शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

शेतकऱ्यांनी सुधारित सातबारा उपक्रमात सहभागी व्हावे - बाळासाहेब थोरात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 18:16 IST

Balasaheb Thorat : शासनाच्या महसूल विभागाकडून संपूर्ण राज्यभरात सुधारित सातबारा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पुरंदर तालुक्यातील खळद येथे पाच शेतकऱ्यांना सुधारित सातबाराचे वाटप करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

जेजुरी : राज्यातील शेतकरी बांधवांनी शासनाच्या ई पीक पाहणीसह सुधारित सातबारा उपक्रमात सहभागी होऊन आपले शेतीबाबतचे रेकॉर्ड अधिकृत करून घ्यावे, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 

शासनाच्या महसूल विभागाकडून संपूर्ण राज्यभरात सुधारित सातबारा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पुरंदर तालुक्यातील खळद येथे पाच शेतकऱ्यांना सुधारित सातबाराचे वाटप करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पुरंदर तालुक्यातील पानंद रस्ते चळवळीची सुरवात ही खळद ते चिंचोळे मळा या पानंद रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करून सुरवात झाली. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम होते. पुरंदर हवेलीचे आ. संजय जगताप, पुणे विभागीय आयुक्त सौरव राव,  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी विकास देशमुख, पाणी पंचायतच्या कल्पनाताई साळुंखे माजी आ. अशोक टेकवडे आदीसह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.  

यावेळी बोलताना महसूलमंत्री थोरात यांनी महसूल विभागाकडून राज्यभरातील शेत जमिनीचे सातबारा आधुनिक पद्धतीने बनवण्यात आले आहेत. सात बारा वरील सर्व नोंदी जशाच्या तशा ठेवून अनावश्यक नोंदी, चुकीच्या नोंदी काढून टाकण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर मोबाईल अप वरून आपल्याला आपल्या शेतातील पीक पहाणीची नोंदणी ही करता येते. स्वतःच स्वतः च्या शेतातील पिकांची नोंदणी करू शकतो .शेतील झालेले बदल ही नोंदवता येतात आणि आपला सातबारा आपल्याला केव्हाही काढता ही येतो. 

पीक रचना, पीक नुकसान शेतीचे झालेले नुकसान स्वतः शेतकरी शेतात उभे राहून नोंदवू शकतो, त्यामुळे पीक विमा, महसूल विभागाला आपल्या शेतीची बिनचूक माहिती मिळू शकेल. शासनाला ही एका क्लीक वर संपूर्ण राज्यातील शेतीपिकांची माहिती उपलब्ध होईल इतका अद्ययावत असा सातबारा असणार आहे. राज्यातील शेतकरी आता आधुनिक शेतकरी बनला आहे.त्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

हा उपक्रम सध्या महाराष्ट्रातील शासन राबवत आहे. हा उपक्रम भविष्यात देशातील सर्वच राज्य सरकारे किंवा केंद्र शासन ही राबवेल अशी खात्री ही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच,  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म. गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधत आजपासून इ पीक पाहणी नोंदणीसह आधुनिक सातबारा वाटपाचा शुभारंभ करून शेतकरी बांधवांना मोठा दिलासा दिला आहे .  पुरंदरच्या ऐतिहासिक भूमीतुन हा उपक्रम राज्यभरात सुरू होतोय. याचा मोठा फायदा कृषी विभागाला नक्कीच होणार आहे. अशा शब्दात कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी महसूलमंत्र्यांचे आभार मानले. 

पुरंदर तालुक्यातएकूण ९३ ग्रामपंचायतीकडून तालुक्यात ५०० पेक्षा जास्त पानंद रस्त्यांची तहसीलदारांकडे मागणी आहे. सुमारे ४३० किमी लांबीच्या या सर्व पानंद रस्त्यासाठी शासनाकडून पाच कोटींचा निधी ही उपलब्ध होत आहे.आजच्या कार्यक्रमातून पुरंदर मधील खळद ते चिंचोळे मळा या  पानंद रस्त्याच्या कामाला ही सुरुवात झाली असून ही पानंद रस्त्याची चळवळ यशस्वी करू. त्याचबरोबर महसूल विभागाच्या सुधारीत सात बारा उपक्रमात तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग असून ३५ हजारपेक्षा जास्त सुधारित सातबारा तयार झालेले आहेत. पुरंदरचा महसूल विभाग अत्यंत प्रामाणिकपणे आणि तेवढ्याच वेगाने या उपक्रमात शेतकऱ्यांना सहभागी करून घेत असल्याचे आ.संजय जगताप यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पुणे विभागीय आयुक्त सौरव राव, पाणी पंचायतीच्या कल्पनाताई साळुंके, आदींची भाषणे झाली. तालुक्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले. आभार प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी मानले तर आयोजन पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातFarmerशेतकरी