शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, आणखी किती दौरे करणार? नुकसानभरपाई द्या; शेतकऱ्यांचा टाहो, नेते आले अन् गेले, मदत मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 08:52 IST

विदर्भात जुलै महिन्यातील अतिवृष्टीने पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.

वर्धा :

विदर्भात जुलै महिन्यातील अतिवृष्टीने पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, विरोधी पक्षनेते, केंद्रीय समिती, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे शिष्टमंडळ आदी राज्यकर्त्यांनी पाहणी दौरे केले. दौरे आटोपले; पण अद्याप नुकसानभरपाईचा पत्ता नाही. त्यामुळे आणखी किती दौरे करणार साहेब, मदत द्या, असा संतप्त सवाल हताश शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिकांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. अनेकांच्या शेती  पाण्याखाली आल्याने पिके खरडून गेली. अनेक गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले. अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली. हवालदिल शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी पालकमंत्री सुनील केदार आदी नेते येऊन गेले. मात्र, अद्याप मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांत कमालीचा रोष असून, आता आश्वासन नको, आर्थिक मदत हवी, अशी मागणी शेतकरी करू लागल्याचे चित्र आहे.

पावसाच्या नुकसानीचेही पंचनामेअनेक भागांत कमी पाऊस झाला तरी बांध फुटल्याने शेतीपिकांचे नुकसान झालेले आहे. अनेक भागांत अतिवृष्टी नाही मात्र, सततच्या पावसाने नुकसान झाले आहे. त्या ठिकाणी ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचे निदर्शनात आल्यास तेथेही पंचनामे करा. एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे कृषिमंत्र्यांनी यंत्रणेला बजावले.

टॅग्स :Farmerशेतकरी