शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

शेतकऱ्यांना संजीवनी मिळणार

By admin | Updated: December 9, 2014 01:00 IST

दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकऱ्यांवर जवळपास १० हजार कोटींचे कृषी पंपाचे थकीत बिल सध्या वसूल न करता वीज जोडणी यथास्थितीत ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

वीज जोडणी ‘जैसे थे’ : ऊर्जामंत्री बावनकुळे यांची माहितीनागपूर : दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकऱ्यांवर जवळपास १० हजार कोटींचे कृषी पंपाचे थकीत बिल सध्या वसूल न करता वीज जोडणी यथास्थितीत ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात कॅबिनेट नोट लवकरच काढण्यात येणार घेतल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. बावनकुळे यांनी सोमवारी लोकमत भवनाला सदिच्छा भेट दिली आणि संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला. दुष्काळी स्थितीनंतरही शेतकऱ्यांची वीज जोडणी कापण्यात येणार असल्याचे वृत्त लोकमतने सोमवारी प्रकाशित केले होते. या वृत्तावर मंत्र्यांचे वक्तव्य शेतकऱ्यांना दिलासा देणारे आहे वितरण व पारेषण हानी कमी करणारमंत्र्यांनी ऊर्जा मंत्रालयाच्या विकासाची रूपरेषा विशद केली. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना थकीत बिलातून बाहेर काढणारी ३१ आॅक्टोबरला समाप्त झालेली कृषी संजीवनी योजना ३१ मार्चपर्यंत पुन्हा सुरू केली आहे. या अंतर्गत थकीत बिलाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना मुद्दलसह व्याजात सवलत देण्यात येणार आहे. बावनकुळे यांनी सांगितले की, ऊर्जा क्षेत्राच्या पायाभूत विकासाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी वीज कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून सादरीकरणाद्वारे माहिती घेत आहे. त्यानंतर सरकार विशेष योजना तयार करणार आहे.दोषी कंपन्यांवर दंडमहावितरणद्वारे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सुरू केलेल्या इन्फ्रा-१ योजनेचा कंत्राट मिळालेल्या कंपन्यांनी फीडर सेपरेशन आणि अन्य कामे अपूर्ण सोडली आहेत. अशा सर्व कंपन्यांवर दंड आकारून त्यांची बँक गॅरंटी जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.विजेची हानी कमी करणार सोमवारी महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. १८ टक्के वितरण आणि पारेषण हानी कमी करण्याचा प्रयत्न राहील. त्यासाठी इन्फ्रा-२ ही पूर्वीच्या सरकारची योजना निविदा निघाल्यामुळे पुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फीडरचे मोठे अंतर छोटे करण्यात येईल. ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती आणि ५० ते ६० सबस्टेशन तयार करण्यासह वीजचोरांवर अंकुश ठेवावा म्हणून वायरऐवजी केबल टाकण्यात येणार आहे. बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, निवडणुकीच्या तोंडावर पूर्वीच्या सरकारने दिलेली ७०६ कोटी रुपयांची मासिक सबसिडी बंद केल्याने २० टक्के दरवाढ होईल. ग्राहकांना त्रास होऊ नये, यादृष्टीने विजेची दरवाढ नियंत्रित करण्यासाठी प्रभावी योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. वीज केंद्राजवळच कोळसा ब्लॉक मिळावाबावनकुळे यांनी सांगितले की, कोळसा ब्लॉक वीज केंद्राप.ासून दूर मिळाल्याने वाहतुकीचा खर्च वाढतो. पर्यायी विजेचे दरही वाढतात. अशास्थितीत महाजेनकोने वीज केंद्राजवळच कोळशाचे लिंकेज देण्याची मागणी कोळसा मंत्रालयाकडे केली आहे. कोराडी आणि चंद्रपूर येथील विस्तारित प्रकल्पासाठी जवळपासच्या ४२ ब्लॉकची निवड केली आहे. याशिवाय महाजेनकोला वेकोलि क्षेत्रात स्वत:ची कोल वॉशरीज सुरू करण्यास सांगितले आहे. यामुळे स्वस्त आणि स्वच्छ कोळसा कंपनीला मिळेल. (प्रतिनिधी)