शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

शेतकऱ्यांनो जोडधंदा पहा! आजोबांनी शंभर वर्षांपूर्वी लावलेले झाड आज पण देते लाखोंचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 12:40 IST

Farmers Extra Income: नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील शेतकरी गजानन चव्हाण यांच्या आजोबांनी शेताच्या बांधावर एक फणसाचे रोपटे लावले होते.

शेतकऱ्यांना आज शेती करणे परडत नाहीय. अवकाळी, गारपीट, दुष्काळ आदीमुळे शेतीची नासाडी होत आहे. उत्पन्न येत नाहीय. यामुळे आत्महत्या वाढल्या आहेत. तसेच नवीन पिढी शेती सोडून शहरात १०-१५ हजाराच्या नोकरीला जाऊ लागली आहे. परंतू नांदेडच्या शेतकऱ्याने आपल्या शेतकरी बांधवांना एक आशेचा किरण दाखविला आहे. 

नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील शेतकरी गजानन चव्हाण यांच्या आजोबांनी शेताच्या बांधावर एक फणसाचे रोपटे लावले होते. याला आता जवळपास सव्वाशे वर्षे होत आली. तीन वर्षांनी या रोपाला फणस लगडू लागले होते. एवढे वय असूनही या झाडाला आजही २०० ते ३०० फणस लागत आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे. आज वड-पिंपळ सोडले तर एवढे जुने वृक्ष सापडत नाहीत. परंतू, हे फणस विकून शेतकरी लाखोंचे उत्पन्न घेऊ शकतात, असा दावा गजानन चव्हाण यांनी केला आहे. 

फणसाला बाजारात मोठी मागणी असते. कच्चा असताना भाजी आणि पिकला की गरे खायला मिळतात. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी असल्या फणसाच्या झाडाचे रोप आणून त्याची लागवड करावी. किलोला बाजारात दीडशे ते दोनशे रुपयांचा दर आहे. अशाप्रकारे हे शेतकरी दोन ते तीन लाख रुपये कमवू शकतात, असे चव्हाण म्हणाले. या झाडाचा जोडधंदा म्हणून उपयोग होईल, असे ते म्हणाले. 

नांदेड जिल्ह्यामध्ये क्वचित ठिकाणी या फणसाची झाडे आढळतात. नांदेडच्या बाजारामध्ये देखील या फळाला खूप मोठी मागणी आहे. हेच फणस बाजारामध्ये विकली तर दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न देखील शेतकऱ्यांना मिळते. पण चव्हाण परिवार हे फळ विकत नसून आजूबाजूतील परिसरातील शेतकरी हे फळ खाण्यासाठी घेऊन जातात व चव्हाण परिवाराला त्यामध्ये आनंद वाटतो. यामागे कारण की, आमच्या शेतामध्ये असलेले हे आजोबांनी लावलेले झाड आज पण जिवंत आहे व या झाडातून आजूबाजूतील शेतकऱ्यांना फळाच्या माध्यमातून आनंद मिळतो. त्यात आम्हाला समाधान आहे, असे शेतकरी गजानन चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी