शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

शेतकरी आत्महत्येत मराठा समाजातील शेतकरी जास्त, दोन वर्षात 26 टक्के मराठा शेतक-यांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 11:33 IST

एकीकडे राज्यभरात आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्च काढल्याने मराठा समाज चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान शेतकरी आत्महत्येची आकडेवारी समोर आली असून, यानिमित्ताने पुन्हा एकदा मराठा समाज चर्चेला आला आहे.

मुंबई, दि. 29 - एकीकडे राज्यभरात आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्च काढल्याने मराठा समाज चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान शेतकरी आत्महत्येची आकडेवारी समोर आली असून, यानिमित्ताने पुन्हा एकदा मराठा समाज चर्चेला आला आहे. कारण गेल्या दोन वर्षात झालेल्या शेतकरी आत्महत्यांपैकी 26 टक्के शेतकरी मराठा होते अशी माहिती समोर आली आहे. एप्रिल 2014 ते मार्च 2016 दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात एकूण 3880 शेतक-यांनी आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करणा-या शेतक-यांमधील 26 टक्के शेतकरी मराठा समाजाचे होते. एकट्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यात 53 टक्के मराठा समाजातील शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.   

पुण्यामधील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅण्ड इकॉनॉमिक्स यांनी केलेल्या रिसर्च स्टडीमधून ही माहिती समोर आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण 13 जिल्ह्यांमध्ये जाऊन माहिती गोळा करण्यात आली आहे. त्याच्याआधारे ही आकडेवारी समोर आली आहे. स्वयंसेवकांनी आत्महत्याग्रस्त तीन हजार शेतकरी कुटुंबांना भेट दिली. त्यांच्याकडून माहिती गोळा करण्यात आली, आणि त्यानंतरच ही माहिती दिली गेली. 

दोन जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात मराठा समाज शेतकरी आत्महत्यांमध्ये पहिल्या स्थानावर असल्याचं निदर्शनास आलं आहे. यानंतर अनुक्रमे कुणबी (16 टक्के), दलित (10 टक्के) आणि बंजारा (9 टक्के) समाजातील शेतकरी असल्याची माहिती सरकारी अधिका-याने दिली आहे. आत्महत्या करणा-या शेतक-यांपैकी फक्त पाच टक्के शेतक-यांकडे कोणतीच जमीन नव्हती असं सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. 

आत्महत्याग्रस्त कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर एक गोष्ट प्रामुख्याने त्यांनी सांगितली ती म्हणजे, घरातील कमावत्या माणसाने आत्महत्या केल्यानंतर त्यांनी शेतीचं काम थांबवलं आहे. त्यामुळे घरात कोणतीही कमाई येत नाही आहे. मराठवाड्यामध्ये अशा कुटुंबांची संख्या जास्त आहे असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. 

मराठवाड्यात जी समस्या मराठा समाजातील शेतक-यांना सतावत आहे, त्याच समस्यांना विदर्भात कुणबी समाज सामोरे जात आहे. आत्महत्या करणा-यांपैकी 30 टक्के शेतकरी कुणबी समाजाचे असून फक्त दोन टक्के मराठा होते.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाFarmerशेतकरीSuicideआत्महत्या