शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘चाय पे चर्चा’ फेम गावात शेतक-यांची आत्महत्या

By admin | Updated: February 25, 2015 02:14 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आर्णी तालुक्यातील दाभडी गावात

आर्णी (जि़ यवतमाळ) : लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आर्णी तालुक्यातील दाभडी गावात एका कर्जबाजारी शेतकऱ्याने मंगळवारी गळफास लावून आत्महत्या केली. विठ्ठल सवाई राठोड (४५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा चंद्रपूर लोकसभा आणि भाजपाचे आमदार राजू तोडसाम यांच्या केळापूर-आर्णी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या दाभडी गावात गत ५ वर्षांत १६ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी २० मार्च २०१४ रोजी दाभडी गावाला भेट दिली होती. ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमातून संपूर्ण देशातील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला होता. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून सत्ता मिळाल्यास त्या सोडविल्या जातील, असे आश्वासन या कार्यक्रमात त्यांनी दिले होते. ज्या गावातून त्यांनी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे दु:ख दूर करण्याचे आश्वासन दिले होते, त्याच गावातील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केली. विठ्ठलकडे अडीच एकर शेती असून, त्याच्यावर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ५० हजार रुपयांचे कर्ज होते. नापिकीने हताश झालेल्या विठ्ठलने कर्जाची परतफेड कशी करावी या विवंचनेत विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा आहे. या गावाला केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी ‘आदर्श संसद ग्राम’मध्ये दत्तक घेण्याचे ठरविले होते. मात्र लोकसंख्येचा निकष पूर्ण होत नसल्याने या गावाची निवड होऊ शकली नव्हती. तरीही या गावाचा संपूर्ण विकास करण्याचे अभिवचन गावकऱ्यांना दिले होते. मात्र शेतकरी विठ्ठल राठोडच्या आत्महत्येने दाभडी गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. (प्रतिनिधी)