शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

साहेब, आणखी किती दौरे करणार? नुकसानभरपाई द्या; शेतकऱ्यांचा टाहो, नेते आले अन् गेले, मदत मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 08:52 IST

विदर्भात जुलै महिन्यातील अतिवृष्टीने पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.

वर्धा :

विदर्भात जुलै महिन्यातील अतिवृष्टीने पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, विरोधी पक्षनेते, केंद्रीय समिती, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे शिष्टमंडळ आदी राज्यकर्त्यांनी पाहणी दौरे केले. दौरे आटोपले; पण अद्याप नुकसानभरपाईचा पत्ता नाही. त्यामुळे आणखी किती दौरे करणार साहेब, मदत द्या, असा संतप्त सवाल हताश शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिकांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. अनेकांच्या शेती  पाण्याखाली आल्याने पिके खरडून गेली. अनेक गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले. अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली. हवालदिल शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी पालकमंत्री सुनील केदार आदी नेते येऊन गेले. मात्र, अद्याप मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांत कमालीचा रोष असून, आता आश्वासन नको, आर्थिक मदत हवी, अशी मागणी शेतकरी करू लागल्याचे चित्र आहे.

पावसाच्या नुकसानीचेही पंचनामेअनेक भागांत कमी पाऊस झाला तरी बांध फुटल्याने शेतीपिकांचे नुकसान झालेले आहे. अनेक भागांत अतिवृष्टी नाही मात्र, सततच्या पावसाने नुकसान झाले आहे. त्या ठिकाणी ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचे निदर्शनात आल्यास तेथेही पंचनामे करा. एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे कृषिमंत्र्यांनी यंत्रणेला बजावले.

टॅग्स :Farmerशेतकरी