शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

सरसकट कर्जमाफी कधी मिळणार, बांधावर गेलेल्या शिवसेना नेत्यांना शेतकऱ्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 11:13 IST

आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेतून सरसकट कर्जमाफीवरून शिवसेनेने रान उठवले होते.

मुंबई : सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्यासाठी शिवसेनेला निवडून द्या असे विधान युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या भाषणातून अनेकदा केला होता. त्यामुळे राज्यात ५६ आमदार निवडून देणारे मतदार आता शिवसेनेला सरसकट कर्जमाफीवरून जाब विचारत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेला निवडून दिल्यानंतरही कर्जमाफी का नाही ? असा सवाल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना शेतकऱ्यांनी केला. रावते हे शनिवारी पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.

विधानसभा निवडणुकीपूर्वी काढलेल्या युवसेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेतून सरसकट कर्जमाफीवरून शिवसेनेने रान उठवले होते. आदित्य यांनी आपल्या अनेक सभेतून राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली होती. त्यांनतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत सुद्धा वेळोवेळी शिवसेनेकडून सरसकट कर्जमाफीचा मुद्दा समोर करण्यात आला होता. तर घोटी येथे झालेल्या जाहीर सभेत जनतेसमोर शिवसेनेची भुमिका मांडताना आदित्य ठाकरे म्हणाले होते की, शिवसेनेला निवडून दिल्यास सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करू.

त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची आठवण शेतकरी शिवसेनेला करून देत असल्याचे पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री आणि नेते राज्यभर दौरे करत आहे. त्याचप्रमाणे परिवहन मंत्री दिवाकर रावते हे शनिवारी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. पाहणी साठी आलेल्या रावते यांना मात्र शेतकऱ्यांनी कर्जमाफीची आठवण करून देत जाब विचारला. शिवसेनेला निवडून दिल्यानंतरही कर्जमाफी का नाही असा सवाल शेतकऱ्यांनी रावते यांना केला.त्यानंतर रावते यांनी संबंधीत शेतकऱ्याच्या कर्जमाफीची संपूर्ण माहिती पाठवण्याचे सूचना स्थानिक नेत्यांना केल्या.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासन शिवसेना पूर्ण करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ अजूनही राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचे खुद्द आदित्य ठाकरे यांनी आपल्या सभेतून सांगितले होते. त्यामुळे सत्तास्थापनेनंतर येणारी नवीन सरकार सरसकट कर्जमाफीबद्दल काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.