शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

शेतकरी आत्महत्येत मराठा समाजातील शेतकरी जास्त, दोन वर्षात 26 टक्के मराठा शेतक-यांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 11:33 IST

एकीकडे राज्यभरात आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्च काढल्याने मराठा समाज चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान शेतकरी आत्महत्येची आकडेवारी समोर आली असून, यानिमित्ताने पुन्हा एकदा मराठा समाज चर्चेला आला आहे.

मुंबई, दि. 29 - एकीकडे राज्यभरात आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्च काढल्याने मराठा समाज चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान शेतकरी आत्महत्येची आकडेवारी समोर आली असून, यानिमित्ताने पुन्हा एकदा मराठा समाज चर्चेला आला आहे. कारण गेल्या दोन वर्षात झालेल्या शेतकरी आत्महत्यांपैकी 26 टक्के शेतकरी मराठा होते अशी माहिती समोर आली आहे. एप्रिल 2014 ते मार्च 2016 दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात एकूण 3880 शेतक-यांनी आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करणा-या शेतक-यांमधील 26 टक्के शेतकरी मराठा समाजाचे होते. एकट्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यात 53 टक्के मराठा समाजातील शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.   

पुण्यामधील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅण्ड इकॉनॉमिक्स यांनी केलेल्या रिसर्च स्टडीमधून ही माहिती समोर आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण 13 जिल्ह्यांमध्ये जाऊन माहिती गोळा करण्यात आली आहे. त्याच्याआधारे ही आकडेवारी समोर आली आहे. स्वयंसेवकांनी आत्महत्याग्रस्त तीन हजार शेतकरी कुटुंबांना भेट दिली. त्यांच्याकडून माहिती गोळा करण्यात आली, आणि त्यानंतरच ही माहिती दिली गेली. 

दोन जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात मराठा समाज शेतकरी आत्महत्यांमध्ये पहिल्या स्थानावर असल्याचं निदर्शनास आलं आहे. यानंतर अनुक्रमे कुणबी (16 टक्के), दलित (10 टक्के) आणि बंजारा (9 टक्के) समाजातील शेतकरी असल्याची माहिती सरकारी अधिका-याने दिली आहे. आत्महत्या करणा-या शेतक-यांपैकी फक्त पाच टक्के शेतक-यांकडे कोणतीच जमीन नव्हती असं सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. 

आत्महत्याग्रस्त कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर एक गोष्ट प्रामुख्याने त्यांनी सांगितली ती म्हणजे, घरातील कमावत्या माणसाने आत्महत्या केल्यानंतर त्यांनी शेतीचं काम थांबवलं आहे. त्यामुळे घरात कोणतीही कमाई येत नाही आहे. मराठवाड्यामध्ये अशा कुटुंबांची संख्या जास्त आहे असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. 

मराठवाड्यात जी समस्या मराठा समाजातील शेतक-यांना सतावत आहे, त्याच समस्यांना विदर्भात कुणबी समाज सामोरे जात आहे. आत्महत्या करणा-यांपैकी 30 टक्के शेतकरी कुणबी समाजाचे असून फक्त दोन टक्के मराठा होते.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाFarmerशेतकरीSuicideआत्महत्या