शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

‘चाय पे चर्चा’ फेम गावात शेतक-यांची आत्महत्या

By admin | Updated: February 25, 2015 02:14 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आर्णी तालुक्यातील दाभडी गावात

आर्णी (जि़ यवतमाळ) : लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आर्णी तालुक्यातील दाभडी गावात एका कर्जबाजारी शेतकऱ्याने मंगळवारी गळफास लावून आत्महत्या केली. विठ्ठल सवाई राठोड (४५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा चंद्रपूर लोकसभा आणि भाजपाचे आमदार राजू तोडसाम यांच्या केळापूर-आर्णी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या दाभडी गावात गत ५ वर्षांत १६ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी २० मार्च २०१४ रोजी दाभडी गावाला भेट दिली होती. ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमातून संपूर्ण देशातील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला होता. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून सत्ता मिळाल्यास त्या सोडविल्या जातील, असे आश्वासन या कार्यक्रमात त्यांनी दिले होते. ज्या गावातून त्यांनी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे दु:ख दूर करण्याचे आश्वासन दिले होते, त्याच गावातील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केली. विठ्ठलकडे अडीच एकर शेती असून, त्याच्यावर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ५० हजार रुपयांचे कर्ज होते. नापिकीने हताश झालेल्या विठ्ठलने कर्जाची परतफेड कशी करावी या विवंचनेत विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा आहे. या गावाला केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी ‘आदर्श संसद ग्राम’मध्ये दत्तक घेण्याचे ठरविले होते. मात्र लोकसंख्येचा निकष पूर्ण होत नसल्याने या गावाची निवड होऊ शकली नव्हती. तरीही या गावाचा संपूर्ण विकास करण्याचे अभिवचन गावकऱ्यांना दिले होते. मात्र शेतकरी विठ्ठल राठोडच्या आत्महत्येने दाभडी गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. (प्रतिनिधी)