शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जालन्यात भाव मिळण्याच्या आशेने शेतकऱ्यांचा कापूस घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:38 IST

बाजारगप्पा : सीसीआयकडून जालन्यातील बाजार समितीत कापूस खरेदी सुरू केली, मात्र अद्यापही पाहिजे तशी आवक या केंद्रावर नसल्याचे सांगण्यात आले. 

- संजय देशमुख (जालना)

कमी पावसामुळे यंदा कपाशीचे उत्पन्न ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. असे असले तरी अद्यापही शेतकऱ्यांनी त्यांच्या घरातील कापूस अर्थात पांढरे सोने गंजी घालून ठेवले असून, त्याला आगामी काळात सहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना लागून आहे. सीसीआयकडून जालन्यातील बाजार समितीत कापूस खरेदी सुरू केली, मात्र अद्यापही पाहिजे तशी आवक या केंद्रावर नसल्याचे सांगण्यात आले. 

नवीन तूर बाजारात दाखल होत असून, दररोज एक हजार पोती येत असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत क्विंटलमागे तुरीमध्ये २०० रुपये कमी झाले आहेत. बाजारपेठेत दुष्काळाची छाया गडदपणे दिसत आहे. तुरळक व्यवहार सोडल्यास ग्राहकी नसल्याचे वास्तव आहे. अशाही स्थितीत मोसंबी तग धरून आहे. रेशीम कोषाच्या आवकेने बाजारात थोडीबहुत चहलपहल दिसत आहे. बाजारपेठेत सध्या भुसार मालाची आवक बऱ्यापैकी आहे. त्यात गहू १०० पोती असून, भाव २००० ते ३००० हजार रुपये, ज्वारीची आवक ५०० पोती असून, दोन जार ७०० ते ३ हजार ४००, बाजरी १०० पोती आवक असून, १६०० ते २३००, मक्याची आवक कायम असून, दररोज बाजारपेठेत ५००० पोत्यांची आवक असून, १४५० ते १५५० प्रतिक्विंटल मिळत आहे. मक्याचा उपयोग कोंबडी खाद्यासाठी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने भाव बऱ्यापैकी मिळत आहेत. स्टार्च उद्योगातही मक्याला मोठी मागणी कायम आहे.

हरभऱ्याची आवक दररोज शंभर पोती असून, ४००० ते ४७०० रुपये आहे. सोयाबीनची आवक आजही कायम असून, एक हजार पोत्यांची आवक असून, भाव स्थिर आहेत. सध्या ३ हजार २०० ते ३२५० रुपये क्विंटल भाव मिळत आहे. साखरेचा चालू महिन्याचा कोटा केंद्र सरकारने लक्षणीयरीत्या कमी करूनही साखरेचे दर जैसे थे आहेत. ३१५० ते ३२५० क्विंटलला साखर विक्री होत आहे. दरम्यान, काही साखर कारखाने आपल्याकडील साखर विक्रीसाठी डॅमेज शुगरच्या नावाखाली कमी भावाने विक्रीसाठी थेट बाजारात आणत आहेत. मिळेल तेवढा पैसा लवकरात लवकर मोकळा करण्याच्या हेतूने हे कारखाने ५० रुपयांनी कमी विक्री करीत आहेत.

कापूस खरेदीस जालन्यातील बाजार समितीत ३ नोव्हेंबरला सभापती तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते सीसीआायच्या खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला. गेल्या आठ दिवसांत या केंद्रावर केवळ ७८० क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. सरकारने पाच हजार ४५० रुपये हा हमीभाव जाहीर केल्याने दर याखाली येणार नाहीत; परंतु  मागणी आणि पुरवठा लक्षात घेऊन कापसाचे दर सहा हजार रुपयांवर जातील या आशेने शेतकरी अद्याप पूर्ण क्षमतेने कापूस बाजारपेठेत आणत नसल्याचे वास्तव असल्याची माहिती कॉटन फेडरेशन, तसेच टेक्सटाईल एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल फॉर कॉटनचे संचालक संजय राठी यांनी सांगितले. कपाशीचे उत्पादन यंदा ३० टक्के कमी झाले आहे, हे नाकारून चालणार नाही; परंतु अद्यापही शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी