शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
4
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
5
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
6
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
7
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
8
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
9
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
10
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
11
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
12
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
13
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
14
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
15
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
16
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
17
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
18
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
19
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
20
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...

सरसकट कर्जमाफी कधी मिळणार, बांधावर गेलेल्या शिवसेना नेत्यांना शेतकऱ्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 11:13 IST

आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेतून सरसकट कर्जमाफीवरून शिवसेनेने रान उठवले होते.

मुंबई : सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्यासाठी शिवसेनेला निवडून द्या असे विधान युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या भाषणातून अनेकदा केला होता. त्यामुळे राज्यात ५६ आमदार निवडून देणारे मतदार आता शिवसेनेला सरसकट कर्जमाफीवरून जाब विचारत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेला निवडून दिल्यानंतरही कर्जमाफी का नाही ? असा सवाल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना शेतकऱ्यांनी केला. रावते हे शनिवारी पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.

विधानसभा निवडणुकीपूर्वी काढलेल्या युवसेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेतून सरसकट कर्जमाफीवरून शिवसेनेने रान उठवले होते. आदित्य यांनी आपल्या अनेक सभेतून राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली होती. त्यांनतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत सुद्धा वेळोवेळी शिवसेनेकडून सरसकट कर्जमाफीचा मुद्दा समोर करण्यात आला होता. तर घोटी येथे झालेल्या जाहीर सभेत जनतेसमोर शिवसेनेची भुमिका मांडताना आदित्य ठाकरे म्हणाले होते की, शिवसेनेला निवडून दिल्यास सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करू.

त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची आठवण शेतकरी शिवसेनेला करून देत असल्याचे पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री आणि नेते राज्यभर दौरे करत आहे. त्याचप्रमाणे परिवहन मंत्री दिवाकर रावते हे शनिवारी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. पाहणी साठी आलेल्या रावते यांना मात्र शेतकऱ्यांनी कर्जमाफीची आठवण करून देत जाब विचारला. शिवसेनेला निवडून दिल्यानंतरही कर्जमाफी का नाही असा सवाल शेतकऱ्यांनी रावते यांना केला.त्यानंतर रावते यांनी संबंधीत शेतकऱ्याच्या कर्जमाफीची संपूर्ण माहिती पाठवण्याचे सूचना स्थानिक नेत्यांना केल्या.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासन शिवसेना पूर्ण करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ अजूनही राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचे खुद्द आदित्य ठाकरे यांनी आपल्या सभेतून सांगितले होते. त्यामुळे सत्तास्थापनेनंतर येणारी नवीन सरकार सरसकट कर्जमाफीबद्दल काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.