शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्राललयाने दिली महत्त्वाची सूचना
5
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
6
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
7
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
8
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
9
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
10
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
11
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
12
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
13
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
14
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
15
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
16
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
17
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
18
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
19
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
20
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र

डीपीसाठी शेतकऱ्यांनी अभियंत्यालाच पळविले, हिंगोलीतील घटना, नुकसान भरपाई मिळेपर्यंत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 2:32 AM

पाच महिन्यांपासून जळालेले विद्युत रोहीत्र (डीपी) मिळत नसल्याने वसमत तालुक्यातील म्हातारगाव येथील संतप्त शेतक-यांनी हिंगोलीच्या अभियंत्यालाच उचलून शेतात आणले. डीपी आणि नुकसान भरपाई मिळेपर्यंत अभियंत्याला सोडणार नसल्याचा पवित्रा गावक-यांनी घेतला आहे.

- चंद्रकांत देवणेवसमत (जि. हिंगोली) : पाच महिन्यांपासून जळालेले विद्युत रोहीत्र (डीपी) मिळत नसल्याने वसमत तालुक्यातील म्हातारगाव येथील संतप्त शेतक-यांनी हिंगोलीच्या अभियंत्यालाच उचलून शेतात आणले. डीपी आणि नुकसान भरपाई मिळेपर्यंत अभियंत्याला सोडणार नसल्याचा पवित्रा गावक-यांनी घेतला आहे.१९ शेतकºयांचे या डीपीवर कृषीपंप चालतात. बागायती पिकांसह हळदीसाठी हा भाग प्रसिद्ध आहे. नव्या डीपीसाठी शेतकºयांनी प्रत्येकी पाच हजार पाचशे रुपये तसेच वीजबिलही भरले. एक डीपी मिळाला. मात्र तो जळालेलाच होता. पुन्हा दुसºया डीपीसाठी हिंगोली येथे चकरा सुरू झाल्या. विजेविना पाच महिन्यांपासून पिकांना पाणी देता आलेले नाही. त्यामुळे पिके वाळून गेली. हळदीच्या पिकाचे नुकसान झाले. साहजिकच शेतकरी संतापले.शुक्रवारी म्हातारगावसाठी १00 ऐवजी ६५ एमव्हीएचा डीपी दिल्याने संतापात भर पडली. १00 ची गेटपास असताना हा डीपी का दिला, असा सवाल करण्यासाठी शेतकरी हिंगोलीला गेले. मात्र तेथे महावितरणचे अधिकारी बोलायलाही तयार नव्हते. संतापलेल्या शेतकºयांनी अभियंता एस. डी. बेलसरे यांना चौकशी करण्याच्या बहाण्याने हिंगोली एमआयडीसीमध्ये आणले. त्यानंतर गाडी हिंगोलीकडे नेण्याऐवजी थेट वसमतकडे नेली.आमच्या शेतात चला, आमचे झालेले नुकसान पहा अन् मगच तुम्हाला सोडतो, असे सांगून ते म्हातारगावात गेले.नुकसान भरपाई व डीपी मिळेपर्यंत अभियंता म्हातारगावलाच सुखरूप राहतील. त्यांना कुठलीही इजा होणार नाही. त्यांची योग्य ती काळजीही घेतली जाईल. शासन-प्रशासनाला आव्हान देण्याचा हेतू नसल्याचे बाजार समिती संचालक तुषार जाधव यांनी सांगितले.शेतकºयांनी येथे बळजबरीने आणले, मात्र मी सुखरूप आहे. - एस. डी. बेलसरे, अभियंताहिंगोलीचे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी म्हातारगाव येथे संपर्क साधून शहानिशा केली. वीज वितरणच्या इतर अधिकाºयांना तातडीने म्हातारगावला पाठवले.

टॅग्स :Farmerशेतकरी