्तेहसिंह पाटील यांची बदली तडकाफडकी रद्द

By admin | Updated: August 15, 2015 00:17 IST

हुंड्यासाठी छळाच्या आरोपाप्रकरणी बहुचर्चित राधे माँ यांच्याविरुद्ध आणि मालवणीतील प्रेमी युगुलांच्या मागे ससेमिरा लावल्याच्या घटनेची चौकशी करणारे अतिरिक्त पोलिस आयुक्त फत्तेहसिंह पाटील

मुंबई : हुंड्यासाठी छळाच्या आरोपाप्रकरणी बहुचर्चित राधे माँ यांच्याविरुद्ध आणि मालवणीतील प्रेमी युगुलांच्या मागे ससेमिरा लावल्याच्या घटनेची चौकशी करणारे अतिरिक्त पोलिस आयुक्त फत्तेहसिंह पाटील यांची शुक्रवारी सकाळी तडकाफडकी उचलबांगडी करुन नांदेडला बदली करण्यात आली. परंतु अनेक थरांतून टीका झाल्यानंतर अणि विशेष म्हणजे स्वत: पोलीस आयुक्तांनीच हस्तक्षेप केल्यानंतर पाटील यांची ही बदली तेवढ्याच घाईगर्दीने सायंकाळी रद्दही केली.गुरुवारी रात्रीच गृह खात्याने पाटील यांच्या बदलीचा आदेश जारी करीत त्यांची तात्काळप्रभावाने नांदेड येथे पोलिस उप-महानिरीक्षक म्हणून रवानगी केली होती. आम्ही ही बदली रद्द करण्याची सरकारला विनंती केली व ती मान्य करण्यात आली, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.अडीच महिन्यापूर्वीच मुंबईत आलेल्या फत्तेहसिंह पाटील यांनी हा निर्णय आश्चर्यकारक आणि धक्कादायक असल्याचे ‘लोकमत’ला दुपारी सांगितले होते. संध्याकाळी बदली रद्द झाल्याचे कळल्यावर ते म्हणाले, मी माझे काम जोमाने करीत होतो. राधेमाँला उच्च न्यायालयाने अटकेपासून दोन अठवड्यांचा दिलासा दिल्यानंतर लगेच अम्ही तिचे जाजबजबाही नोंदविले. पुढील कारवाईविषयी आम्ही कायदा सल्लागारांश्ी सल्ला-मसलतही केली. महत्त्वाची प्रकरणे हाताळत असताना तडकाफडकी बदली करणे बेकायदेशीर ठरले असते, असेही पाटील म्हणाले. पाटील यांनी सांगितले की, अडीच महिन्यापूर्वीच मी मुंबईत आलो. फिल्म सिटीमधील गोळीबारप्रकरणाचा दोनच दिवसांत छडा लावला. मालवणीतील गावठी दारूकांडाचा तपास दिवस-रात्र केला. अलीकडेच त्यांनी उत्तर मुंबईतील काही हॉटेलांवर धाडी घालून अश्लील चाळे करणाऱ्या काही जोडप्यांनाही कायद्याचा बडगा दाखविला होता. काही पोलिस कर्मचारी गैरवर्तन करताना आढळले होते.माजी आयपीएस अधिकारी वाय. पी. सिंह यांनीही यांनीही महाराष्ट्र सरकार सेवक कायद्याचा दाखला देत पाटील यांची बदली बेकायदेशीर असल्याचे म्हटले म्हटले होते. ते काही महत्त्वाची प्रकरणे हाताळीत असताना त्यांची तडकाफडकी बदली केल्याने समाजात चुकीचा संदेश गेला असता, असेही सिंह म्हणाले.नांदेड कोणालाही नकोएका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आयजीपी पदावरील कोणत्याही अधिकाऱ्याला नांदेडला जाण्याची इच्छा नाही. कारण हे पद आयजीपी पदापेक्षा खालच्या दर्जाचे आहे. महाराष्ट्र दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. नांदेडवरही दहशतवाद्यांची नजर आहे. पाटील यांनी तेथे काही वर्षे घालविली आहेत. तेव्हा एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याची त्या ठिकाणी बदली करणे जरुरी होते. पाटील यांना त्या भागाची माहिती असल्यानेच त्यांची नांदेडला बदली करण्यात आली होती. पण आता तेही तेथे जाणार नाहीत.