शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

बाजार समित्यांमध्ये पुन्हा शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क?, कायद्यात सुधारणा करणार असल्याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 10:45 IST

ज्याच्या नावे सातबारा तो मतदानास पात्र

राज्यातील ३०६ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये लाखो सामान्य शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार लवकरच मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भात नवे सरकार कायद्यामध्ये लवकरच सुधारणा करणार असल्याची माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली.

पणन कायदा १९६३ मध्ये राज्यात अस्तित्वात आला तेव्हापासून संबंधित बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ग्राम पंचायतींचे सदस्य आणि सेवा सहकारी सोसायट्यांचे सदस्य हे मतदार होते. तथापि, देवेंद्र फडणवीस सरकारने २०१७ मध्ये पणन कायद्यात मोठा बदल केला. बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतीचा सातबारा ज्यांच्या नावाने आहे अशा सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. त्यानुसार काही बाजार समित्यांमध्ये निवडणुकादेखील झाल्या होत्या.

राज्यातील ५० टक्के बाजार समित्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यातील २५ टक्के समित्या तर अशा आहेत, की त्या स्वत:च्या कर्मचाऱ्यांचे पगार नियमितपणे करू शकत नाहीत. नियमानुसार बाजार समित्यांना निवडणुकीचा खर्च हा स्वत:च्या निधीतून करावा लागतो. त्यामुळे फडणवीस सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना गरीब बाजार समित्यांना अनंत अडचणी आल्या होत्या.

तथापि, महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय बदलला आणि ग्रामपंचायतींचे सदस्य व सेवा सहकारी सोसायट्यांचे सदस्य यांना मतदानाचा अधिकार पूर्ववत केला.  आता एकनाथ शिंदे-भाजप युतीचे सरकार हे लाखो शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देणारी पद्धत पुन्हा आणणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी