शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

शेतक-यांना कर्जमाफी नाही - फडणवीस

By admin | Published: July 12, 2015 7:23 PM

शेतक-यांना पूर्ण कर्जमाफी देणे हा कायमस्वरुपी तोडगा नसून शेतकरी सक्षम कसा होईल यावर भर देणे गरजेचे आहे असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १२ - शेतक-यांना पूर्ण कर्जमाफी देणे हा कायमस्वरुपी तोडगा नसून शेतकरी सक्षम कसा होईल यावर भर देणे गरजेचे आहे असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे. २००८ मध्ये आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कर्जमाफीत शेतक-यांचा काहीच फायदा झाला नाही, याऊलट बँकांना फायदा झाला असा दावाही त्यांनी केला आहे.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. शेतक-यांना कर्जमाफी देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. या मागणीवर फडणवीस म्हणाले, कर्जमाफी देणे हा पर्याय असला तरी त्यातून शेतक-यांचा फायदा नाही, आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कर्जमाफीत काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या बँकांचा नफा झाला व बँकांमधील घोटाळे झाकले गेले. अगोदरच्या कर्जमाफीत बँकेना दिलेल्या निधीपैकी २५ टक्के रक्कम शेतीत गुंतवली असती तर शेतक-यांना फायदा झाला असता. शेतक-यांना विविध साहित्यखरेदीसाठी अनुदान, कृषी पंप देणे अशा योजनांवर पैसे खर्च केले असते तर राज्यातील शेतक-यांची क्रयशक्ती वाढली असती असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आमचे सरकार शेतक-यांना सक्षम करण्यावर भर देईल अशी ग्वाही त्यांनी दिली. शेतक-यांच्या कर्जफेडीची पुनर्रचना केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. 
राज्यात ९० लाख हेक्टर जागेवर पेरणी झाली असून पावसात खंड पडल्याने सुमारे २३ लाख हेक्टरवरील पेरणी अडचणीत आली आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, पश्चिम विदर्भ व मराठवाडा वगळता राज्याच्या अन्य भागात आठवडा भरात पाऊस पडेल अशी आशाही त्यांनी वर्तवली. राज्यात ज्या ठिकाणी पाऊस नसेल तिथे १ ऑगस्टपासून कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. सरकारमधील मंत्र्यांवर झालेल्या भ्रष्टाचा-याच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्ही आमची बाजू मांडली आहे, आम्ही भ्रष्टाचार केलेला नाही, मात्र तरीदेखील आम्ही सर्व प्रकारच्या चौकशींसाठी तयारी आहोत. सत्ताधारी बाकांवरील मित्रपक्षांमध्ये कुरबुर सुरु आहे. मात्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावले. शिवसेना व भाजपात कोणतेही मतभेद नाही, हम साथ साथ है अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.