शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट कर्जमाफी कधी मिळणार, बांधावर गेलेल्या शिवसेना नेत्यांना शेतकऱ्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 11:13 IST

आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेतून सरसकट कर्जमाफीवरून शिवसेनेने रान उठवले होते.

मुंबई : सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्यासाठी शिवसेनेला निवडून द्या असे विधान युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या भाषणातून अनेकदा केला होता. त्यामुळे राज्यात ५६ आमदार निवडून देणारे मतदार आता शिवसेनेला सरसकट कर्जमाफीवरून जाब विचारत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेला निवडून दिल्यानंतरही कर्जमाफी का नाही ? असा सवाल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना शेतकऱ्यांनी केला. रावते हे शनिवारी पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.

विधानसभा निवडणुकीपूर्वी काढलेल्या युवसेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेतून सरसकट कर्जमाफीवरून शिवसेनेने रान उठवले होते. आदित्य यांनी आपल्या अनेक सभेतून राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली होती. त्यांनतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत सुद्धा वेळोवेळी शिवसेनेकडून सरसकट कर्जमाफीचा मुद्दा समोर करण्यात आला होता. तर घोटी येथे झालेल्या जाहीर सभेत जनतेसमोर शिवसेनेची भुमिका मांडताना आदित्य ठाकरे म्हणाले होते की, शिवसेनेला निवडून दिल्यास सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करू.

त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची आठवण शेतकरी शिवसेनेला करून देत असल्याचे पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री आणि नेते राज्यभर दौरे करत आहे. त्याचप्रमाणे परिवहन मंत्री दिवाकर रावते हे शनिवारी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. पाहणी साठी आलेल्या रावते यांना मात्र शेतकऱ्यांनी कर्जमाफीची आठवण करून देत जाब विचारला. शिवसेनेला निवडून दिल्यानंतरही कर्जमाफी का नाही असा सवाल शेतकऱ्यांनी रावते यांना केला.त्यानंतर रावते यांनी संबंधीत शेतकऱ्याच्या कर्जमाफीची संपूर्ण माहिती पाठवण्याचे सूचना स्थानिक नेत्यांना केल्या.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासन शिवसेना पूर्ण करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ अजूनही राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचे खुद्द आदित्य ठाकरे यांनी आपल्या सभेतून सांगितले होते. त्यामुळे सत्तास्थापनेनंतर येणारी नवीन सरकार सरसकट कर्जमाफीबद्दल काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.