शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

शेतक-यांना आता केवळ पीक विम्याचा आधार

By admin | Updated: October 7, 2014 23:26 IST

पश्‍चिम व-हाडात पीक विम्यापोटी १0 कोटी २६ लाखांची गुंतवणूक.

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (बुलडाणा)अनियमित पावसामुळे होणार्‍या पीक नुकसानाची भरपाई मिळावी, याकरीता पश्‍चिम वर्‍हाडातील ३ लाख ६ हजार ६८१ शेतकर्‍यांनी राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत सुमारे १0 कोटी २६ लाख ७७ हजार रुपयांची पीक विमा गुंतवणूक केली आहे. गत सप्टेंबर महिन्यात पश्‍चिम वर्‍हाडात पावसाचा एक थेंबही न आल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून, ३ लाख ६ हजार ६८१ शेतकर्‍यांना आता पीक विम्याचाच आधार उरला आहे. पश्‍चिम वर्‍हाडातील बुलडाणा, अकोला व वाशिम या तीन जिल्ह्यात यावर्षी सुरूवातीपासून पावसाची अनिश्‍चितता होती. पावसाच्या हुलकावणीमुळे तब्बल एक महिना उशिरा खरीप हंगामाची पेरणी झाली. अनियमित पावसामुळे व उशीरा झालेल्या पेरणीमुळे होणार्‍या पीक नुकसानीची भरपाई मिळावी, याकरीता पश्‍चिम वर्‍हाडातील शेतकर्‍यांनी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत मोठय़ा प्रमाणात सहभाग घेतला. या योजनेचा विमा काढण्याची मुदत सुरूवातीला ३१ जुलैपर्यत होती. ती वाढवून १६ ऑगस्टपर्यंत करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी जास्तीत जास्त शेतकर्‍यांना राष्ट्रीय पीक विमा योजनेत सहभागी होता आले. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकर्‍यांनी यावर्षी पीक विमा काढण्याला प्राधान्य दिले. पश्‍चिम वर्‍हाडातील ३ लाख ६ हजार ६८१ शेतकर्‍यांनी २ लाख ८0 हजार ३२४ हेक्टर क्षेत्रासाठी पीक विमा काढला आहे. त्यासाठी सुमारे १0 कोटी २६ लाख ७७ हजार रुपयांचा पीक विमा हप्ता शेतकर्‍यांनी भरला आहे. यात अकोला जिल्ह्यातील ६७ हजार १४ शेतकर्‍यांनी ७६ हजार ८0२ हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला आहे. त्यासाठी २ कोटी ८७ लाख ३४ हजार रुपये हप्ता शेतकर्‍यांनी भरला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १ लाख ७५ हजार ४१६ शेतकर्‍यांनी १ लाख २९ हजार ७0 हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला आहे. त्यासाठी ५ कोटी १५ लाख ३३ हजार रुपये हप्ता शेतकर्‍यांनी भरला आहे. वाशिम जिल्ह्यातील ६४ हजार २५१ शेतकर्‍यांनी ७४ हजार ४५२ हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला आहे. त्यासाठी २ कोटी २४ लाख १0 हजार रुपये हप्ता शेतकर्‍यांनी भरला आहे. पश्‍चिम वर्‍हाडात गत सप्टेंबर महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामाची पीके सुकून गेली; तर अत्यल्प पावसाने अनेक शेतातील पिके वाळली आहेत. अनियमित पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पीक विमा काढलेले ३ लाख ६ हजार ६८१ शेतकरी आता पीक विम्याचा लाभ मिळेल, या एकमेव आशेवर आहेत.