शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

शेतकऱ्यांनो जोडधंदा पहा! आजोबांनी शंभर वर्षांपूर्वी लावलेले झाड आज पण देते लाखोंचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 12:40 IST

Farmers Extra Income: नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील शेतकरी गजानन चव्हाण यांच्या आजोबांनी शेताच्या बांधावर एक फणसाचे रोपटे लावले होते.

शेतकऱ्यांना आज शेती करणे परडत नाहीय. अवकाळी, गारपीट, दुष्काळ आदीमुळे शेतीची नासाडी होत आहे. उत्पन्न येत नाहीय. यामुळे आत्महत्या वाढल्या आहेत. तसेच नवीन पिढी शेती सोडून शहरात १०-१५ हजाराच्या नोकरीला जाऊ लागली आहे. परंतू नांदेडच्या शेतकऱ्याने आपल्या शेतकरी बांधवांना एक आशेचा किरण दाखविला आहे. 

नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील शेतकरी गजानन चव्हाण यांच्या आजोबांनी शेताच्या बांधावर एक फणसाचे रोपटे लावले होते. याला आता जवळपास सव्वाशे वर्षे होत आली. तीन वर्षांनी या रोपाला फणस लगडू लागले होते. एवढे वय असूनही या झाडाला आजही २०० ते ३०० फणस लागत आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे. आज वड-पिंपळ सोडले तर एवढे जुने वृक्ष सापडत नाहीत. परंतू, हे फणस विकून शेतकरी लाखोंचे उत्पन्न घेऊ शकतात, असा दावा गजानन चव्हाण यांनी केला आहे. 

फणसाला बाजारात मोठी मागणी असते. कच्चा असताना भाजी आणि पिकला की गरे खायला मिळतात. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी असल्या फणसाच्या झाडाचे रोप आणून त्याची लागवड करावी. किलोला बाजारात दीडशे ते दोनशे रुपयांचा दर आहे. अशाप्रकारे हे शेतकरी दोन ते तीन लाख रुपये कमवू शकतात, असे चव्हाण म्हणाले. या झाडाचा जोडधंदा म्हणून उपयोग होईल, असे ते म्हणाले. 

नांदेड जिल्ह्यामध्ये क्वचित ठिकाणी या फणसाची झाडे आढळतात. नांदेडच्या बाजारामध्ये देखील या फळाला खूप मोठी मागणी आहे. हेच फणस बाजारामध्ये विकली तर दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न देखील शेतकऱ्यांना मिळते. पण चव्हाण परिवार हे फळ विकत नसून आजूबाजूतील परिसरातील शेतकरी हे फळ खाण्यासाठी घेऊन जातात व चव्हाण परिवाराला त्यामध्ये आनंद वाटतो. यामागे कारण की, आमच्या शेतामध्ये असलेले हे आजोबांनी लावलेले झाड आज पण जिवंत आहे व या झाडातून आजूबाजूतील शेतकऱ्यांना फळाच्या माध्यमातून आनंद मिळतो. त्यात आम्हाला समाधान आहे, असे शेतकरी गजानन चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी