शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

शेतकऱ्यांनी सुधारित सातबारा उपक्रमात सहभागी व्हावे - बाळासाहेब थोरात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 18:16 IST

Balasaheb Thorat : शासनाच्या महसूल विभागाकडून संपूर्ण राज्यभरात सुधारित सातबारा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पुरंदर तालुक्यातील खळद येथे पाच शेतकऱ्यांना सुधारित सातबाराचे वाटप करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

जेजुरी : राज्यातील शेतकरी बांधवांनी शासनाच्या ई पीक पाहणीसह सुधारित सातबारा उपक्रमात सहभागी होऊन आपले शेतीबाबतचे रेकॉर्ड अधिकृत करून घ्यावे, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 

शासनाच्या महसूल विभागाकडून संपूर्ण राज्यभरात सुधारित सातबारा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पुरंदर तालुक्यातील खळद येथे पाच शेतकऱ्यांना सुधारित सातबाराचे वाटप करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पुरंदर तालुक्यातील पानंद रस्ते चळवळीची सुरवात ही खळद ते चिंचोळे मळा या पानंद रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करून सुरवात झाली. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम होते. पुरंदर हवेलीचे आ. संजय जगताप, पुणे विभागीय आयुक्त सौरव राव,  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी विकास देशमुख, पाणी पंचायतच्या कल्पनाताई साळुंखे माजी आ. अशोक टेकवडे आदीसह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.  

यावेळी बोलताना महसूलमंत्री थोरात यांनी महसूल विभागाकडून राज्यभरातील शेत जमिनीचे सातबारा आधुनिक पद्धतीने बनवण्यात आले आहेत. सात बारा वरील सर्व नोंदी जशाच्या तशा ठेवून अनावश्यक नोंदी, चुकीच्या नोंदी काढून टाकण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर मोबाईल अप वरून आपल्याला आपल्या शेतातील पीक पहाणीची नोंदणी ही करता येते. स्वतःच स्वतः च्या शेतातील पिकांची नोंदणी करू शकतो .शेतील झालेले बदल ही नोंदवता येतात आणि आपला सातबारा आपल्याला केव्हाही काढता ही येतो. 

पीक रचना, पीक नुकसान शेतीचे झालेले नुकसान स्वतः शेतकरी शेतात उभे राहून नोंदवू शकतो, त्यामुळे पीक विमा, महसूल विभागाला आपल्या शेतीची बिनचूक माहिती मिळू शकेल. शासनाला ही एका क्लीक वर संपूर्ण राज्यातील शेतीपिकांची माहिती उपलब्ध होईल इतका अद्ययावत असा सातबारा असणार आहे. राज्यातील शेतकरी आता आधुनिक शेतकरी बनला आहे.त्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

हा उपक्रम सध्या महाराष्ट्रातील शासन राबवत आहे. हा उपक्रम भविष्यात देशातील सर्वच राज्य सरकारे किंवा केंद्र शासन ही राबवेल अशी खात्री ही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच,  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म. गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधत आजपासून इ पीक पाहणी नोंदणीसह आधुनिक सातबारा वाटपाचा शुभारंभ करून शेतकरी बांधवांना मोठा दिलासा दिला आहे .  पुरंदरच्या ऐतिहासिक भूमीतुन हा उपक्रम राज्यभरात सुरू होतोय. याचा मोठा फायदा कृषी विभागाला नक्कीच होणार आहे. अशा शब्दात कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी महसूलमंत्र्यांचे आभार मानले. 

पुरंदर तालुक्यातएकूण ९३ ग्रामपंचायतीकडून तालुक्यात ५०० पेक्षा जास्त पानंद रस्त्यांची तहसीलदारांकडे मागणी आहे. सुमारे ४३० किमी लांबीच्या या सर्व पानंद रस्त्यासाठी शासनाकडून पाच कोटींचा निधी ही उपलब्ध होत आहे.आजच्या कार्यक्रमातून पुरंदर मधील खळद ते चिंचोळे मळा या  पानंद रस्त्याच्या कामाला ही सुरुवात झाली असून ही पानंद रस्त्याची चळवळ यशस्वी करू. त्याचबरोबर महसूल विभागाच्या सुधारीत सात बारा उपक्रमात तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग असून ३५ हजारपेक्षा जास्त सुधारित सातबारा तयार झालेले आहेत. पुरंदरचा महसूल विभाग अत्यंत प्रामाणिकपणे आणि तेवढ्याच वेगाने या उपक्रमात शेतकऱ्यांना सहभागी करून घेत असल्याचे आ.संजय जगताप यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पुणे विभागीय आयुक्त सौरव राव, पाणी पंचायतीच्या कल्पनाताई साळुंके, आदींची भाषणे झाली. तालुक्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले. आभार प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी मानले तर आयोजन पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातFarmerशेतकरी