शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

‘चाय पे चर्चा’ फेम गावात शेतक-यांची आत्महत्या

By admin | Updated: February 25, 2015 02:14 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आर्णी तालुक्यातील दाभडी गावात

आर्णी (जि़ यवतमाळ) : लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आर्णी तालुक्यातील दाभडी गावात एका कर्जबाजारी शेतकऱ्याने मंगळवारी गळफास लावून आत्महत्या केली. विठ्ठल सवाई राठोड (४५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा चंद्रपूर लोकसभा आणि भाजपाचे आमदार राजू तोडसाम यांच्या केळापूर-आर्णी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या दाभडी गावात गत ५ वर्षांत १६ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी २० मार्च २०१४ रोजी दाभडी गावाला भेट दिली होती. ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमातून संपूर्ण देशातील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला होता. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून सत्ता मिळाल्यास त्या सोडविल्या जातील, असे आश्वासन या कार्यक्रमात त्यांनी दिले होते. ज्या गावातून त्यांनी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे दु:ख दूर करण्याचे आश्वासन दिले होते, त्याच गावातील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केली. विठ्ठलकडे अडीच एकर शेती असून, त्याच्यावर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ५० हजार रुपयांचे कर्ज होते. नापिकीने हताश झालेल्या विठ्ठलने कर्जाची परतफेड कशी करावी या विवंचनेत विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा आहे. या गावाला केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी ‘आदर्श संसद ग्राम’मध्ये दत्तक घेण्याचे ठरविले होते. मात्र लोकसंख्येचा निकष पूर्ण होत नसल्याने या गावाची निवड होऊ शकली नव्हती. तरीही या गावाचा संपूर्ण विकास करण्याचे अभिवचन गावकऱ्यांना दिले होते. मात्र शेतकरी विठ्ठल राठोडच्या आत्महत्येने दाभडी गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. (प्रतिनिधी)