शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

माळहिवरा शिवारात भरधाव पिकअपने भाविकांना उडवले; चार ठार तर ४ जण जखमी

By विजय पाटील | Updated: February 24, 2024 08:46 IST

अपघातातील जखमींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. या अपघातानंतर पिकअप चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येतंय.

हिंगोली -  जिल्ह्यातील हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर माळहिवरा शिवारात भरधाव पिकअप वाहनाने भाविकांना पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जण ठार तर ४ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी दि . .२४ सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मयत व जखमी सिरसम (ता. हिंगोली) येथील रहिवासी आहेत. जखमींवर हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील सिरसम येथील भाविक दर शनिवारी सिरसम येथून पायी माळहिवरा फाटा येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी येतात. नेहमी प्रमाणे हे भाविक आज पहाटेच सिरसम येथून माळहिवरा येथे पायी निघाले होते. सर्व भाविक माळहिवरा शिवारात आले असतांना हिंगोलीकडून अमरावतीकडे भाजीपाल्याचे रिकामे कॅरेट घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाने भाविकांना पाठीमागून धडक दिली.

या अपघातात मनोज गोपाळराव इंगळे (३९), बालाजी बाबुराव इंगळे (३२), सतीष शंकरराव थोरात (२७),  वैभव नंदू कामखेडे (२२) यांचा मृत्यू झाला तर जगन प्रल्हाद अडकिणे, उत्तम संतोष गिरी, संतोष सिताराम वसु, राजकुमार भिकाजी घाटोळकर (सर्व रा. सिरसम) हे जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी तसेच हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय रामोड, जमादार अनिल डुकरे, आकाश पंडीतकर, किशोर पवार पथकाने सर्वांना हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णालयात डॉ. मनिष बगडीया, डॉ. नंदकिशोर करवा, डॉ. नितीन पुरोहित यांच्या पथकाने आजारी रुग्णांवर तातडीने उपचार सुरु केले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. या अपघातानंतर पिकअप चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येतंय. चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Accidentअपघात