शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

बळीराजाची अर्धवट कर्जमाफी ठरणार 'महाजनादेश'ला अडथळा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 12:52 IST

सध्या शेतकरी कर्जमाफीवर काहीही बोलले जात नाही. दुसरीकडे शिवसेना शेतकरी कर्जमाफीच्या मुद्दावर भाजपला धारेवर धरण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेनेने शेतकऱ्यांसाठींच्या कळीच्या मुद्दाला हात घातला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

मुंबई - मागील काही वर्षातील दुष्काळी स्थिती, कधी गारपीट तर कधी पूर अशा संकटातून मार्ग काढणारा शेतकरी कर्जबाजारीपणामुळे हैराण झाला आहे. त्यातच आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तरी सरकार सरसकट कर्जमाफी करेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षांनी पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याची तयारी जोरात सुरू केली आहे. या दोन्ही बाबी एकमेकांना समांतर असल्या तरी बळीराजाची नाराजी परवडणारी नसून सत्ताधाऱ्यांना महाजनादेश मिळविण्यात अडथळ निर्माण करू शकते.

राज्यातील शेतकऱ्यांना ३५ हजार कोटींची कर्जमाफी केल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यासाठी शेतकऱ्यांकडून कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्जही भरून घेतले होते. लाखो शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठीच्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेत भाग घेतला होता. परंतु, गावोगावच्या बोटावर मोजण्याइतपतच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. कर्जमाफी देताना लागू केलेल्या अटी आणि शर्ती यामुळे शेतकरी अक्षरश: पिंजून निघाला. किमान आता तरी शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखांपर्यंत कर्जमाफी मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

निवडणुकीच्या काळात कर्जमाफी मिळेल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी आपली कर्जे तशीच ठेवली आहेत. एवढच काय तर अनेक शेतकऱ्यांनी कर्जाचे व्याजही भरल नाही. दीड लाखांवरील रक्कम न भरल्याने शेतकऱ्यांच्या कर्जाचे साडेतीन हजारहून कोटीहून अधिक व्याज वाढले आहे. २०१७ मध्ये सरकराने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. यातून अनेक शेतकरी गाळले गेले. या शेतकऱ्यांना आता सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची आस आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत देखील अनेक ठिकाणी सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एकदा सत्ता मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये यात्रा, विविध घोषणा करण्यात येत आहेत. परंतु, शेतकरी कर्जमाफीवर काहीही बोलले जात नाही. दुसरीकडे शिवसेना शेतकरी कर्जमाफीच्या मुद्दावर भाजपला धारेवर धरण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेनेने शेतकऱ्यांसाठींच्या कळीच्या मुद्दाला हात घातला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. किंबहुना सत्ताधारी पक्षासाठी राज्यात अर्धवट केलेली कर्जमाफी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.